शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नेर, कळंब, बाभूळगाव, राळेगाव तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मंजूर करावी, राज्यपालांनी मंजूर केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.

ठळक मुद्देशिवसेनेचे निवेदन : शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन शिवसेनेतर्फे सोमवारी येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मंजूर करावी, राज्यपालांनी मंजूर केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ द्यावा आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र राऊत, संचालक भाऊराव ढवळे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन भोकरे, युवा सेना तालुका प्रमुख सुजित कुंभारे आदी उपस्थित होते.

बाभूळगाव तहसीलदारांना निवेदनबाभूळगाव : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न येथील तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून शिवसेनेने मांडले. पीक विमा, परतीच्या पावसाने झालेले नुकसान, वीज बिल माफी, रानडुकरांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वे व मदत मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या. नायब तहसीलदार वाय.के. निवल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष वसंत जाधव, संघटक विजय भेंडे, चंद्रशेखर केळतकर, विक्रम लाकडे, सुधीर कडुकार, विकास गर्जे, नवनीत कावलकर, प्रदीप राऊत, विजय दंडे, संजय ठाकरे, ए.एन. देशमुख, उमेश वर्मा आदी उपस्थित होते.

कळंब तहसीलवर धडककळंब : सरसकट नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिवसेनेतर्फे येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिगांबर मस्के, तालुका प्रमुख नीलेश मेत्रे, भारतीय विद्यार्थी सेना संघटक अभिषेक पांडे, आदिवासी आघाडी प्रमुख वसंतराव कंगाले, शहर प्रमुख रोशन गोरे, विभाग प्रमुख प्रेमेश कोरडे आदी यावेळी उपस्थित होते.घरकूल बांधकामासाठी मोफत रेती हवीराळेगाव : शिवसेनेतर्फे तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून घरकूल बांधकाम व वैयक्तिक लाभाच्या शौचालय बांधकामासाठी मोफत रेती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय शेतकºयांचे अनेक प्रश्न मांडण्यात आले. श्रावणबाळ लाभार्थ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ करून दरमहा पाच हजार रुपये द्यावे, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विधवांसाठीच्या सामाजिक सहाय्य अनुदानात वाढ करून ती दोन लाख रुपये करावी, बांधकाम पूर्ण झालेल्या तलाठी कार्यालयातून कामकाज सुरू करावे, वीटभट्टी कारखानदारांना शेती अकृषक करूनच परवाने द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख विनोद काकडे, प्रशांत वाऱ्हेकर, शंकर गायधने, वर्षा मोघे, विजय पाटील, गौरव जिड्डेवार, सुरेंद्र भटकर, हनुमान डाखोरे, इंदल राठोड, मंगेश राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी