शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांची वणीत पीक कर्ज वाटपास नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:34 IST

शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असतानाही वणी उपविभागातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परिणामी वणी उपविभागातील वणीसह मारेगाव तालुक्यातील सात हजार ४९७ शेतकरी या हंगामात कर्जापासून वंचित राहिले. यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभदेखील मिळाला नाही.

ठळक मुद्देटार्गेट अपूर्ण : वणी उपविभागात सात हजारांवर शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असतानाही वणी उपविभागातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परिणामी वणी उपविभागातील वणीसह मारेगाव तालुक्यातील सात हजार ४९७ शेतकरी या हंगामात कर्जापासून वंचित राहिले. यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभदेखील मिळाला नाही.वणी तालुक्यात १७ हजार ४३० शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे टार्गेट होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळालेले कर्ज वाटपाचे टार्गेट जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्यास चालढकल केल्याचे दिसून येत आहे. स्टेट बँकेच्या वणी शाखेला ९८० शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र या बँकेने केवळ ५६० शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण केले. सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ९०० पैकी ५६० शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले. विदर्भ क्षेत्रिय ग्रामीण बँकेने ७०० पैकी ५३० शेतकºयांना कर्ज दिले. एचडीएफसी बँकेने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक कर्जाचे वाटप शेतकºयांना केले. यासह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांनी ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी शेतकºयांना कर्जाचे वाटप केले. वणी तालुक्यातील सहा हजार २२७ शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत.मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मागील वर्षी पाऊसच न झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला. ही बाब गांभीर्याने घेऊन शासनाने यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. एवढेच नव्हे तर प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे निर्देश बँकांना दिले होते. मात्र या निर्देशाकडे राष्ट्रीयीकृत बँकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मारेगाव तालुक्यात सात हजार २४० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे टार्गेट बँकांना देण्यात आले होते. मात्र या तालुक्यात पाच हजार ९७० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.पीक विम्यातून सुरू आहे थकीत कर्जाची कपातमागील काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीशी तोंड देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचे उत्पादन घटले. त्यातच मागील वर्षी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला चढविला. परिणामी शेतकऱ्यांना २५ टक्केही कापूस हाती आला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होत आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँका पिक विम्याची ही रक्कम संबंधित शेतकºयाच्या कर्जात वळती करीत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकºयांनी केल्या आहेत. हा प्रकार थांबविण्याची मागणी आहे.