शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

नेर, बाभूळगाव, घाटंजीला वादळ व पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 8, 2016 01:58 IST

शुक्रवारी सायंकाळी नेर, बाभूळगाव, घाटंजी तालुक्याच्या काही भागाला वादळाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली.

केळीच्या बागा उद्ध्वस्त : घरावरील टीनपत्रे उडाली, झाडे कोसळलीयवतमाळ : शुक्रवारी सायंकाळी नेर, बाभूळगाव, घाटंजी तालुक्याच्या काही भागाला वादळाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. काही घरांचे अंशता नुकसान झाले. नेर तालुक्यात सायंकाळी ७ च्या सुमारास परिसराच्या काही भागात तुरळक, जोराचा पाऊस झाला. या घटनेमुळे १० नागरिक जखमी झाले. टाकळी सलामी येथे एका शेतकऱ्याची केळीची बाग उद्ध्वस्त झाली. एक बोकड व एक बैल ठार झाल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली. घाटंजी तालुक्यात गुरूवारी झालेल्या वादळी पावसाचा कुऱ्हाड, डांगरगाव, पांढुर्णा या गावांना तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. काहींची घरे पडली. कोंडजई येथे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुरली येथे एक बैल तर एक शेळी ठार झाली. तालुक्यात सुमारे ३८९ घरांची पडझड झाल्याची नोंद तालुका दफ्तरी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त भागाची आमदार राजु तोडसाम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव महल्ले, तहसीलदार एम.एम. जोरवर आदी होते. बाभूळगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यात काही हॉटेल, चहा टपऱ्यावरील टिनपत्रे उडाली. प्लास्टिकच्या खुर्च्या दूरवर शेतात जाऊन पडल्या. काहींच्या घरांवरील टिनपत्रेही उडाली. येथील डॉ. रिखबचंद शांतीलालजी जैन यांच्या कोप्रा जानकर शिवारात असलेल्या शेतातील शेडवरील छत उडाले. या शेडमध्ये कांदा ठेऊन होता. पावसामुळे कांदा ओला होऊन मोठे नुकसान झाले. केळीच्या बागांचेही मोठे नुकसान झाले.घारफळ परिसरात गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि तुरळक गारांमुळे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड झाली असून, टीनपत्रे उडाली आहेत. घारफळ, पाचखेड, शिंदी, वरूड, वलीदापूर, रेणुकापूर, परसोडी, सारफळी, फाळेगाव, विरखेड, वाटखेड, येरंडगाव आदी गावात वादळामुळे नुकसान झाले.जिल्ह्याच्या सर्वच भागात गेली दोन दिवसापासून वादळ, पाऊस सुरू आहे. वादळामुळे झोपडीवजा घरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. शनिवारी कळंब परिसराच्या काही भागाला वादळाने झोडपून काढले. काही भागात झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवस झालेल्या वादळामुळे नुकसान किती झाले, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची आस आहे. (लोकमत चमू)