शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

शेतमालाच्या खरेदीस दलालांची नकारघंटा

By admin | Updated: March 24, 2015 01:14 IST

आर्थिक अडचण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांनी शेतमाल खरेदीस असमर्थता

शेतकरी परतले : यवतमाळात १ एप्रिलपर्यंत खरेदी बंद यवतमाळ : आर्थिक अडचण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांनी शेतमाल खरेदीस असमर्थता दर्शविल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर बाजार समितीच्या प्रतिनिधींनी शेतमालाचा हर्रास केला. या प्रकारात शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली. काही शेतकऱ्यांना आपला माल घरी परत न्यावा लागला. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत घडलेल्या प्रकाराने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. खरेदी बंदची कुठलीही सूचना नसल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणला. मात्र दलालांनी हर्रास करण्यास असमर्थता दर्शविली. मार्च एंडींग आणि आर्थिक टंचाईचे कारण त्यांनी पुढे केले. याच प्रकारावरून व्यापारी आणि दलालांमध्ये परस्पर विरोधी मत मांडले गेले. व्यापाऱ्यांनी आर्थिक टंचाई असली तरी माल खरेदीची तयारी दर्शविली. अखेर बाजार समितीने मध्यस्थी केली. आपल्या प्रतिनिधीमार्फत हर्रास केला आणि तो माल व्यापाऱ्यांनी घेतला. जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांनी येथे माल विक्रीसाठी आणला होता. त्यातील केवळ सहा शेतकऱ्यांच्या मालाचाच हर्रास झाला. शिवाय सकाळी ११ ची खरेदी दुपारी २ वाजता सुरू झाली. यावेळी केवळ मोहन राठोड (किन्हाळा), विजय राठोड (लोणाडी), श्रावण जाधव, बळीराम राठोड (लोणाडी), बाबाराव शंभरकर (मांजर्डा) यांचाच शेतमाल खरेदी करण्यात आला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीची तयारी दर्शविली. परंतु पणन महासंघाच्या परवानगीशिवाय या पद्धतीने खरेदी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजुने पिचला गेला आहे. कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतकरी शेतमाल बाजार समितीत घेऊन आले होते. मात्र त्यांची याठिकाणी घोर निराशा झाली. दलालांनी खरेदीमध्ये आडकाठी टाकल्याने त्यांच्याविषयी शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. (शहर वार्ताहर)