शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

पोलीस व जनतेत सुसंवादाची गरज

By admin | Updated: May 14, 2017 01:18 IST

कोणतेही शहर संवेदनशील नसते. ती प्रवृत्ती असते. पोलीस कर्मचाऱ्याला जात, धर्म, पंथ नसतो. तो पोलीस म्हणून आपले कार्य करीत असतो.

अमरसिंग जाधव : पुसद येथे शांतता समितीची सभा लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : कोणतेही शहर संवेदनशील नसते. ती प्रवृत्ती असते. पोलीस कर्मचाऱ्याला जात, धर्म, पंथ नसतो. तो पोलीस म्हणून आपले कार्य करीत असतो. जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन पोलीस प्रशासन व जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी पोलीस-जनता सुसंवाद राहावा, पोलिसांनी आपण जनतेचा मित्र आहो ही भावना ठेऊन कर्तव्य पार पाडावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांनी शांतता समिती सभेत केले. यवतमाळ जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्यानंतर अमरसिंग जाधव यांनी पुसद शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील सुधाकरराव नाईक सभागृहात शांतता कमिटीची बैठक घेतली. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, शहर ठाणेदार वाघू खिल्लारे, ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगादाळे उपस्थि होते. या बैठकीत भीमराव कांबळे, नगरसेवक निखील चिद्दरवार, रेश्मा लोखंडे, संजय हनवते यांनी शहरातील समस्या मांडल्या. यावेळी बोलताना अमरसिंग जाधव म्हणाले पुसदची जुनी शांतता समितीची कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी गठीत करावी. डॉक्टर, शिक्षक, समाजसेवक, पत्रकार, व्यापारी, लोकप्रतिनिधी अशा कार्यतत्पर लोकांना समितीत घ्यावे, असे सांगितले. तसेच शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार यांना घेऊन समिती गठीत करा, पोलिसांची कारवाई नि:पक्ष राहावी यासाठी डिवायएसपी बन्सल यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले. या बैठकीला निखील चिद्दरवार, राजू कोटलवार, ताहेर खान पठाण, अनिस चव्हाण, ललित सेता, अनिल चेंटकाळे आदी उपस्थित होते.