शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

नयनतारा तू जर आली असती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:34 IST

संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले.

ठळक मुद्देनिमंत्रितांचे कविसंमेलन : ज्वलंत विषयांना वाचा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :इथल्या विधवांच्या कपाळावर ज्यांनी कोरलं वैधव्य, त्यांना कशी चपराक बसली असती,नयनतारा तू जर आली असतीदेश स्वतंत्र झाला सत्तेच्या समीकरणातगुलामीच्या मानसिकता घट्ट झाल्यातसेच पुरूषत्व षंढ झालेमाणुसकीचे उभे धिंगाणे झाले‘कोणी चोर कोणी शिरजोर’ या कुसूम अलाम यांच्या कवितेने उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले.शायर भाऊसाहेब पाटणकर परिसरातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शुक्रवारी रात्री मान्यवरांचे कविसंमेलन रंगले. यावेळी राज्यभरातून आलेल्या ४५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे विलास वैद्य होते.कुसूम अलाम यांनी जोहान्सबर्गमधील जागतिक परिषदेत महिला या विषयावर मत मांडले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनीही आपल्या भाषणात त्यांच्या लेखनाचा आणि कवितेचा उल्लेख केला होता. अशावेळी अलाम यांनी कविसंमेलनातही ‘नयनतारा’ सादर करून सर्वांना अंतर्मुख केले. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत रंगलेले कविसंमेलन रसिकांसाठी मेजवानी ठरले.समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणेमी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणेनिसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यांतर्गत येणाºया पोहंडूळ येथील कवी, गझलकार आबेद शेख यांनी सादर केली.पाजून सत्तेस सांगा आज केले तुल कोणी,काय चलनाची गुलाबी ही दिली का भूल कोणीया गझलेने सत्ताधाºयांचा खरा चेहराच उघड केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कविसंमेलनाने प्रचंड गर्दी खेचली, खिळवून ठेवली. अनेक कवितांना ‘वन्स मोअर’ मिळाला.शेतकरी आत्महत्या आणि सध्याची सामाजिक स्थिती बहुतांश कवींच्या रचनांमधून डोकावताना दिसली. परळी वैजनाथ (बिड) येथील अरुण पवार यांनी मायबापाचे होणारे हाल मांडले.वायले राहिले मुलं, दोघांची वाटणीमाय परसात, बाप गोठ्याचा धनीया त्यांच्या रचनेने टाळ्यांची दाद मिळविली. अकोल्याचे कवी प्रशांत असनारे यांनी मुक्तछंदातून ‘माणूस’ टिपला.देव म्हणाला,तुला काहीच कसं जमत नाहीजा! तू माणूस होतेव्हापासून मी हा असामाणूस म्हणून जगतोयया कवितेवर त्यांनी रसिकांची दाद मिळविली. हिंगोलीचे विलास वैद्य यांच्या अध्यक्षतेत रंगलेल्या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन योगीराज माने यांनी केले. अभय दाणी यांनी भौतिक विश्वात माणसाचे स्वत:शी चाललेले युद्ध आपल्या कवितेत मांडले.या दिवसभराच्या पेटलेल्या हातांनी मीतुझा मेणाचा पुतळा उभा केला रात्रीतून तरतू सकाळी हा राजतिलक लावलास माथ्यावर माझ्यामी घोड्यावर बसूनपुन्हा युद्धभूमीवरसंमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले. चंद्रपूरच्या माधवी भट यांनी ‘गंगार्पण’ ही गझल सादर केली.इथे तू जगावे, तुला तू मिळावेतुझा दीप पात्रात, मी सोडलापुण्याच्या अपर्णा मोहिले, विनोद बुरबुरे, विद्धार्थ भगत, नीलकृष्ण देशपांडे, नितीन नायगावकर आदींनी आपल्या कवितांमधून रसिकांची मनेजिंकली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन