शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नऊ कोटी $$्निरूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ

By admin | Updated: September 27, 2016 03:17 IST

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पर्र्र्यटनाला प्रचंड वाव आहे. यामुळेच आता राज्य शासनाने जिल्ह्याच्या

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पर्र्र्यटनाला प्रचंड वाव आहे. यामुळेच आता राज्य शासनाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ९ कोटींची तरतुद करण्यात आली असून दुर्लक्षित स्थळे पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे. जिल्ह्यात क वर्ग पर्र्र्र्यटनाची ३२ ठिकाणे आहेत. जिल्ह्यातील दोन पर्यटनस्थळे प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून विकसीत करण्यात येणार आहे. तर या सोबतच राज्य शासनाने जिल्ह्यात दोन स्थळांना वन पर्यटनाचा दर्जा दिला आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा निधी अपूरा आहे. क वर्ग पर्यटनासाठी जिल्हा नियोजन विकासातून १ कोटी रूपयांचा निधी आरक्षित करण्यात आला आहे. या माध्यमातून ३२ स्थळे विकसीत करण्यात येणार आहे. त्या आराखडा नियोजन विभागाने तयार केला आहे. त्या दृष्टीने कामाला सूरूवात झाली आहे. प्रादेशिक पर्र्यटन विकास निधीतून मोठा निधी जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून फार तोकडा निधी पर्यटनासाठी उपलब्ध होतो. मात्र प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून मोठी तरतुद करता येते. जिल्ह्यातील दोन ठिकाणाच्या विकासासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्प आणि कळंब तालुक्यातील दत्तापूर या ठिकाणाचा विकास करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्पाच्या पर्यटन विकासासाठी तीन कोटी ५६ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ८६ लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी वळता झाला आहे. यातून पर्यटन निवासस्थाने, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते, जमीन सपाटीकरण, परिसर सुशोभिकरण या प्रमुख बाबींचा समावेश आहे. कळंब तालुक्यातील दत्तापूर हे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणचा तलाव, हिरवळ पर्यटकांना आकर्षित करणारी आहे. या ठिकाणाच्या विकासासाठी पाच कोटी ६४ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. मंजूर निधीपैकी २ कोटी १६ लाख रूपयांचा निधी वळता करण्यात आला. १ कोटी ७६ लाख रूपयांच्या खर्चातून काही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. ही आहेत ३२ स्थळे ४जिल्ह्याच्या क वर्ग पर्र्र्यटन स्थळांच्या यादीत यादीत यवतमाळ तालुका ढुमणापूर, वसंतस्मृती उद्यान, जामवाडी, निळोना, उमर्डा नर्सरी, मनदेव देवस्थान, मनपूर, जेतवन पॅलेस, उमरखेड तालुका तपोवन, कवडशी, सहस्त्रकुंड, अंबोना तलाव. कळंब तालुका खटेश्वर संस्थान, निरंजन माहूर, दत्तापूर, मांजरा, आनंद दत्तब्रम्हगड, नागभूमी प्रज्ञा बुध्दविहार खटेश्वर. मारेगाव तालुका पांढरदेवी, नवरगांव, जुंजाई धबधबा, कोसारा. दारव्हा तालुका गोखी प्रकल्प, रंगो बापूजींचे समाधीस्थळ, कुंभारकिन्ही धरण. नेर तालुका पाथ्रट गोळे, सिरसगाव, चिंतामणी खोंड्या बारड टेकडी (शिरसगाव पांढरी), पुसद तालुका धुंदी, झरी तालुका मुळगव्हाण. राळेगाव तालुका वरध, पूरातन मालगुजरी तलाव. दिग्रस तालुका भवानीमाता टेकडी. बाभुळगाव तालुका पहूर, मादनी यांचा समावेश आहे. राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठे नियोजन केले जात आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. चिंतामणी, सहस्त्रकुंड यासह अनेक ठिकाणाचा विकास झाल्याचे चित्र पहायला मिळेल. - मदन येरावार, राज्यमंत्री, पर्यटन विकास वनपर्यटनाच्यादृष्टीने टिपेश्वर अभयारण्य सर्वात मोठे आहे. याठिकाणी वाघांची संख्या मोठी आहे. पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी पर्यटक इच्छुक आहेत. मात्र सोयीसुविधांचाच अभाव आहे. प्राथमिक सुविधा पुरविण्यासोबत रस्ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. - मिलींद धुर्वे, सदस्य, जिल्हा परिषद