शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही.

ठळक मुद्देमाळपठारावरील ६५ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या कृपेने यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प उन्हाळ सुरू होऊनही भरलेले आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पामध्ये अद्यापही ७० टक्के जलसाठा आहे. यानंतरही शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे माळपठारावरील (ता. पुसद) ४० गावांसाठी मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्याने या भागातील ६५ हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहे.जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दररोज कुठे ना कुठे फुटत आहे. इतकेच नव्हे तर आता तर मुख्य पाईपलाईनही दोन वेळा फुटली आहे. यातून दरदिवसाला दीड कोटी लिटर पाण्याची गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यातून यवतमाळ शहरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.गत चार महिन्यांपासून इसापूर धरणातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. ही योजना सुरू करण्यात यावी म्हणून वारंवार लोकप्रतिनिधींकडे विषय मांडला. योजना मंजूर झाली. अद्यापही कार्यान्वित झाली नाही. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.- जयश्री राठोड,सरपंच, बेलोरागावात गत अनेक महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. श्रीमंत व्यक्ती टँकरने पाणी आणू शकतात. सर्वसामान्यांना विहीर अथवा सार्वजनिक ठिकाणी पाण्यासाठी जावे लागते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.- गणेश पठाडे,सरपंच, मारवाडीगतवर्षभरापासून पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. खासगी बोअरवरून नागरिक पाणी भरत आहे. आता बोअरचे पाणीही खाली गेले आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची स्थिती भीषण होण्याचे चित्र आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींनी योजना कार्यान्वित करावी.- राजू पारीसकर,पोलीस पाटील, रोहडापूर्ण पावसाळा संपला. मात्र ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाºया विहिरीमध्ये फसलेली मोटर निघाली नाही. संपूर्ण गाव एक किलोमीटरवरून पाणी आणत आहे. वारंवार सूचना केल्या. अजूनही फसलेली मोटर निघाली नाही. इसापूरचे पाणी दूषित झाले आहे. - रमेश मस्के, कुंभारी.

टॅग्स :Chapdoh Damचापडोह धरणNilona Damनिळोणा धरण