शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असलेले डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी आपला जीवनक्रम, सामाजिक कार्य, मिळालेली प्रेरणा, समाजापुढील समस्या यावेळी मांडल्या.

ठळक मुद्देप्रकाश व मंदाकिनी आमटे : प्रकट मुलाखतीत मांडले अनुभव, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगभरात आज आदिवासींची सुमारे दहा कोटी लोकसंख्या आहे. समाजातील प्रत्येकाने त्यांना यथार्थ मदत करावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावावा, कारण आजही या समाजातील काही लोक दारिद्र्य, भूकबळी यासारख्या समस्यांनी ग्रस्त आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून नवनवीन उपकरणांद्वारे आदिवासींचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांनी प्रकट मुलाखतीत मांडले.येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असलेले डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी आपला जीवनक्रम, सामाजिक कार्य, मिळालेली प्रेरणा, समाजापुढील समस्या यावेळी मांडल्या.विवाह अत्यंत साध्या पद्धतीने आणि रविवारच्या मुहुर्तावर संपन्न झाला. समाजकार्याची प्रेरणा डॉक्टरकीचे शिक्षण घेतल्यानंतर बाबा व तार्इंच्या संस्कारातून मिळाली. इतर क्षेत्राचा विचारही मनात शिरला नाही. लोकबिरादरी प्रकल्पात वीज, पाणी, रस्त्याचा अभाव असल्याने काम करणे अत्यंत खडतर प्रवास होता. सुरुवातीला माडिया या आदिवासी लोकांबरोबर संवादात अनेक अडचणी येत होत्या. डॉ. मंदाकिनी आमटे यांनी स्थानिक आदिवासींची भाषा व मराठी भाषा यासंदर्भात एक छोटा शब्दकोष तयार करून संभाषणाच्या समस्येवर मात केली. त्यामुळे या लोकांमध्ये जवळीक वाढली व त्यांच्या आरोग्य समस्यांवर उपचार करणे सोपे झाले.आजच्या परिस्थितीत कोरोनासारख्या व्हायरसद्वारे होणारे संक्रमण हा प्रश्न निसर्गाचा समतोल न राखल्यामुळेच उद्भवला आहे. मानवाने आपल्या गरजा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल राखावा, पर्यावरणाचा ºहास टाळावा, असे आवाहन डॉ. आमटे यांनी केले.लोकबिरादरीतून आर्थिक संपन्नतेकडेलोकबिरादरी प्रकल्पाद्वारे जलसंधारणाचे उपक्रम राबविले जात आहे. त्याद्वारे मत्स्य उत्पादनासारखे उद्योग उभारून आदिवासी आर्थिक संपन्नतेकडे जात आहे. शेतीकडेसुद्धा लक्ष देऊन अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यात त्यांची तिसरी पिढी डॉ. अनिकेत व स्नूषा अनघा अग्रेसर आहे. आदिवासी भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करून उच्च शिक्षणाची दालनेसुद्धा उपलब्ध करून दिली जात आहे, असे डॉ. आमटे म्हणाले.