शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या खरेदीस दलालांची नकारघंटा

By admin | Updated: March 24, 2015 01:14 IST

आर्थिक अडचण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांनी शेतमाल खरेदीस असमर्थता

शेतकरी परतले : यवतमाळात १ एप्रिलपर्यंत खरेदी बंद यवतमाळ : आर्थिक अडचण पुढे करीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांनी शेतमाल खरेदीस असमर्थता दर्शविल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर बाजार समितीच्या प्रतिनिधींनी शेतमालाचा हर्रास केला. या प्रकारात शेतकऱ्यांची मात्र कोंडी झाली. काही शेतकऱ्यांना आपला माल घरी परत न्यावा लागला. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत घडलेल्या प्रकाराने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. खरेदी बंदची कुठलीही सूचना नसल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणला. मात्र दलालांनी हर्रास करण्यास असमर्थता दर्शविली. मार्च एंडींग आणि आर्थिक टंचाईचे कारण त्यांनी पुढे केले. याच प्रकारावरून व्यापारी आणि दलालांमध्ये परस्पर विरोधी मत मांडले गेले. व्यापाऱ्यांनी आर्थिक टंचाई असली तरी माल खरेदीची तयारी दर्शविली. अखेर बाजार समितीने मध्यस्थी केली. आपल्या प्रतिनिधीमार्फत हर्रास केला आणि तो माल व्यापाऱ्यांनी घेतला. जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांनी येथे माल विक्रीसाठी आणला होता. त्यातील केवळ सहा शेतकऱ्यांच्या मालाचाच हर्रास झाला. शिवाय सकाळी ११ ची खरेदी दुपारी २ वाजता सुरू झाली. यावेळी केवळ मोहन राठोड (किन्हाळा), विजय राठोड (लोणाडी), श्रावण जाधव, बळीराम राठोड (लोणाडी), बाबाराव शंभरकर (मांजर्डा) यांचाच शेतमाल खरेदी करण्यात आला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीची तयारी दर्शविली. परंतु पणन महासंघाच्या परवानगीशिवाय या पद्धतीने खरेदी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजुने पिचला गेला आहे. कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेतकरी शेतमाल बाजार समितीत घेऊन आले होते. मात्र त्यांची याठिकाणी घोर निराशा झाली. दलालांनी खरेदीमध्ये आडकाठी टाकल्याने त्यांच्याविषयी शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. (शहर वार्ताहर)