शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

राष्ट्रवादी काँग्रेस उतरली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:25 IST

सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देकर्जमाफी, महागाई विरोधात हल्लाबोल आंदोलन : हजारो शेतकºयांची पदयात्रा नागपूरकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. राकाँच्या सदैव गरजणाऱ्या ‘तोफा’ यवतमाळात एकवटल्या होत्या. यवतमाळातून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार अशा विविध घटकांच्या समस्यांची बारूद घेऊन या तोफा नागपूरकडे रवाना झाल्या.माजी कृषीमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यातच यवतमाळात येऊन सरकारविरुद्ध आवाज उठविला होता. हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल करण्यासाठी शेतकºयांची दिंडी काढणार असल्याची घोषणाही तेव्हाच पवार यांनी केली होती. त्यानुसार, शुक्रवारी येथील समता मैदानातून हजारो शेतकºयांची पदयात्रा घोषणा देत निघाली. समता मैदानासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांची लक्षणीय संख्या दिसली. पक्षाच्या टोप्या घालून हाती मागण्यांचे फलक घेतलेले शेतकरी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देत होते.पदयात्रा निघण्यापूर्वी समता मैदानावर राज्याच्या, विदर्भाच्या आणि विशेषत: यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागर करण्यात आला. ताजे आणि गंभीर असलेले शेतकरी विषबाधा, कपाशीवरील बोंडअळीच्या मुद्द्यांवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढविण्यात आला. फवारणीतून शेतकºयांना विषबाधा झाल्यावर मुख्यमंत्र्यांना यवतमाळात लपत-छपत का यावे लागले, असा बोचरा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तर ‘मी लाभार्थी’ अशा जाहिराती देऊन मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.जिल्ह्यातील विषबाधा, आत्महत्याग्रस्त शेतकºयांना श्रद्धांजलीराज्याच्या शेतीला नवी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जिल्ह्यातून जाणीवपूर्वक आंदोलन सुरू करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. हल्लाबोल पदयात्रेला सुरूवात करण्यापूर्वी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना तसेच फवारणीदरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यासाठी संपूर्ण समता मैदानातील हजारो शेतकरी, कार्यकर्ते अत्यंत शांततेत उभे राहिले.नेत्यांच्या नारेबाजीला उत्स्फूर्त प्रतिसादयवतमाळातून पदयात्रा सुरू करण्यापूर्वी जाहीर सभेत नेत्यांनी हल्लाबोल आंदोलनातील नारे शेतकऱ्यांकडून वदवून घेतले. बोल रे बोल हल्ला बोल, महंगाईपर हल्लाबोल, बेरोजगारीपर हल्लाबोल, सरकार नाही भानावर राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर असे नारे यावेळी दणाणत होते. सभा संपून पदयात्रेला प्रारंभ होताना मात्र आमदार प्रकाश गजभिये यांनी अत्यंत तिखट घोषणा दिली. सरकार नाही भानावर लावा त्यांच्या कानावर, या घोषणेनेला मात्र प्रचंड प्रतिसाद मिळत होता.