शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद गट आणि गणांची नव्याने फेररचना

By admin | Updated: August 20, 2016 00:03 IST

जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची नव्याने फेररचना होणार आहे.

२०११ च्या जनगणनेचा आधार : २०१७ मध्ये होणार निवडणूक यवतमाळ : जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची नव्याने फेररचना होणार आहे. त्यासाठी सन २०११ ची जनगणना गृहित धरण्यात येणार असून नगरपरिषद प्रभाग रचनेप्रमाणेच सॅटेलाईटव्दारे या गट आणि गणांची पुनर्रचना होण्याचे संकेत आहे. येत्या जानेवारी-फेब्रुवारीत जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे. आत्तापर्यंत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि १२४ गण होते. त्यापूर्वी ६३ गट आणि १२६ गण होते. पाच वर्षांपूर्वी एक गट आणि दोन गण कमी झाले होती. आता पुन्हा ६२ गट आणि १२४ गणांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या आठ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. तसेच जिल्ह्यातील सहा ठिकाणी नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यामुळे गट आणि गणांची पुनर्रचना करणे आवश्यक झाले आहे. यवतमाळ शहरालगतच्या आठ ग्रामपंचायत नगरपरिषदेत समाविष्ट झाल्या. त्याचप्रमाणे कळंब, राळेगाव, मारेगाव, झरी, बाभूळगाव आणि महागाव या सहा तालुका ठिकाणी नगर पंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यवतमाळ नगरपरिषदेत जवळपास एक लाख ३० हजारांच्यावर, तर सहा नगर पंचायतीत ४० हजारांच्यावर लोकसंख्या नव्याने सहभागी झाली. त्यामुळे गट आणि गणांच्या मतदार संख्येत घट होणार आहे. या बदलामुळेच आता गट आणि गणांची नव्याने फेररचना करावी लागणार आहे. नवीन फेररचनेत गट आणि गणांची संख्या कमी होण्याचे संकेत आहे. यात यवतमाळला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यवतमाळ तालुक्यातील किमान दोन ते तीन गट आणि चार ते सहा गण कमी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विद्यमान समाजकल्याण सभापती लता खांदवे यांचा मतदार संघ असलेला वडगाव गट रद्द झाला आहे. आता पुन्हा दोन ते तीन गट कमी होण्याचे संकेत आहे. तथापि अधिकृतरित्या राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात अद्याप कोणत्याच सूचना येथील निवडणूक विभागाला दिल्या नाहीत. मात्र सन २०११ च्या जणनगणेचा आधार घेऊन नवीन गट आणि गणांची फेररचना सॅटेलाईटचा वापर करून होणार आहे. (शहर प्रतिनिधी) कळंब, राळेगाव, महागाव, झरी, बाभूळगाव व मारेगावात अदलाबदल कळंब, राळेगाव, महागाव, झरी, बाभूळगाव व मारेगाव येथे आता नगर पंचायत अस्तित्वात आली. त्यामुळे या तालुक्यातील गट आणि गणांमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या अदलाबदलीत अनेक गावे पूर्वीच्या गट अथवा गणातून नवीन गट अथवा गणात समाविष्ट होतील. या सहाही शहरातील मतदारांना आता जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्यांना निवडून देता येणार नाही. परिणामी या तालुक्यातील गट आणि गणाची मतदार संख्याही कमी होईल. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एखादवेळी तेथील गट आणि गणही कमी होतील. मात्र केवळ दोनच गट असलेल्या तालुक्यात यामुळे त्रांगडे निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.