शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही.

ठळक मुद्देमाळपठारावरील ६५ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या कृपेने यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प उन्हाळ सुरू होऊनही भरलेले आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पामध्ये अद्यापही ७० टक्के जलसाठा आहे. यानंतरही शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे माळपठारावरील (ता. पुसद) ४० गावांसाठी मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्याने या भागातील ६५ हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहे.जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दररोज कुठे ना कुठे फुटत आहे. इतकेच नव्हे तर आता तर मुख्य पाईपलाईनही दोन वेळा फुटली आहे. यातून दरदिवसाला दीड कोटी लिटर पाण्याची गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यातून यवतमाळ शहरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.गत चार महिन्यांपासून इसापूर धरणातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. ही योजना सुरू करण्यात यावी म्हणून वारंवार लोकप्रतिनिधींकडे विषय मांडला. योजना मंजूर झाली. अद्यापही कार्यान्वित झाली नाही. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.- जयश्री राठोड,सरपंच, बेलोरागावात गत अनेक महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. श्रीमंत व्यक्ती टँकरने पाणी आणू शकतात. सर्वसामान्यांना विहीर अथवा सार्वजनिक ठिकाणी पाण्यासाठी जावे लागते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.- गणेश पठाडे,सरपंच, मारवाडीगतवर्षभरापासून पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. खासगी बोअरवरून नागरिक पाणी भरत आहे. आता बोअरचे पाणीही खाली गेले आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची स्थिती भीषण होण्याचे चित्र आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींनी योजना कार्यान्वित करावी.- राजू पारीसकर,पोलीस पाटील, रोहडापूर्ण पावसाळा संपला. मात्र ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाºया विहिरीमध्ये फसलेली मोटर निघाली नाही. संपूर्ण गाव एक किलोमीटरवरून पाणी आणत आहे. वारंवार सूचना केल्या. अजूनही फसलेली मोटर निघाली नाही. इसापूरचे पाणी दूषित झाले आहे. - रमेश मस्के, कुंभारी.

टॅग्स :Chapdoh Damचापडोह धरणNilona Damनिळोणा धरण