शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीतून राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.

ठळक मुद्देआमदार ख्वाजा बेग : सरकारने आता थापा मारणे थांबवावे, आधी आश्वासने पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.आर्णी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जवाब दो पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारवर सडकून टीका केली. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी विविध घोषणा दिल्या होत्या. जनतेला अनेक आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या हाती काहीच पडले नाही, असा आरोप त्यांनी केला. याचाच जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जवाब दो पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शासनाने शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला, व्यापारी या सर्वांसाठी काहीही ठोस केले नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जात नाही. कर्जमाफी पूर्णपणे झाली नाही. अनेकांना पीककर्ज मिळाले नाही. बोंडअळीचे अनुदानसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार बेग यांनी केला. पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. वसंतराव घुईखेडकर, नाना गाडबैले, क्रांती धोटे, डॉ.आरती फुपाटे, मनीषा काटे, बाजार समिती सभापती राजू पाटील, पी.जी. राठोड, वर्षा निकम, गोपाल कोठारी, चिराग शहा, स्वाती व्यवहारे, उमा शिवरामवार, अंजली खंदार, शेषराव राठोड, रवी नालमवार, राजेंद्र शिवरामवार आदी उपस्थित होते.पायदळ दिंडी काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का ?काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायदळ दिंडी काढून शेतमालाला रास्त भाव मागितले होते. त्यांनी कापसाला प्रतिक्विंटल सात हजार तर सोयाबीनला पाच हजारांची मागणी केली होती. आता त्यांचेच सरकार असूनही ते गुपचूप का, असा सवाल आमदार ख्वाजा बेग यांनी केला. याचा जाब त्यांनी जनतेला द्यावा, असे आवाहनही त्यांनी दिले.