शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

नक्षलग्रस्त ३५ गावे अंधारात

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

विद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही.

अब्दुल मतीन - पारवाविद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही. गेली अनेक वर्षांपासूनची ही समस्या वीज कंपनीने सोडविली नाही. परिणामी या नक्षलग्रस्त भागातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागते. याचा पुन्हा अनुभव शनिवारी रात्री आला. रात्री ८.३0 वाजता गूल झालेली वीज रविवारी दुपारी १ वाजता सुरू झाली. जीवाची काहिली करणार्‍या उन्हामुळे त्रस्त नागरिकांना रात्रीच्यावेळी थंड हवेची गरज आहे. परंतु वीज पुरवठाच खंडित झाल्याने डासांचा प्रादुर्भाव आणि घामाच्या धारा झेलत तब्बल ३५ गावातील नागरिकांना रात्र काढावी लागली. परिसरात शनिवारी वादळ-वारा नसतानाही वीज पुरवठा खंडित का झाला, हा न समजणारा प्रश्न होता. एरवी थोड्याही वार्‍याने वीज खंडित होते. या भागातील वीज तारा लोंबकळणार्‍या आहे. त्यामुळे विद्युत कंपनी कुठलीही जोखीम न स्वीकारता वीज पुरवठा खंडित करते. परंतु कायमस्वरूपी उपाय शोधला जात नाही. नागरिकांनी कित्येकदा तक्रारी केल्यानंतरही कंपनीला जाग येत नाही. मोर्चे, आंदोलने केल्यानंतरही समस्या निकाली काढली जात नाही. या समस्येने नागरिकांना भंडावून सोडले आहे. आठवड्यातून कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. या भागात भारनियमन नसले तरी त्यापेक्षाही मोठी शिक्षा खंडित वीज पुरवठय़ाच्या रूपाने भोगावी लागत आहे. या भागातील बहुतांश गावे जंगलालगत आहे. टिपेश्‍वर अभयारण्य काही अंतरावर आहे. वन्य जीवांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. जनावरे ठार करण्यात आली. अशा स्थितीत परिसरातील वीज पुरवठा खंडित होवू नये, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परिसरात सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना अखंडित वीज मिळावी. ही उपाययोजनाही नियोजन आणि उदासीनतेमुळे फेल ठरली आहे. याशिवाय नागरिकांना वापरापेक्षा जादा युनिटचे बिल दिले जाते. तक्रारी केल्यानंतरही हा प्रश्न निकाली काढला जात नाही. घाटंजी येथे असलेल्या कार्यालयात जावून बिलात दुरुस्ती करून आणा, असा आदेश दिला जातो. या प्रकारात वीज ग्राहकांचा वेळ आणि पैसा खर्ची जातो. चूक विद्युत कंपनीची आणि भुर्दंंड मात्र ग्राहकांना बसतो. या समस्येचा ससेमीरा चुकविता चुकविता नागरिकांना नाकीनऊ येत आहे.