शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीयीकृत बँकांची वणीत पीक कर्ज वाटपास नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:34 IST

शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असतानाही वणी उपविभागातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परिणामी वणी उपविभागातील वणीसह मारेगाव तालुक्यातील सात हजार ४९७ शेतकरी या हंगामात कर्जापासून वंचित राहिले. यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभदेखील मिळाला नाही.

ठळक मुद्देटार्गेट अपूर्ण : वणी उपविभागात सात हजारांवर शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असतानाही वणी उपविभागातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परिणामी वणी उपविभागातील वणीसह मारेगाव तालुक्यातील सात हजार ४९७ शेतकरी या हंगामात कर्जापासून वंचित राहिले. यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभदेखील मिळाला नाही.वणी तालुक्यात १७ हजार ४३० शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे टार्गेट होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळालेले कर्ज वाटपाचे टार्गेट जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्यास चालढकल केल्याचे दिसून येत आहे. स्टेट बँकेच्या वणी शाखेला ९८० शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र या बँकेने केवळ ५६० शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण केले. सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ९०० पैकी ५६० शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले. विदर्भ क्षेत्रिय ग्रामीण बँकेने ७०० पैकी ५३० शेतकºयांना कर्ज दिले. एचडीएफसी बँकेने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक कर्जाचे वाटप शेतकºयांना केले. यासह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांनी ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी शेतकºयांना कर्जाचे वाटप केले. वणी तालुक्यातील सहा हजार २२७ शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत.मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मागील वर्षी पाऊसच न झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला. ही बाब गांभीर्याने घेऊन शासनाने यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. एवढेच नव्हे तर प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे निर्देश बँकांना दिले होते. मात्र या निर्देशाकडे राष्ट्रीयीकृत बँकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मारेगाव तालुक्यात सात हजार २४० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे टार्गेट बँकांना देण्यात आले होते. मात्र या तालुक्यात पाच हजार ९७० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.पीक विम्यातून सुरू आहे थकीत कर्जाची कपातमागील काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीशी तोंड देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचे उत्पादन घटले. त्यातच मागील वर्षी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला चढविला. परिणामी शेतकऱ्यांना २५ टक्केही कापूस हाती आला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होत आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँका पिक विम्याची ही रक्कम संबंधित शेतकºयाच्या कर्जात वळती करीत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकºयांनी केल्या आहेत. हा प्रकार थांबविण्याची मागणी आहे.