शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

उदापूर पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:46 IST

टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांचे आदेश : प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत अमरावतीत आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यात प्रकल्पग्रस्तांची बाजू आमदार बच्चू कडू यांनी मांडली. विदर्भ सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख यावेळी उपस्थित होते.गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खोट्या दस्तावेजाद्वारे पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात आली. याविषयी प्रकल्पग्रस्तांनी तक्रार केली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पाटबंधारे अधीक्षक अभियंता, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना उपस्थित मंत्र्यांनी विचारणा केली. त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन पुनर्वसनात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. पुनर्वसन बेकायदेशीर असल्याच्या निष्कर्षाप्रत मंत्री पोहोचले. आतापर्यंत झालेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करून गावकऱ्यांना विश्वासात घेऊन एका जागेचा ग्रामसभा, गावकऱ्यांच्या सोयीचा ठराव घेवून नवीन पुनर्वसन प्रक्रिया राबवावी, असे आदेश देण्यात आले. आता पुनर्वसनासंदर्भात काय निर्णय लागतो, याकडे उदापूरसह प्रकल्पबाधित गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.व्यापाऱ्यांच्या जमिनी खरेदीचा घाटउदापूर ग्रामवासियांना विश्वासात घेण्यात आले नाही. मनमर्जीने पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठीचा घाट रचला गेला. दारव्हा सिंचन उपविभागातील उपअभियंता सुधीर पवार यांनी यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांची तत्काळ बदली करावी, चौकशीत गैरप्रकार आढळल्यास या अभियंत्याला निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी जलसंपदा मंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांनी निवेदन सादर केले.तीव्र आंदोलनाचा इशाराआजंती रोडवरील पुनर्वसन रद्द करण्याचा सूचना ना. गिरीश महाजन यांनी केल्या. यानंतरही पुनर्वसन रद्द न झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. यावेळी प्रा. अजय दुबे, उदापूरच्या उपसरपंच कविता भोयर, माजी सरपंच रामेश्वर सांगळे, अजय भोयर, प्रकल्पग्रस्त रवींद्र मुंडे, किसनराव मनवर, राजू जुनघरे, पुरुषोत्तम भोयर, श्रीराम इरपाते, नरेश कोकाटे, विलास पवार, संदीप करपते, भोयर, बाळू पवार, विजय श्रृंगारे, नीलेश तोंडे, चौधरी, दिलीप तिजारे, डॉ.वसंत सांगळे, रामहरी कावळे, साधू इंजाळकर, झोडपाटील, गजानन इसाळकर, बबन खोडे, कैलास कटके, पप्पु तायडे, हेमंत भोयर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुख