शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

नक्षलग्रस्त ३५ गावे अंधारात

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

विद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही.

अब्दुल मतीन - पारवाविद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही. गेली अनेक वर्षांपासूनची ही समस्या वीज कंपनीने सोडविली नाही. परिणामी या नक्षलग्रस्त भागातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागते. याचा पुन्हा अनुभव शनिवारी रात्री आला. रात्री ८.३0 वाजता गूल झालेली वीज रविवारी दुपारी १ वाजता सुरू झाली. जीवाची काहिली करणार्‍या उन्हामुळे त्रस्त नागरिकांना रात्रीच्यावेळी थंड हवेची गरज आहे. परंतु वीज पुरवठाच खंडित झाल्याने डासांचा प्रादुर्भाव आणि घामाच्या धारा झेलत तब्बल ३५ गावातील नागरिकांना रात्र काढावी लागली. परिसरात शनिवारी वादळ-वारा नसतानाही वीज पुरवठा खंडित का झाला, हा न समजणारा प्रश्न होता. एरवी थोड्याही वार्‍याने वीज खंडित होते. या भागातील वीज तारा लोंबकळणार्‍या आहे. त्यामुळे विद्युत कंपनी कुठलीही जोखीम न स्वीकारता वीज पुरवठा खंडित करते. परंतु कायमस्वरूपी उपाय शोधला जात नाही. नागरिकांनी कित्येकदा तक्रारी केल्यानंतरही कंपनीला जाग येत नाही. मोर्चे, आंदोलने केल्यानंतरही समस्या निकाली काढली जात नाही. या समस्येने नागरिकांना भंडावून सोडले आहे. आठवड्यातून कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. या भागात भारनियमन नसले तरी त्यापेक्षाही मोठी शिक्षा खंडित वीज पुरवठय़ाच्या रूपाने भोगावी लागत आहे. या भागातील बहुतांश गावे जंगलालगत आहे. टिपेश्‍वर अभयारण्य काही अंतरावर आहे. वन्य जीवांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. जनावरे ठार करण्यात आली. अशा स्थितीत परिसरातील वीज पुरवठा खंडित होवू नये, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परिसरात सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना अखंडित वीज मिळावी. ही उपाययोजनाही नियोजन आणि उदासीनतेमुळे फेल ठरली आहे. याशिवाय नागरिकांना वापरापेक्षा जादा युनिटचे बिल दिले जाते. तक्रारी केल्यानंतरही हा प्रश्न निकाली काढला जात नाही. घाटंजी येथे असलेल्या कार्यालयात जावून बिलात दुरुस्ती करून आणा, असा आदेश दिला जातो. या प्रकारात वीज ग्राहकांचा वेळ आणि पैसा खर्ची जातो. चूक विद्युत कंपनीची आणि भुर्दंंड मात्र ग्राहकांना बसतो. या समस्येचा ससेमीरा चुकविता चुकविता नागरिकांना नाकीनऊ येत आहे.