शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

थकबाकीदार शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नवे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या परंतु बँकेच्या रेकॉर्डवर थकबाकीदार म्हणून डाग लागलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना सरसकट केवळ १० ते १५ हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे.शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी हेक्टरी व पीकनिहाय मर्यादा ...

ठळक मुद्देजिल्हा सहकारी बँक : सरसकट केवळ १० ते १५ हजार देणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या परंतु बँकेच्या रेकॉर्डवर थकबाकीदार म्हणून डाग लागलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना सरसकट केवळ १० ते १५ हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे.शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी हेक्टरी व पीकनिहाय मर्यादा ठरलेली असते. परंतु यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही पद्धत केवळ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांपुरतीच आता मर्यादित ठेवली आहे. थकबाकीदार म्हणून बँकेच्या दप्तरी नोंद झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी यावर्षी नवे धोरण संचालक मंडळाच्या २५ एप्रिल २०१८ च्या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्याबाबत ५ मेच्या आदेशान्वये जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना कळविण्यात आले आहे.या नव्या धोरणानुसार २००८ च्या कृषी कर्जमाफीनंतर कर्ज उचल करणारे व २०१७ च्या कर्जमाफीपर्यंत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये सरसकट पीक कर्ज वाटप केले जाणार आहे. २००८ च्या कर्जमाफीनंतर किमान दोन वर्ष कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १५ हजार रुपये पीक कर्ज दिले जाणार आहे. ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) अंतर्गत दीड लाखांच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अल्पमुदती कर्जाच्या मूळ मुद्दलाच्या सव्वापट कर्ज दिले जाणार आहे. इतर बँकांचे नियमित दोन वर्ष कर्जपरतफेड करणारे, पाच वर्षापेक्षा अधिक काळ खंडीत कर्जदार असलेल्या, नवीन सभासदांना सरसकट दहा हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे. परंतु निधी उपलब्ध असला तरच हे कर्ज त्या सभासदांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज वाटपाचे हे धोरण मान्य नसेल त्यांना तत्काळ नाहरकत प्रमाणपत्र देऊन त्यांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे.जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. या शेतकऱ्यांना सन २०१८-१९ च्या हंगामासाठी पीक कर्जाकरिता पात्र ठरविले गेले. शासनाने माफी दिली असली तरी बँकेच्या रेकॉर्डवर गेल्या दहा वर्षात थकबाकीदार म्हणून नोंद झालेल्या या शेतकऱ्यांना हेक्टरी व पीकपद्धती निहाय नियमित कर्ज न देता सरसकट दहा ते पंधरा हजार रुपये कर्ज देऊन बोळवण केली जात आहे.बँकेचे धोरण, शेतकऱ्यांचे मरणराष्ट्रीयकृत बँका राज्य सरकारलाही जुमानत नाही. पीक कर्ज वाटपात दरवर्षीच या बँका सहकारी बँकेच्या तुलनेत माघारतात. त्यांचे हंगाम संपूनही पीक कर्ज वाटप अवघे ३० ते ४० टक्क्यावर असते. जिल्हाधिकाऱ्यांकडून अल्टीमेटम मिळूनही या बँका सढळ हस्ते कर्ज वाटप करीत नाही. त्यासाठी रिझर्व्ह बँकेचा आडोसा घेतला जातो. असे असताना जिल्हा बँकेकडील शेतकरी मोठ्या संख्येने राष्ट्रीयकृत बँकांकडे वळल्यास त्यांना तेथे कर्ज मिळण्याची शक्यता कमीच आहे. जिल्हा बँकेचे हे नवे कर्ज धोरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठण्याची चिन्हे दिसू लागली आहे.शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळविणारअधिकाधिक शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे शासनाने काही दिवसापूर्वीच जाहीर केले होते. मात्र त्यासंंबंधी कोणताही लेखी आदेश जारी केला गेला नाही. परंतु जिल्हा बँकेने माफी मिळूनही रेकॉर्डवर थकबाकीदार म्हणून जुनी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अवघे दहा ते पंधरा हजार कर्ज देण्याचे धोरण ठरविले आहे. दहा हजारात शेतकरी आपली शेती कशी कसणार हा प्रश्न आहे. हे नवे धोरण म्हणजे शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृ बँकांकडे वळविण्यासाठी निवडलेला छुपा मार्ग असल्याचे मानले जाते. त्यासाठी तातडीने एनओसी देण्याचे शाखांना जारी केलेले आदेश बघता या शंकेला बळ मिळत आहे. वर्षानुवर्षे जिल्हा बँकेचा सभासद असलेला शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गेल्यानंतर तेथे त्याला कर्ज मिळेलच याची हमी काय हा प्रश्न आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी हातवर केल्यास या शेतकºयांना सावकाराच्या दारी जावे लागण्याची व त्यातूनच पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.