शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

नेर तालुक्याची आरोग्यसेवा कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:46 IST

जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा तुटवडा : अपुरा औषधसाठा, आरोग्य केंद्र नामधारी, उपाययोजनांची मागणी

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.तालुक्यात १७ आरोग्य उपकेंद्र आहेत. यातील पाच ठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी नाहीत. रिक्त जागांमुळे हे उपकेंद्र शोभेची वास्तू ठरले आहे. मोझर, सातेफळ, खरडगाव, कोव्हळा, चिकणी, उमरठा, मालखेड(बु), वीरगव्हाण, बाणगाव आदी गावांसाठी आरोग्यसेवक कार्यरत आहेत. मात्र त्यांचे दर्शन लोकांना होत नाही.ग्रामीण भागात जलजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होत आहे. याविषयी लोकांमध्ये जनजागृती आणि उपाययोजनांची जबाबदारी प्राथमिकस्तरावर आरोग्यसेवकांची आहे. दूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचे सौजन्य त्यांच्याकडून दाखविले जात नाही. शिरसगाव, पाथ्रड(गोळे), पिंपळगाव, दहीफळ, बोरगाव, मांगलादेवी, नेर नबाबपूर या गावासाठी तर आरोग्यसेवकच नाही.तालुक्याला आरोग्यसेवा पुरविणाºया केंद्रांमध्ये औषधसाठा पुरविला जातो. मात्र प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत नाही. ही औषधी नेमकी जाते कुठे याचा शोध घेण्याची गरज आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात नाही.जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्षनेर तालुक्याची आरोग्य यंत्रणा आजारी आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, औषधांची लावली जात असलेली विल्हेवाट. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याविषयी काही जागरूक नागरिकांकडून अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र याकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.