शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

नक्षलग्रस्त ३५ गावे अंधारात

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

विद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही.

अब्दुल मतीन - पारवाविद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही. गेली अनेक वर्षांपासूनची ही समस्या वीज कंपनीने सोडविली नाही. परिणामी या नक्षलग्रस्त भागातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागते. याचा पुन्हा अनुभव शनिवारी रात्री आला. रात्री ८.३0 वाजता गूल झालेली वीज रविवारी दुपारी १ वाजता सुरू झाली. जीवाची काहिली करणार्‍या उन्हामुळे त्रस्त नागरिकांना रात्रीच्यावेळी थंड हवेची गरज आहे. परंतु वीज पुरवठाच खंडित झाल्याने डासांचा प्रादुर्भाव आणि घामाच्या धारा झेलत तब्बल ३५ गावातील नागरिकांना रात्र काढावी लागली. परिसरात शनिवारी वादळ-वारा नसतानाही वीज पुरवठा खंडित का झाला, हा न समजणारा प्रश्न होता. एरवी थोड्याही वार्‍याने वीज खंडित होते. या भागातील वीज तारा लोंबकळणार्‍या आहे. त्यामुळे विद्युत कंपनी कुठलीही जोखीम न स्वीकारता वीज पुरवठा खंडित करते. परंतु कायमस्वरूपी उपाय शोधला जात नाही. नागरिकांनी कित्येकदा तक्रारी केल्यानंतरही कंपनीला जाग येत नाही. मोर्चे, आंदोलने केल्यानंतरही समस्या निकाली काढली जात नाही. या समस्येने नागरिकांना भंडावून सोडले आहे. आठवड्यातून कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. या भागात भारनियमन नसले तरी त्यापेक्षाही मोठी शिक्षा खंडित वीज पुरवठय़ाच्या रूपाने भोगावी लागत आहे. या भागातील बहुतांश गावे जंगलालगत आहे. टिपेश्‍वर अभयारण्य काही अंतरावर आहे. वन्य जीवांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. जनावरे ठार करण्यात आली. अशा स्थितीत परिसरातील वीज पुरवठा खंडित होवू नये, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परिसरात सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना अखंडित वीज मिळावी. ही उपाययोजनाही नियोजन आणि उदासीनतेमुळे फेल ठरली आहे. याशिवाय नागरिकांना वापरापेक्षा जादा युनिटचे बिल दिले जाते. तक्रारी केल्यानंतरही हा प्रश्न निकाली काढला जात नाही. घाटंजी येथे असलेल्या कार्यालयात जावून बिलात दुरुस्ती करून आणा, असा आदेश दिला जातो. या प्रकारात वीज ग्राहकांचा वेळ आणि पैसा खर्ची जातो. चूक विद्युत कंपनीची आणि भुर्दंंड मात्र ग्राहकांना बसतो. या समस्येचा ससेमीरा चुकविता चुकविता नागरिकांना नाकीनऊ येत आहे.