शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

गाजरातून ‘बिटा कॅरोटिन’ मिळविण्याचे नवे तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:34 IST

कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पेशिकांची वाढ रोखण्यावर गुणकारी ठरणारे ‘बिटा कॅरोटिन’ हे औषधी द्रव्य गाजराच्या रसातून अधिक प्रभावीपणे संकलित करण्याचे नवे तंत्रज्ञान येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील (जेडीआयईटी) रसायनशास्त्राच्या दोन अध्यापकांनी विकसित केले आहे.

यवतमाळ : कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पेशिकांची वाढ रोखण्यावर गुणकारी ठरणारे ‘बिटा कॅरोटिन’ हे औषधी द्रव्य गाजराच्या रसातून अधिक प्रभावीपणे संकलित करण्याचे नवे तंत्रज्ञान येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील (जेडीआयईटी) रसायनशास्त्राच्या दोन अध्यापकांनी विकसित केले आहे. या संशोधनास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने २९ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. या नवीन यंत्रणेमुळे कर्करुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.येथील जेडीआयईटीतील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अजय पारडे आणि प्रा. डॉ. प्रशांत तायडे यांनी संयुक्तरित्या हे संशोधन केले. आवश्यक स्वरुपात बिटा-केरोटीन संकलन व वृद्धीकरण करण्याची नवीन यंत्रणा प्रायोगिक तत्वावर शोधून काढली आहे. ही यंत्रणा राष्ट्रीय स्तरावर वृद्धींगत करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाºया नवी दिल्ली येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात (डीएसटी) सादर करण्यात आली.तेथील अभ्यागत मंडळापुढे सादरीकरण केल्यानंतर मंडळाने संशोधनातून होणारे सामाजिकव आर्थिक फायदे बघता या संशोधनास २९ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य व दोन वर्ष संशोधन काळ त्वरित मंजूर करून दिला. अशा प्रकल्पांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन संस्थेचे सचिव किशोर दर्डा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी दिले. केमिकल विभागाच्या व महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपलब्धीबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा यांनी कौतुक केले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दर्डा यांनी या उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीकरिता आशीर्वाद दिले.सध्याच्या औषधीमध्ये बिटा कॅरोटिनची कमतरताकर्करुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त अशी बिटा-कॅरोटीन ही औषधी गाजरातील रसामध्ये उपलब्ध असते. ही औषधी कर्करोगास कारणीभूत पेशिका वाढीला परावृत्त करते. बाजारात उपलब्ध असलेल्या कॅरोटीन औषधी सध्या ज्या पद्धतीने बनविण्यात येतात, त्यात बिटा-केरोटीन ज्या स्वरुपात आवश्यक असते, त्या स्वरुपात मिळत नाही. त्यामुळे त्या आवश्यक प्रमाणात प्रभावी ठरत नाही. या कारणामुळे रुग्णांचा औषधांवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो.