शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

नयनतारा तू जर आली असती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:34 IST

संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले.

ठळक मुद्देनिमंत्रितांचे कविसंमेलन : ज्वलंत विषयांना वाचा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :इथल्या विधवांच्या कपाळावर ज्यांनी कोरलं वैधव्य, त्यांना कशी चपराक बसली असती,नयनतारा तू जर आली असतीदेश स्वतंत्र झाला सत्तेच्या समीकरणातगुलामीच्या मानसिकता घट्ट झाल्यातसेच पुरूषत्व षंढ झालेमाणुसकीचे उभे धिंगाणे झाले‘कोणी चोर कोणी शिरजोर’ या कुसूम अलाम यांच्या कवितेने उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले.शायर भाऊसाहेब पाटणकर परिसरातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शुक्रवारी रात्री मान्यवरांचे कविसंमेलन रंगले. यावेळी राज्यभरातून आलेल्या ४५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे विलास वैद्य होते.कुसूम अलाम यांनी जोहान्सबर्गमधील जागतिक परिषदेत महिला या विषयावर मत मांडले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनीही आपल्या भाषणात त्यांच्या लेखनाचा आणि कवितेचा उल्लेख केला होता. अशावेळी अलाम यांनी कविसंमेलनातही ‘नयनतारा’ सादर करून सर्वांना अंतर्मुख केले. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत रंगलेले कविसंमेलन रसिकांसाठी मेजवानी ठरले.समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणेमी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणेनिसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यांतर्गत येणाºया पोहंडूळ येथील कवी, गझलकार आबेद शेख यांनी सादर केली.पाजून सत्तेस सांगा आज केले तुल कोणी,काय चलनाची गुलाबी ही दिली का भूल कोणीया गझलेने सत्ताधाºयांचा खरा चेहराच उघड केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कविसंमेलनाने प्रचंड गर्दी खेचली, खिळवून ठेवली. अनेक कवितांना ‘वन्स मोअर’ मिळाला.शेतकरी आत्महत्या आणि सध्याची सामाजिक स्थिती बहुतांश कवींच्या रचनांमधून डोकावताना दिसली. परळी वैजनाथ (बिड) येथील अरुण पवार यांनी मायबापाचे होणारे हाल मांडले.वायले राहिले मुलं, दोघांची वाटणीमाय परसात, बाप गोठ्याचा धनीया त्यांच्या रचनेने टाळ्यांची दाद मिळविली. अकोल्याचे कवी प्रशांत असनारे यांनी मुक्तछंदातून ‘माणूस’ टिपला.देव म्हणाला,तुला काहीच कसं जमत नाहीजा! तू माणूस होतेव्हापासून मी हा असामाणूस म्हणून जगतोयया कवितेवर त्यांनी रसिकांची दाद मिळविली. हिंगोलीचे विलास वैद्य यांच्या अध्यक्षतेत रंगलेल्या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन योगीराज माने यांनी केले. अभय दाणी यांनी भौतिक विश्वात माणसाचे स्वत:शी चाललेले युद्ध आपल्या कवितेत मांडले.या दिवसभराच्या पेटलेल्या हातांनी मीतुझा मेणाचा पुतळा उभा केला रात्रीतून तरतू सकाळी हा राजतिलक लावलास माथ्यावर माझ्यामी घोड्यावर बसूनपुन्हा युद्धभूमीवरसंमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले. चंद्रपूरच्या माधवी भट यांनी ‘गंगार्पण’ ही गझल सादर केली.इथे तू जगावे, तुला तू मिळावेतुझा दीप पात्रात, मी सोडलापुण्याच्या अपर्णा मोहिले, विनोद बुरबुरे, विद्धार्थ भगत, नीलकृष्ण देशपांडे, नितीन नायगावकर आदींनी आपल्या कवितांमधून रसिकांची मनेजिंकली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन