शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

नेरमध्ये बँकांनी नीलचे दाखले फेकले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

कर्जमाफी झाल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधव कागदाची जुळवाजुळव करत आहे. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत दाखल्यासाठी शेतकरी जातात. तेथे दाखल्यासाठी लागणारे अर्ज बँकेत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र बँकेने हे अर्ज चक्क रस्त्यावर फेकून दिले. बेवारस ठेवलेले अर्ज कुणीही येऊन घेऊन जा अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकांचे धोरण नेहमीच सदोष राहिले आहे.

ठळक मुद्देबँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार : शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज माफी दिली आहे. टप्प्या टप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रक्रियेतील एक भाग म्हणून शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी इतर बँकांचे कर्ज नसल्याचे दाखले आणण्यास सांगितले आहे. नेर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रने नीलचे दाखले चक्क रस्त्यावर फेकल्याचा प्रकार आढळून आला. शेतकऱ्यांना बँकांकडून तुच्छतेची वागणूक दिली जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.कर्जमाफी झाल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधव कागदाची जुळवाजुळव करत आहे. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत दाखल्यासाठी शेतकरी जातात. तेथे दाखल्यासाठी लागणारे अर्ज बँकेत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र बँकेने हे अर्ज चक्क रस्त्यावर फेकून दिले. बेवारस ठेवलेले अर्ज कुणीही येऊन घेऊन जा अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकांचे धोरण नेहमीच सदोष राहिले आहे. आता शासनाने कर्जमाफी केल्यानंतरही बँका नवीन कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांना येरझारा मारायला लावत आहे. बँकेमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य वागणूकही मिळत नाही.अनेक ठिकाणी तर शेतकरी हा टिंगलटवाळीचा विषय झाला आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या दोनही बँकेतील हा प्रकार स्वत: पाहला आहे. महाराष्ट्र बँकेने नीलच्या दाखल्यासाठी लागणारे अर्ज बाहेरच फेकले आहे. यावरून शेतकऱ्यांप्रती बँकेचा दृष्टिकोन काय, हे स्पष्ट होते.कोरोना संसर्गाचा धोका असल्याने गर्दी होऊ नये म्हणून निलचे दाखले बाहेर ठेवण्यात आले आहे. एकच शिपाई आहे. मनुष्यबळाची कमी आहे. दाखल्यांजवळ एकच शिपाई असतो.- मिलिंद कांबळे, व्यवस्थापक,बँक आॅफ महाराष्ट्र, नेर.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज