शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

रक्कम मिळालीच नाही

By admin | Updated: June 22, 2015 02:10 IST

शासनाने १८ ते ५९ वयोगटातील शेतमजूर, २.५ एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्यांना ....

आम आदमी : एलआयसी पी अ‍ॅन्ड जी.एस.युनीट उदासीनमारेगाव : शासनाने १८ ते ५९ वयोगटातील शेतमजूर, २.५ एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्यांना भूमिहीन समजून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधारांना आधार देण्यासाठी आम आदमी विमा योजना सुरू केली. मात्र या योजनेअंतर्गत अद्याप लाभार्थ्यांना विमा दाव्याची रक्कम मिळालीच नाही.या योजनंअंतर्गत राज्य शासन व केंद्र शासन प्रत्येकी १०० रूपये इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळास देते. लाभार्थ्यांवर विमा हप्त्याचा कोणताही भुर्दंड पडत नाही. लाभार्थ्यांचा नैसर्र्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार, अपघाती मृत्यू, अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास, अपघातामुळे दोन्ही डोळे, दोन्ही पाय गमावल्यास लाभार्थ्यांच्या वारसांना ३७ हजार ५०० रूपयांचा लाभ एल.आय.सी., पी. अ‍ॅन्ड जी.एस.युनीटकडून एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेपासून लाभार्थ्यांचे वारस कसे वंचित राहतात, याचा प्रत्यय तालुक्यातील श्रीरामपूर (कुंभा) येथील मृतक सीताबाई आत्राम यांच्या वारस ज्योत्स्रा सुभाष आत्राम यांना येत आहे. ज्योत्स्ना यांना मंजूर झालेल्या मृत्यू दाव्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. तालुक्यात अशी अनेक प्रकरणे आहे. त्यांनी कुणाकडे न्याय मागावा?, असा प्रश्न आहे. श्रीरामपूर (कुंभा) येथील या योजनेच्या एलआयसीआयडीधारक सीताबाई सुभाष आत्राम यांचा सन २०१३ मध्ये नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांच्या वारस ज्योत्स्रा यांनी त्याचवेळी तहसीलदारांमार्फत आईचे मृत्यू दावा प्रकरण एल.आय.सी., पी.अ‍ॅन्ड जी.एम.युनीट अमरावतीला सादर केले. एल.आय.सी.ने मृत्यू दावा मंजूर करून ३० हजार रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुंभा शाखेत खाते क्रमांक ००५०११००२१००३११ वर पाठविल्याचे पत्र १० मार्च २०१४ रोजी दिले. या प्रकाराला तब्बल नऊ महिने लोटूनही त्यांना पैसे मिळाले नाही. पैशाची वाट बघून थकलेल्या ज्योत्स्राने याबाबत विमा निगमच्या प्रबंधक कार्यालयातील संबंधित विभागाला रजिस्टर पत्राने कळविले. तेव्हा कुठे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी २९ डिसेंबर २०१४ ला दाव्याची रक्कम पाठविली. आपण जिल्हा बँकेच्या मुख्य यवतमाळ शाखेशी संपर्क साधण्याचे त्यांनी सूचित केले. यवतमाळ जिल्हा शाखेत चौकशी केल्यानंतर त्यांनी चुकीच्या क्रमांकावर आलेली रक्कम आम्ही युटीआर नं.पी.१४०३२२२२९०७४११ अ‍ॅक्सीस बँक अमरावती यांना २२ मार्च २०१४ रोजी परत केल्याचे सांगितले. त्यामुळे अद्यापही ही रक्कम ज्योत्स्नाला मिळालीच नाही. (तालुका प्रतिनिधी)