शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

नेर, बाभूळगाव, घाटंजीला वादळ व पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 8, 2016 01:58 IST

शुक्रवारी सायंकाळी नेर, बाभूळगाव, घाटंजी तालुक्याच्या काही भागाला वादळाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली.

केळीच्या बागा उद्ध्वस्त : घरावरील टीनपत्रे उडाली, झाडे कोसळलीयवतमाळ : शुक्रवारी सायंकाळी नेर, बाभूळगाव, घाटंजी तालुक्याच्या काही भागाला वादळाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. काही घरांचे अंशता नुकसान झाले. नेर तालुक्यात सायंकाळी ७ च्या सुमारास परिसराच्या काही भागात तुरळक, जोराचा पाऊस झाला. या घटनेमुळे १० नागरिक जखमी झाले. टाकळी सलामी येथे एका शेतकऱ्याची केळीची बाग उद्ध्वस्त झाली. एक बोकड व एक बैल ठार झाल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली. घाटंजी तालुक्यात गुरूवारी झालेल्या वादळी पावसाचा कुऱ्हाड, डांगरगाव, पांढुर्णा या गावांना तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. काहींची घरे पडली. कोंडजई येथे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुरली येथे एक बैल तर एक शेळी ठार झाली. तालुक्यात सुमारे ३८९ घरांची पडझड झाल्याची नोंद तालुका दफ्तरी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त भागाची आमदार राजु तोडसाम यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव महल्ले, तहसीलदार एम.एम. जोरवर आदी होते. बाभूळगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यात काही हॉटेल, चहा टपऱ्यावरील टिनपत्रे उडाली. प्लास्टिकच्या खुर्च्या दूरवर शेतात जाऊन पडल्या. काहींच्या घरांवरील टिनपत्रेही उडाली. येथील डॉ. रिखबचंद शांतीलालजी जैन यांच्या कोप्रा जानकर शिवारात असलेल्या शेतातील शेडवरील छत उडाले. या शेडमध्ये कांदा ठेऊन होता. पावसामुळे कांदा ओला होऊन मोठे नुकसान झाले. केळीच्या बागांचेही मोठे नुकसान झाले.घारफळ परिसरात गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि तुरळक गारांमुळे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड झाली असून, टीनपत्रे उडाली आहेत. घारफळ, पाचखेड, शिंदी, वरूड, वलीदापूर, रेणुकापूर, परसोडी, सारफळी, फाळेगाव, विरखेड, वाटखेड, येरंडगाव आदी गावात वादळामुळे नुकसान झाले.जिल्ह्याच्या सर्वच भागात गेली दोन दिवसापासून वादळ, पाऊस सुरू आहे. वादळामुळे झोपडीवजा घरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. शनिवारी कळंब परिसराच्या काही भागाला वादळाने झोडपून काढले. काही भागात झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवस झालेल्या वादळामुळे नुकसान किती झाले, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची आस आहे. (लोकमत चमू)