शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सीईओंनी आदिवासी गावात घालविली रात्र

By admin | Updated: May 24, 2014 00:15 IST

गावपातळीवर नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकार्‍यांना वेळच नसतो. यातून गावाचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे आली.

ग्रामस्थांशी संवाद : पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पाऊल

यवतमाळ : गावपातळीवर नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकार्‍यांना वेळच नसतो. यातून गावाचे प्रश्न आजही कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासाठी लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना पुढे आली. मात्र या संकल्पनेलाच मुठमाती देण्याचे काम अधिकार्‍यांनी केले. त्यामुळे आजही गावातील प्रश्न कायम आहे. गावपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गावात मुक्काम करून गावाच्या समस्या जाणून घेतल्या. साधारणत: प्रथम वर्ग अधिकारी म्हटला की आपल्या एसी कक्षाच्या बाहेर पडत नाही. त्याच ठिकाणावरुन जिल्ह्यातले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो. यामुळे अनेकवेळा प्रश्न एक आणि उपचार दुसरा असा प्रकार घडतो. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी याला अपवाद ठरले. त्यांनी गावातले प्रश्न जाणून घेण्यासाठी पेसाच्या गावात भेट दिली. इतकेच नव्हे तर त्या गावात मुक्काम केला. पांढरकवडा तालुक्यातील सिंगलदिप या आदिवासी गावात त्यांनी भेट दिली. रात्री गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची बैठक घेतली. ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या. दुसर्‍या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी घरकुल, पाणीपुरवठा आणि अंगणवाडीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी विजेअभावी रखडलेल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक महिन्याला अधिकारी गाव पातळीवर मुक्कामी राहून पाहणी करणार आहे. या मोहीमेला आम्ही प्रारंभ केला आहे. दर महिन्याला अचानक भेटी दिल्या जातील, असे सीईओ डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)