शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शेतकऱ्यांना उभारी देणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज

By admin | Updated: January 18, 2015 22:47 IST

शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात

विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. शेतकऱ्यांना उभारी देणारे लढण्यासाठी प्रवृत्त करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे, असा सूर राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनात आयोजित ‘शेतकरी आत्महत्या आणि मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात निघाला. डॉ.शेषराव मोहिते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. हेच शेतकरी आत्महत्येचे खरे कारण आहे. शेतातील अतिरिक्त मनुष्यबळ शेती व्यवसायातून बाहेर पडून पूरक व्यवसाय निर्माण करणे गरजेचे आहे, असे म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीच्या दुराभिमानात अडकून न राहता बाहेर पडून उद्योगाची कास धरण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थकारणाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. ही भूमिका आता साहित्याने जोपासावी, असे डॉ. मोहिते म्हणाले. साहित्यिक सुनील यावलीकर म्हणाले, साहित्य हे माणस जोडण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे कुत्सित नजरेने पाहिले जाते, हे वास्तव आहे. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दातृत्वामध्ये आहे. सध्या ‘खाऊजा’ संस्कृतीमुळे माणसातला माणूस कमी केला आहे. सध्या ग्राहकीकरणाचा आलेख वाढला असून तो खाली आणावा लागेल. १९४० ते १९६० च्या दरम्यान फडतूस साहित्याची निर्मिती झाल्याची टीका करताना यावलीकर म्हणाले, हिंदीमध्ये प्रेमचंद शेतकऱ्यांचे दु:ख मांडत होते. बिमल रॉय सारखे दिग्दर्शक दो बिघा जमीन या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या वेदना मांडत होते. मात्र मराठी साहित्यातून शेतकऱ्यांच्या भावभावना मांडल्या जात नव्हत्या, ही खंत आहे. शेतकऱ्यांना उभारी देणारे, लढण्याची प्रवृत्ती करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी माने म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी नेमलेल्या डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी सरकारने लागू करणे गरजेचे आहे. तर शेतकरी आत्महत्या थांबतील. शेतकरी व उपेक्षितांच्या समस्यांवर साहित्य संमेलनात चर्चा घडून येत नसल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वि.ना. कदम म्हणाले, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या संघटनांना शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. (लोकमत चमू)