शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

शेतमालाच्या खरेदीस दलालांची नकारघंटा

By admin | Updated: March 24, 2015 01:14 IST

आर्थिक अडचण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांनी शेतमाल खरेदीस असमर्थता

शेतकरी परतले : यवतमाळात १ एप्रिलपर्यंत खरेदी बंद यवतमाळ : आर्थिक अडचण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांनी शेतमाल खरेदीस असमर्थता दर्शविल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर बाजार समितीच्या प्रतिनिधींनी शेतमालाचा हर्रास केला. या प्रकारात शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली. काही शेतकऱ्यांना आपला माल घरी परत न्यावा लागला. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत घडलेल्या प्रकाराने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. खरेदी बंदची कुठलीही सूचना नसल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणला. मात्र दलालांनी हर्रास करण्यास असमर्थता दर्शविली. मार्च एंडींग आणि आर्थिक टंचाईचे कारण त्यांनी पुढे केले. याच प्रकारावरून व्यापारी आणि दलालांमध्ये परस्पर विरोधी मत मांडले गेले. व्यापाऱ्यांनी आर्थिक टंचाई असली तरी माल खरेदीची तयारी दर्शविली. अखेर बाजार समितीने मध्यस्थी केली. आपल्या प्रतिनिधीमार्फत हर्रास केला आणि तो माल व्यापाऱ्यांनी घेतला. जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांनी येथे माल विक्रीसाठी आणला होता. त्यातील केवळ सहा शेतकऱ्यांच्या मालाचाच हर्रास झाला. शिवाय सकाळी ११ ची खरेदी दुपारी २ वाजता सुरू झाली. यावेळी केवळ मोहन राठोड (किन्हाळा), विजय राठोड (लोणाडी), श्रावण जाधव, बळीराम राठोड (लोणाडी), बाबाराव शंभरकर (मांजर्डा) यांचाच शेतमाल खरेदी करण्यात आला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीची तयारी दर्शविली. परंतु पणन महासंघाच्या परवानगीशिवाय या पद्धतीने खरेदी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजुने पिचला गेला आहे. कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतकरी शेतमाल बाजार समितीत घेऊन आले होते. मात्र त्यांची याठिकाणी घोर निराशा झाली. दलालांनी खरेदीमध्ये आडकाठी टाकल्याने त्यांच्याविषयी शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. (शहर वार्ताहर)