शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना उभारी देणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज

By admin | Updated: January 18, 2015 22:47 IST

शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात

विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. शेतकऱ्यांना उभारी देणारे लढण्यासाठी प्रवृत्त करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे, असा सूर राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनात आयोजित ‘शेतकरी आत्महत्या आणि मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात निघाला. डॉ.शेषराव मोहिते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. हेच शेतकरी आत्महत्येचे खरे कारण आहे. शेतातील अतिरिक्त मनुष्यबळ शेती व्यवसायातून बाहेर पडून पूरक व्यवसाय निर्माण करणे गरजेचे आहे, असे म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीच्या दुराभिमानात अडकून न राहता बाहेर पडून उद्योगाची कास धरण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थकारणाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. ही भूमिका आता साहित्याने जोपासावी, असे डॉ. मोहिते म्हणाले. साहित्यिक सुनील यावलीकर म्हणाले, साहित्य हे माणस जोडण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे कुत्सित नजरेने पाहिले जाते, हे वास्तव आहे. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दातृत्वामध्ये आहे. सध्या ‘खाऊजा’ संस्कृतीमुळे माणसातला माणूस कमी केला आहे. सध्या ग्राहकीकरणाचा आलेख वाढला असून तो खाली आणावा लागेल. १९४० ते १९६० च्या दरम्यान फडतूस साहित्याची निर्मिती झाल्याची टीका करताना यावलीकर म्हणाले, हिंदीमध्ये प्रेमचंद शेतकऱ्यांचे दु:ख मांडत होते. बिमल रॉय सारखे दिग्दर्शक दो बिघा जमीन या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या वेदना मांडत होते. मात्र मराठी साहित्यातून शेतकऱ्यांच्या भावभावना मांडल्या जात नव्हत्या, ही खंत आहे. शेतकऱ्यांना उभारी देणारे, लढण्याची प्रवृत्ती करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी माने म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी नेमलेल्या डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी सरकारने लागू करणे गरजेचे आहे. तर शेतकरी आत्महत्या थांबतील. शेतकरी व उपेक्षितांच्या समस्यांवर साहित्य संमेलनात चर्चा घडून येत नसल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वि.ना. कदम म्हणाले, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या संघटनांना शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. (लोकमत चमू)