शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या आरंभी शिक्षकांच्या नव्याने बदल्या

By admin | Updated: June 24, 2016 02:37 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या स्थगित झालेल्या बदल्या आता रद्दच झाल्या आहेत. आता नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्या-झाल्याच शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद : विभागीय आयुक्तांच्या अहवालावर ग्रामविकास मंत्र्यांची स्वाक्षरीअविनाश साबापुरे यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षकांच्या स्थगित झालेल्या बदल्या आता रद्दच झाल्या आहेत. आता नवे शैक्षणिक सत्र सुरू झाल्या-झाल्याच शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शुक्रवारी यवतमाळ जिल्हा परिषदेत आदेश धडकणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.प्रशासकीय बदल्यांमध्ये विविध शिक्षक संघटनांच्या पुढाऱ्यांनाच जिल्हा परिषद प्रशासनाने ‘दूरचा दुर्गम रस्ता’ दाखविल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मोजक्या शिक्षक पुढाऱ्यांनी एकत्र येत कृती समिती बनविली आणि थेट ग्रामविकास मंत्रालय गाठून स्थगिती आणली. त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्तांचे चौकशी पथक जिल्हा परिषदेत धडकले. बदली प्रक्रियेदरम्यानचे चित्रीकरण तपासण्यात आले. ७ जून रोजी विभागीय आयुक्तांनी चौकशी अहवाल ग्रामविकास मंत्र्यांकडे रवाना केला. बदल्यांबाबत इथूनच खरा ‘क्लायमॅक्स’ सुरू झाला. बदल्यांमध्ये समाधानी सर्वसामान्य शिक्षक विरुद्ध असंतुष्ट शिक्षक नेते असा सामना उघड-उघड रंगू लागला. कृती समितीचे नेते आणि बदलीसमर्थक अशा दोन्ही बाजूच्या शिक्षक ७ जूनपासूनच मंत्रालय परिसरातच ठाण मांडून बसले. पण ग्रामविकास मंत्र्यांनी २२ जूनपर्यंत निर्णय राखून ठेवला. आयुक्तांचा अहवाल पडताळून आपल्याच बाजूने मंत्री महोदयांनी आदेश काढावा, यासाठी शिक्षकांनी मुंबईत तंबू ठोकला. दरम्यान दोन आमदारांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. शिक्षक पुढाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे बदल्या रद्द कराव्या, असा होरा लावला. शेवटी बदल्या रद्द करण्याच्या आयुक्तांच्या अहवालावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी २३ जून रोजी स्वाक्षरी केली. आता शिक्षकांच्या बदल्या येत्या ३० जून रोजी होण्याची शक्यता आहे. आमची मागणी पूर्ण नाही झाली, तर किमान बदल्या तरी ५ जुलैनंतर कराव्या, हा शिक्षकांचा आग्रहही आमान्य करण्यात आला. २७ जूनपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. त्यानंतर लगेच ३० जून रोजी बदल्या होण्याची शक्यता असल्याने शिक्षकांची तारांबळ उडणार आहे. एक चूक आणि शंभर चुका सारख्याच !यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये काही बाबतीत अनियमितता झाल्याचे आयुक्तांच्या अहवालात नमूद आहे. मात्र, संपूर्ण प्रक्रियाच चुकीची आहे, असे म्हणण्यात आलेले नाही. त्यामुळे बदल्यांमध्ये समाधानी असलेल्या शिक्षकांच्या नव्याने बदल्या करू नये, असा आग्रह ‘मुंबई मुक्कामी’ शिक्षकांनी धरला होता. मात्र, एक चूक होणे काय किंवा शंभर चुका होणे काय, दोन्ही सारखेच, असे म्हणत ग्रामविकास मंत्र्यांनी संपूर्ण बदली प्रक्रियाच नव्याने करण्याचा आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.