शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असलेले डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी आपला जीवनक्रम, सामाजिक कार्य, मिळालेली प्रेरणा, समाजापुढील समस्या यावेळी मांडल्या.

ठळक मुद्देप्रकाश व मंदाकिनी आमटे : प्रकट मुलाखतीत मांडले अनुभव, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याचे केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगभरात आज आदिवासींची सुमारे दहा कोटी लोकसंख्या आहे. समाजातील प्रत्येकाने त्यांना यथार्थ मदत करावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावावा, कारण आजही या समाजातील काही लोक दारिद्र्य, भूकबळी यासारख्या समस्यांनी ग्रस्त आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करून नवनवीन उपकरणांद्वारे आदिवासींचा जीवनस्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांनी प्रकट मुलाखतीत मांडले.येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांची प्रगट मुलाखत पार पडली. त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे वाचन यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविस्कर यांनी केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संस्थापक असलेले डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी यांनी आपला जीवनक्रम, सामाजिक कार्य, मिळालेली प्रेरणा, समाजापुढील समस्या यावेळी मांडल्या.विवाह अत्यंत साध्या पद्धतीने आणि रविवारच्या मुहुर्तावर संपन्न झाला. समाजकार्याची प्रेरणा डॉक्टरकीचे शिक्षण घेतल्यानंतर बाबा व तार्इंच्या संस्कारातून मिळाली. इतर क्षेत्राचा विचारही मनात शिरला नाही. लोकबिरादरी प्रकल्पात वीज, पाणी, रस्त्याचा अभाव असल्याने काम करणे अत्यंत खडतर प्रवास होता. सुरुवातीला माडिया या आदिवासी लोकांबरोबर संवादात अनेक अडचणी येत होत्या. डॉ. मंदाकिनी आमटे यांनी स्थानिक आदिवासींची भाषा व मराठी भाषा यासंदर्भात एक छोटा शब्दकोष तयार करून संभाषणाच्या समस्येवर मात केली. त्यामुळे या लोकांमध्ये जवळीक वाढली व त्यांच्या आरोग्य समस्यांवर उपचार करणे सोपे झाले.आजच्या परिस्थितीत कोरोनासारख्या व्हायरसद्वारे होणारे संक्रमण हा प्रश्न निसर्गाचा समतोल न राखल्यामुळेच उद्भवला आहे. मानवाने आपल्या गरजा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. निसर्गाचा समतोल राखावा, पर्यावरणाचा ºहास टाळावा, असे आवाहन डॉ. आमटे यांनी केले.लोकबिरादरीतून आर्थिक संपन्नतेकडेलोकबिरादरी प्रकल्पाद्वारे जलसंधारणाचे उपक्रम राबविले जात आहे. त्याद्वारे मत्स्य उत्पादनासारखे उद्योग उभारून आदिवासी आर्थिक संपन्नतेकडे जात आहे. शेतीकडेसुद्धा लक्ष देऊन अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यात त्यांची तिसरी पिढी डॉ. अनिकेत व स्नूषा अनघा अग्रेसर आहे. आदिवासी भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करून उच्च शिक्षणाची दालनेसुद्धा उपलब्ध करून दिली जात आहे, असे डॉ. आमटे म्हणाले.