शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

जिल्हा परिषद गट आणि गणांची नव्याने फेररचना

By admin | Updated: August 20, 2016 00:03 IST

जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची नव्याने फेररचना होणार आहे.

२०११ च्या जनगणनेचा आधार : २०१७ मध्ये होणार निवडणूक यवतमाळ : जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची नव्याने फेररचना होणार आहे. त्यासाठी सन २०११ ची जनगणना गृहित धरण्यात येणार असून नगरपरिषद प्रभाग रचनेप्रमाणेच सॅटेलाईटव्दारे या गट आणि गणांची पुनर्रचना होण्याचे संकेत आहे. येत्या जानेवारी-फेब्रुवारीत जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे. आत्तापर्यंत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि १२४ गण होते. त्यापूर्वी ६३ गट आणि १२६ गण होते. पाच वर्षांपूर्वी एक गट आणि दोन गण कमी झाले होती. आता पुन्हा ६२ गट आणि १२४ गणांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या आठ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. तसेच जिल्ह्यातील सहा ठिकाणी नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यामुळे गट आणि गणांची पुनर्रचना करणे आवश्यक झाले आहे. यवतमाळ शहरालगतच्या आठ ग्रामपंचायत नगरपरिषदेत समाविष्ट झाल्या. त्याचप्रमाणे कळंब, राळेगाव, मारेगाव, झरी, बाभूळगाव आणि महागाव या सहा तालुका ठिकाणी नगर पंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यवतमाळ नगरपरिषदेत जवळपास एक लाख ३० हजारांच्यावर, तर सहा नगर पंचायतीत ४० हजारांच्यावर लोकसंख्या नव्याने सहभागी झाली. त्यामुळे गट आणि गणांच्या मतदार संख्येत घट होणार आहे. या बदलामुळेच आता गट आणि गणांची नव्याने फेररचना करावी लागणार आहे. नवीन फेररचनेत गट आणि गणांची संख्या कमी होण्याचे संकेत आहे. यात यवतमाळला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यवतमाळ तालुक्यातील किमान दोन ते तीन गट आणि चार ते सहा गण कमी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विद्यमान समाजकल्याण सभापती लता खांदवे यांचा मतदार संघ असलेला वडगाव गट रद्द झाला आहे. आता पुन्हा दोन ते तीन गट कमी होण्याचे संकेत आहे. तथापि अधिकृतरित्या राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात अद्याप कोणत्याच सूचना येथील निवडणूक विभागाला दिल्या नाहीत. मात्र सन २०११ च्या जणनगणेचा आधार घेऊन नवीन गट आणि गणांची फेररचना सॅटेलाईटचा वापर करून होणार आहे. (शहर प्रतिनिधी) कळंब, राळेगाव, महागाव, झरी, बाभूळगाव व मारेगावात अदलाबदल कळंब, राळेगाव, महागाव, झरी, बाभूळगाव व मारेगाव येथे आता नगर पंचायत अस्तित्वात आली. त्यामुळे या तालुक्यातील गट आणि गणांमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या अदलाबदलीत अनेक गावे पूर्वीच्या गट अथवा गणातून नवीन गट अथवा गणात समाविष्ट होतील. या सहाही शहरातील मतदारांना आता जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्यांना निवडून देता येणार नाही. परिणामी या तालुक्यातील गट आणि गणाची मतदार संख्याही कमी होईल. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एखादवेळी तेथील गट आणि गणही कमी होतील. मात्र केवळ दोनच गट असलेल्या तालुक्यात यामुळे त्रांगडे निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.