शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नेर तालुक्याची आरोग्यसेवा कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:46 IST

जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा तुटवडा : अपुरा औषधसाठा, आरोग्य केंद्र नामधारी, उपाययोजनांची मागणी

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.तालुक्यात १७ आरोग्य उपकेंद्र आहेत. यातील पाच ठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी नाहीत. रिक्त जागांमुळे हे उपकेंद्र शोभेची वास्तू ठरले आहे. मोझर, सातेफळ, खरडगाव, कोव्हळा, चिकणी, उमरठा, मालखेड(बु), वीरगव्हाण, बाणगाव आदी गावांसाठी आरोग्यसेवक कार्यरत आहेत. मात्र त्यांचे दर्शन लोकांना होत नाही.ग्रामीण भागात जलजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होत आहे. याविषयी लोकांमध्ये जनजागृती आणि उपाययोजनांची जबाबदारी प्राथमिकस्तरावर आरोग्यसेवकांची आहे. दूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचे सौजन्य त्यांच्याकडून दाखविले जात नाही. शिरसगाव, पाथ्रड(गोळे), पिंपळगाव, दहीफळ, बोरगाव, मांगलादेवी, नेर नबाबपूर या गावासाठी तर आरोग्यसेवकच नाही.तालुक्याला आरोग्यसेवा पुरविणाºया केंद्रांमध्ये औषधसाठा पुरविला जातो. मात्र प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत नाही. ही औषधी नेमकी जाते कुठे याचा शोध घेण्याची गरज आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात नाही.जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्षनेर तालुक्याची आरोग्य यंत्रणा आजारी आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, औषधांची लावली जात असलेली विल्हेवाट. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याविषयी काही जागरूक नागरिकांकडून अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र याकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.