शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सीईओंनी आदिवासी गावात घालविली रात्र

By admin | Updated: May 24, 2014 00:15 IST

गावपातळीवर नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकार्‍यांना वेळच नसतो. यातून गावाचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे आली.

ग्रामस्थांशी संवाद : पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पाऊल

यवतमाळ : गावपातळीवर नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकार्‍यांना वेळच नसतो. यातून गावाचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे आली. मात्र या संकल्पनेलाच मुठमाती देण्याचे काम अधिकार्‍यांनी केले. त्यामुळे आजही गावातील प्रश्न कायम आहे. गावपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गावात मुक्काम करून गावाच्या समस्या जाणून घेतल्या. साधारणत: प्रथम वर्ग अधिकारी म्हटला की आपल्या एसी कक्षाच्या बाहेर पडत नाही. त्याच ठिकाणावरुन जिल्ह्यातले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो. यामुळे अनेकवेळा प्रश्न एक आणि उपचार दुसरा असा प्रकार घडतो. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी याला अपवाद ठरले. त्यांनी गावातले प्रश्न जाणून घेण्यासाठी पेसाच्या गावात भेट दिली. इतकेच नव्हे तर त्या गावात मुक्काम केला. पांढरकवडा तालुक्यातील सिंगलदिप या आदिवासी गावात त्यांनी भेट दिली. रात्री गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची बैठक घेतली. ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या. दुसर्‍या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी घरकुल, पाणीपुरवठा आणि अंगणवाडीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी विजेअभावी रखडलेल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक महिन्याला अधिकारी गाव पातळीवर मुक्कामी राहून पाहणी करणार आहे. या मोहीमेला आम्ही प्रारंभ केला आहे. दर महिन्याला अचानक भेटी दिल्या जातील, असे सीईओ डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)