शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

नेर तालुक्याची आरोग्यसेवा कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:46 IST

जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा तुटवडा : अपुरा औषधसाठा, आरोग्य केंद्र नामधारी, उपाययोजनांची मागणी

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.तालुक्यात १७ आरोग्य उपकेंद्र आहेत. यातील पाच ठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी नाहीत. रिक्त जागांमुळे हे उपकेंद्र शोभेची वास्तू ठरले आहे. मोझर, सातेफळ, खरडगाव, कोव्हळा, चिकणी, उमरठा, मालखेड(बु), वीरगव्हाण, बाणगाव आदी गावांसाठी आरोग्यसेवक कार्यरत आहेत. मात्र त्यांचे दर्शन लोकांना होत नाही.ग्रामीण भागात जलजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होत आहे. याविषयी लोकांमध्ये जनजागृती आणि उपाययोजनांची जबाबदारी प्राथमिकस्तरावर आरोग्यसेवकांची आहे. दूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचे सौजन्य त्यांच्याकडून दाखविले जात नाही. शिरसगाव, पाथ्रड(गोळे), पिंपळगाव, दहीफळ, बोरगाव, मांगलादेवी, नेर नबाबपूर या गावासाठी तर आरोग्यसेवकच नाही.तालुक्याला आरोग्यसेवा पुरविणाºया केंद्रांमध्ये औषधसाठा पुरविला जातो. मात्र प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत नाही. ही औषधी नेमकी जाते कुठे याचा शोध घेण्याची गरज आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात नाही.जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्षनेर तालुक्याची आरोग्य यंत्रणा आजारी आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, औषधांची लावली जात असलेली विल्हेवाट. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याविषयी काही जागरूक नागरिकांकडून अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र याकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.