शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तहसील व ठाण्यात तंटामुक्त समितीची आवश्यकता

By admin | Updated: November 12, 2014 22:51 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या अंमलात आल्यानंतर बहुतांश गावामध्ये तंटे याचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. काही ठिकाणी गाव तंटामुक्त समित्या असल्या तरी त्या गावातील तंटे थेट

पुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या अंमलात आल्यानंतर बहुतांश गावामध्ये तंटे याचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. काही ठिकाणी गाव तंटामुक्त समित्या असल्या तरी त्या गावातील तंटे थेट पोलीस ठाण्यापर्यंत येत आहेत. पोलिसांना खऱ्या अर्थाने तंटामुक्तीसाठी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी तहसील आणि ठाण्यात तंटामुक्त समित्यांची आवश्यकता आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राज्य शासनाने २००७ मध्ये अंमलात आणली. या मोहिमेचा चांगला प्रभाव पडला असून अनेक गावे तंटामुक्त झालीत. ही मोहीम खऱ्या अर्थाने राबवायची असेल तर प्रत्येक तहसील व ठाण्यातदेखील तंटामुक्त समिती गठित केल्यास कदाचित गावातून येणारी भानगड ही त्या-त्या तहसील व ठाण्यातील तंटामुक्त समिती समोर ठेवल्यास तो वाद तिथे मिटविण्यास सोईस्कर होईल आणि तहसील व पोलिसांना रजिस्टरमध्ये गुन्ह्याची नोंद करण्याची गरज भासणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी गाव पंचायत असायच्या. त्या गावात कधी भानगड झाली तर त्याचा निर्णय ती पंचायत घेत असे आणि पंचायतने केलेली निर्णय अंतिम असायचा. पंचायतीचा निर्णय कोणी डावलला तर त्याला गावात कोणीही थारा देत नव्हते. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. तंटामुक्त समितीने गावात तंटे मिटविण्याचा किती प्रयत्न केला तर दुसरा गट त्याला भडकावून पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी प्रोत्साहन देत असल्यामुळेच तंटामुक्त समितीला गावातील तंटे मिटविण्यासाठी अनेक ठिकाणी अपयश येत आहे. गावातील तंटामुक्त समितीला एखादी भानगड मिटविण्यास यश आले नाही. दोन्ही बाजूंनी एकले नाही तर तयची समजूत काढण्यासाठी प्रथम पोलीस स्टेशनमध्ये तंटामुक्त समिती स्थापन करून दोन्ही गटाला समजावून त्यांच्याती आपसातील वाद हा दोघांचे बयाण नोंदवून त्या ठिकाणी मिटविण्यास मदत होवू शकते. म्हणून गावागावात ज्या महात्मा गांधी तंटामुक्त समित्या आहेत तर प्रत्येक ठाण्यात देखील तंटामुक्त समित्या गठित केल्यास पोलिसांना क्षुल्लक कारणांवरून गुन्हे नोंदवण्याची वेळच येणार नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व पोलीस अधीक्षकांनी आपले अधिकार वापरून प्रत्येक तहसील व ठाण्यात तंटामुक्त समित्या गठित करण्याचे अधिकार आपल्या अधिकाऱ्यांना द्यावे. खऱ्या अर्थाने गाव, तहसील व जिल्हा तंटामुक्त होईल. तसेच जमिनी, जागा, रस्ते यावरूनही अनेक वाद उभे राहतात. व त्या वादातूनच मग गावातील एकमेकांविषयीचे मतभेद हे वाढून त्याचे तंट्यात पर्यावसन होते. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तलाठ्यांना वाद मिटविण्याचे अधिकार दिल्यास याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. (तालुका प्रतिनिधी)