शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
4
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
7
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
8
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
9
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
10
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
11
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
12
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
13
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
14
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
15
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
16
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
17
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
18
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
19
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
20
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?

आर्णीतून राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.

ठळक मुद्देआमदार ख्वाजा बेग : सरकारने आता थापा मारणे थांबवावे, आधी आश्वासने पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.आर्णी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जवाब दो पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारवर सडकून टीका केली. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी विविध घोषणा दिल्या होत्या. जनतेला अनेक आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या हाती काहीच पडले नाही, असा आरोप त्यांनी केला. याचाच जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जवाब दो पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शासनाने शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला, व्यापारी या सर्वांसाठी काहीही ठोस केले नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जात नाही. कर्जमाफी पूर्णपणे झाली नाही. अनेकांना पीककर्ज मिळाले नाही. बोंडअळीचे अनुदानसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार बेग यांनी केला. पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. वसंतराव घुईखेडकर, नाना गाडबैले, क्रांती धोटे, डॉ.आरती फुपाटे, मनीषा काटे, बाजार समिती सभापती राजू पाटील, पी.जी. राठोड, वर्षा निकम, गोपाल कोठारी, चिराग शहा, स्वाती व्यवहारे, उमा शिवरामवार, अंजली खंदार, शेषराव राठोड, रवी नालमवार, राजेंद्र शिवरामवार आदी उपस्थित होते.पायदळ दिंडी काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का ?काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायदळ दिंडी काढून शेतमालाला रास्त भाव मागितले होते. त्यांनी कापसाला प्रतिक्विंटल सात हजार तर सोयाबीनला पाच हजारांची मागणी केली होती. आता त्यांचेच सरकार असूनही ते गुपचूप का, असा सवाल आमदार ख्वाजा बेग यांनी केला. याचा जाब त्यांनी जनतेला द्यावा, असे आवाहनही त्यांनी दिले.