शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

माहूर गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

नवरात्र काळात मंदिरात तेल-तुपाचे अखंड नंदादीप तेवत राहणार असून वैदिक महापूजा, चतुर्वेद पारायण, महाआरती, छबीनाद्वारे मंदिराला प्रदक्षिणा, महाप्रसाद आदीे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. ललित पंचमीला देवीला मौल्यवान वस्त्रालंकारांनी विभूषित करून अलंकार पूजा केली जाणार आहे. रात्री संगीत रजनी होणार आहे. सप्तमीला कुमारीका पूजन, सुहासिनी पूजन करून पूजारी लगतच्या महांकाली गडावर जावून यथासांग पूजाअर्चना करतील. नंतर महांकालीला महावस्त्र अर्पण करून देवीला हवनाचे निमंत्रण देतील.

ठळक मुद्देविधिवत घटस्थापना : नऊ दिवस कार्यक्रम, भक्तांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

पुंडलिक पारटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : साडे तीन शक्ती पीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील रेणूका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. रविवारी विधिवत घटस्थापना करण्यात आली.संबळ, सनई, चौघडा आदी वाद्यांच्या गजरात देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हा सत्र न्यायाधीश दीपक धोळकिया यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. वेद शाळेचे प्रधानाचार्य नीलेश केदार व त्यांच्या शिष्यांनी पौरोहित्य केले. यावेळी उपाध्यक्ष विलास जाधव, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, भवानीदास भोगी, श्रीपाद भोपी, विनायक फांदाडे, आशीष जोशी, समीर भोपी उपस्थित होते.नवरात्र काळात मंदिरात तेल-तुपाचे अखंड नंदादीप तेवत राहणार असून वैदिक महापूजा, चतुर्वेद पारायण, महाआरती, छबीनाद्वारे मंदिराला प्रदक्षिणा, महाप्रसाद आदीे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. ललित पंचमीला देवीला मौल्यवान वस्त्रालंकारांनी विभूषित करून अलंकार पूजा केली जाणार आहे. रात्री संगीत रजनी होणार आहे. सप्तमीला कुमारीका पूजन, सुहासिनी पूजन करून पूजारी लगतच्या महांकाली गडावर जावून यथासांग पूजाअर्चना करतील. नंतर महांकालीला महावस्त्र अर्पण करून देवीला हवनाचे निमंत्रण देतील. अष्टमीला शतचंडी महायज्ञाची देवता स्थापन करून होमहवनास प्रारंभ होईल. नवमीला सतचंडी यज्ञात पूरण पोळीचा नैवद्य व कोहळ्याचा बळी देवून पूर्णाहुती दिली जाणार आहे. दशमीला पुजारी शस्त्र पूजन करून परशुरामाच्या पालखीसह वरदाई पहाडावर जातील. तेथून आणलेले पर्णरूपी सोने माता रेणुकेच्या चरणी अर्पण करतील. यानंतर नवरात्राची सांगता होणार आहे.नवरात्र उत्सवानिमित्त बांधकाम, आरोग्य, परिवहन आदी विभागातील भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. खास बसेस सोडल्या जात आहेत. ठिकठिकाणी आरोग्य शिबिर लावण्यात आले आहे. पोलिसांसह स्वयंसेवक गर्दीला मार्गदर्शन करीत आहे. भाविकांच्या सुविधेची काळजी घेतली जात आहे.रेणुका मातेची आख्यायिकापौराणिक दाखल्यानुसार महिष्मार नगरीचा राजा सहस्त्रार्जून जमदाग्नी ऋषींच्या आश्रमात आला. त्याचे ऋषींनी उत्कृष्ट आदरातीथ्य केले. हे बघून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने व्यवस्था कशी केल्याचे विचारले. त्यावर ऋषींनी आपल्याजवळ इच्छा पूर्ण करणारी कामधेनू असल्याचे सांगितले. ही कामधेनू नेण्यासाठी राजाने बळाचा वापर केला. त्याने जमदाग्नी ऋषींचा शिरच्छेद केला. रेणुका मातेला २१ घाव मारून जखमी केले. मातेची ही अवस्था बघून परशुराम यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली. यावेळी माता रेणुकेने सती जाण्याचा संकल्प केला. त्यासाठी परशूरामाला कावडीद्वारे तेथून घेऊन जाण्यास सांगितले. जेथे आकाशवाणी होईल तेथे कावड ठेवण्यास सांगितले. तेथे दत्तात्रय भेटतील व तेच ठिकाण कोरी भूमी (कोणतेही पाप न झालेली जागा) असेल असेही सांगितले. परशूराम कावड घेऊन सह्याद्री पर्वतावर येताच, कावड येथे ठेव, अशी आकाशवाणी झाली. त्याच ठिकाणी दत्तात्रयांच्या पौरोहित्याखाली जमदाग्नी ऋषींवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर रेणुकामाता मुळंदरी येथे सती गेल्या. परशूरामाच्या हाकेमुळे रेणुकादेवी पृथ्वीतून गळ्यापर्यंत वर आल्या. तीच माहूरची रेणुकामाता होय, अशी आख्यायिका आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री