शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नवी सार्वजनिक बांधकामे मार्चपर्यंत थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 18:19 IST

कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले महाराष्ट्र शासन आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे. त्याचा फटका जनहिताच्या विविध योजनांनाही बसतो आहे.

ठळक मुद्देसचिवांचा आदेश, असमतोल निर्माण झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले महाराष्ट्र शासन आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे. त्याचा फटका जनहिताच्या विविध योजनांनाही बसतो आहे. याच आर्थिक टंचाईतून सार्वजनिक बांधकाम खात्याने नव्याने हाती घेतलेली आणि अर्थसंकल्पीय पुस्तकात नमूद केलेली बांधकामे ३१ मार्च २०२० पर्यंत थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत.गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी यांनी या संबंधीचे आदेश राज्यातील सर्व मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंत्यांना पाठविले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पुलांची कामे, परीक्षण व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. ही कामे विविध कार्यक्रम, योजनांमधून पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित केलेले असते. मात्र मंजूर करण्यात आलेली कामे व प्राप्त होणारा निधी यामध्ये तफावत असल्याची गंभीरबाब निदर्शनास आली आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याला विविध मार्गाने प्राप्त होणाऱ्या निधीतून सन २०१९-२० पूर्वी हाती घेतलेली कामे व सन २०१९-२० या वर्षात नव्याने घेतल्या जाणाऱ्या कामांकरिता निधी उपलब्ध केला जातो. परंतु हाती घेतलेल्या कामांची संख्या व निधी उपलब्ध होण्याचे प्रमाण लक्षात घेता त्यात विषमता व असमतोल निर्माण झाला आहे. म्हणूनच निधीचे नियोजन केले जात आहे. २०१९-२० मध्ये उपलब्ध होणाऱ्या निधीवर कमी ताण यावा या दृष्टीने प्रयत्न होत आहे.

सुरू झालेल्या कामांना अडसर नाहीराज्यात सध्या सुरू असलेल्या कामांपैकी काही कामांचे उद्दीष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने बांधकाम खात्याला उपलब्ध निधी व भविष्यात येणारा निधी विचारात घेऊन नियोजन केले जात आहे. प्रत्यक्ष सुरू झालेल्या कामांना निधीचा कोणताही अडथळा नाही. परंतु जे कामे नव्याने हाती घेतली गेली आहे किंवा अर्थसंकल्पीय पुस्तकांमध्ये समाविष्ठ केली आहे, ज्या कामांचे अद्याप कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर) जारी झालेले नाहीत अशा सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही ३१ मार्च २०२० पर्यंत संस्थगित करण्यात आली आहे. सचिव चंद्रशेखर जोशी यांनी आपल्या आदेशात ही बाब स्पष्ट केली आहे. परंतु आशियाई बँक सहाय्यीत व हायब्रीड अ‍ॅन्युईटी योजनेच्या कामांना १४ नोव्हेंबरचा हा आदेश लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.हे आहेत निधीचे स्त्रोतबांधकाम खात्याला राज्य योजना, योजनेत्तर योजना, नाबार्ड, केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ), अ‍ॅन्युईटीच्या धर्तीवर आशियाई विकास बँक अर्थसहाय्य (एडीबी) व केंद्र शासन अर्थसाहाय्यित अशा विविध मार्गांनी निधी प्राप्त होतो.

टॅग्स :Governmentसरकार