शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वृत्तपत्रामुळे कोरोना पसरत नाही, माहिती मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

वृत्तपत्रांना हात लावल्याने कोरोनाचा धोका वाढतो ही अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने डॉ. दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गासोबतच आपले दैनंदिन कामकाज चालवायचे आहे.

ठळक मुद्देडॉ. दीपक अग्रवाल यांचे अनुभवाचे बोल, अनलॉकच्या प्रक्रियेत आणखी जबाबदारी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वृत्तपत्राने कोरोनाचा प्रसार होतो ही अफवा आहे. शास्त्रीयदृष्ट्या वृत्तपत्रातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यताच नाही. उलट वृत्तपत्र वाचनामुळे कोरोना महामारीच्या काळात अद्ययावत व अधिकृत माहिती मिळते. वृत्तपत्रापासून कुठलाही धोका संभवत नाही, असे येथील जनरल फिजिशियन डॉ.दीपक अग्रवाल यांनी स्पष्ट केले.वृत्तपत्रांना हात लावल्याने कोरोनाचा धोका वाढतो ही अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने डॉ. दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गासोबतच आपले दैनंदिन कामकाज चालवायचे आहे. अशा स्थितीत रोजच्या व्यवहारात वावरताना घ्यावयाची दक्षता आणि स्वत:बद्दल घ्यावयाची काळजी अशा दोन आचारसंहितांचे पालन करावे लागणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी तीन लेअर असलेला कापडी मास्क वापरावा, मास्कला वारंवार हात लावू नये, शेला, दुपट्टा याचा वापर करणे धोकादायक आहे. परस्परांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे, शक्यतोवर गर्दी होईल अशा ठिकाणी जावू नये, सार्वजनिक कार्यक्रमात जावू नये ही खबरदारी रोजच्या व्यवहारात घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका बऱ्याचअंशी कमी करता येऊ शकतो. कामकाजाच्या ठिकाणी सोडियम हायड्रोक्लोराईड फवारावे, खुर्च्या, दाराचे हॅन्डल व ज्या ठिकाणी वारंवार स्पर्श होऊ शकतो, तेथे सोडियम हायड्रोक्लोराईड फवारणी करावी.ज्यांना उच्चरक्तदाब (बीपी), हृदयरोग, मधुमेह (डायबिटीज) हे आजार आहेत त्यांना कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. त्यांनी पूर्णपणे सुरक्षित राहण्याची गरज आहे. वैयक्तिक आचारसंहितेत योग्य झोप (किमान आठ तास), व्यायाम, योग्य आहार ज्यामध्ये प्रथिने, उकळलेले धान्य, डाळी, दूध, अंडी, मासे, व्हीटॅमिन सी असलेले आंबट फळ, झिंगे हा आहार घ्यावा. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात बाहेरचे जेवणे घेणे व इतर खाद्य पदार्थ टाळावे, बरेच जण गरम पाण्याचा वापर करतात मात्र याचा फारसा फायदा होईल असे वाटत नाही.कोरोनाची लक्षणे साधारणत: सर्दी, ताप, खोकला हीच आहे. अशी लक्षणे दिसल्यास वेळ न घालविता कोरोना टेस्ट करून घ्यावी. रोगाला घाबरुन घरीच औषध घेत बसू नये. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. योग्य उपचार घेतल्यास कोरोना पूर्ण बरा होऊ शकतो. सध्या तरी शासनाने खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारास परवानगी दिली नाही. ती तपासणी सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयातही उपचार करता येणे शक्य आहे, असे डॉ. दीपक अग्रवाल यांनी स्पष्ट केले.कोरोना काळात आचारसंहिता पाळाकोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी सध्या तरी कुठलेही प्रभावी औषध नाही. त्यामुळे वैयक्तिक आचारसंहिताच कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक आचारसंहितेलाच महत्व दिले पाहिजे, असे येथील जनरल फिजीशियन डॉ.दीपक अग्रवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या