शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आर्णीतून राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.

ठळक मुद्देआमदार ख्वाजा बेग : सरकारने आता थापा मारणे थांबवावे, आधी आश्वासने पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला.आर्णी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जवाब दो पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारवर सडकून टीका केली. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी विविध घोषणा दिल्या होत्या. जनतेला अनेक आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या हाती काहीच पडले नाही, असा आरोप त्यांनी केला. याचाच जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जवाब दो पदयात्रा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शासनाने शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला, व्यापारी या सर्वांसाठी काहीही ठोस केले नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला जात नाही. कर्जमाफी पूर्णपणे झाली नाही. अनेकांना पीककर्ज मिळाले नाही. बोंडअळीचे अनुदानसुद्धा मिळाले नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार बेग यांनी केला. पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. वसंतराव घुईखेडकर, नाना गाडबैले, क्रांती धोटे, डॉ.आरती फुपाटे, मनीषा काटे, बाजार समिती सभापती राजू पाटील, पी.जी. राठोड, वर्षा निकम, गोपाल कोठारी, चिराग शहा, स्वाती व्यवहारे, उमा शिवरामवार, अंजली खंदार, शेषराव राठोड, रवी नालमवार, राजेंद्र शिवरामवार आदी उपस्थित होते.पायदळ दिंडी काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का ?काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायदळ दिंडी काढून शेतमालाला रास्त भाव मागितले होते. त्यांनी कापसाला प्रतिक्विंटल सात हजार तर सोयाबीनला पाच हजारांची मागणी केली होती. आता त्यांचेच सरकार असूनही ते गुपचूप का, असा सवाल आमदार ख्वाजा बेग यांनी केला. याचा जाब त्यांनी जनतेला द्यावा, असे आवाहनही त्यांनी दिले.