शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शेतकऱ्यांना उभारी देणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज

By admin | Updated: January 18, 2015 22:47 IST

शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात

विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : शेतकऱ्यांच्या संघटनांना आतापर्यंत शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज असून साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी. शेतकऱ्यांना उभारी देणारे लढण्यासाठी प्रवृत्त करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे, असा सूर राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनात आयोजित ‘शेतकरी आत्महत्या आणि मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात निघाला. डॉ.शेषराव मोहिते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. हेच शेतकरी आत्महत्येचे खरे कारण आहे. शेतातील अतिरिक्त मनुष्यबळ शेती व्यवसायातून बाहेर पडून पूरक व्यवसाय निर्माण करणे गरजेचे आहे, असे म्हणाले. शेतकऱ्यांनी शेतीच्या दुराभिमानात अडकून न राहता बाहेर पडून उद्योगाची कास धरण्याची गरज आहे. त्यासाठी अर्थकारणाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. ही भूमिका आता साहित्याने जोपासावी, असे डॉ. मोहिते म्हणाले. साहित्यिक सुनील यावलीकर म्हणाले, साहित्य हे माणस जोडण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे कुत्सित नजरेने पाहिले जाते, हे वास्तव आहे. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान दातृत्वामध्ये आहे. सध्या ‘खाऊजा’ संस्कृतीमुळे माणसातला माणूस कमी केला आहे. सध्या ग्राहकीकरणाचा आलेख वाढला असून तो खाली आणावा लागेल. १९४० ते १९६० च्या दरम्यान फडतूस साहित्याची निर्मिती झाल्याची टीका करताना यावलीकर म्हणाले, हिंदीमध्ये प्रेमचंद शेतकऱ्यांचे दु:ख मांडत होते. बिमल रॉय सारखे दिग्दर्शक दो बिघा जमीन या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या वेदना मांडत होते. मात्र मराठी साहित्यातून शेतकऱ्यांच्या भावभावना मांडल्या जात नव्हत्या, ही खंत आहे. शेतकऱ्यांना उभारी देणारे, लढण्याची प्रवृत्ती करणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी माने म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी नेमलेल्या डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी सरकारने लागू करणे गरजेचे आहे. तर शेतकरी आत्महत्या थांबतील. शेतकरी व उपेक्षितांच्या समस्यांवर साहित्य संमेलनात चर्चा घडून येत नसल्याचे त्यांनी सांगितले. परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वि.ना. कदम म्हणाले, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या संघटनांना शेतकऱ्यांचे हित जोपासण्यात अपयश आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. (लोकमत चमू)