शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही.

ठळक मुद्देमाळपठारावरील ६५ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या कृपेने यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प उन्हाळ सुरू होऊनही भरलेले आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पामध्ये अद्यापही ७० टक्के जलसाठा आहे. यानंतरही शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे माळपठारावरील (ता. पुसद) ४० गावांसाठी मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्याने या भागातील ६५ हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहे.जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दररोज कुठे ना कुठे फुटत आहे. इतकेच नव्हे तर आता तर मुख्य पाईपलाईनही दोन वेळा फुटली आहे. यातून दरदिवसाला दीड कोटी लिटर पाण्याची गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यातून यवतमाळ शहरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.गत चार महिन्यांपासून इसापूर धरणातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. ही योजना सुरू करण्यात यावी म्हणून वारंवार लोकप्रतिनिधींकडे विषय मांडला. योजना मंजूर झाली. अद्यापही कार्यान्वित झाली नाही. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.- जयश्री राठोड,सरपंच, बेलोरागावात गत अनेक महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. श्रीमंत व्यक्ती टँकरने पाणी आणू शकतात. सर्वसामान्यांना विहीर अथवा सार्वजनिक ठिकाणी पाण्यासाठी जावे लागते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.- गणेश पठाडे,सरपंच, मारवाडीगतवर्षभरापासून पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. खासगी बोअरवरून नागरिक पाणी भरत आहे. आता बोअरचे पाणीही खाली गेले आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची स्थिती भीषण होण्याचे चित्र आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींनी योजना कार्यान्वित करावी.- राजू पारीसकर,पोलीस पाटील, रोहडापूर्ण पावसाळा संपला. मात्र ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाºया विहिरीमध्ये फसलेली मोटर निघाली नाही. संपूर्ण गाव एक किलोमीटरवरून पाणी आणत आहे. वारंवार सूचना केल्या. अजूनही फसलेली मोटर निघाली नाही. इसापूरचे पाणी दूषित झाले आहे. - रमेश मस्के, कुंभारी.

टॅग्स :Chapdoh Damचापडोह धरणNilona Damनिळोणा धरण