शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेस उतरली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:25 IST

सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देकर्जमाफी, महागाई विरोधात हल्लाबोल आंदोलन : हजारो शेतकºयांची पदयात्रा नागपूरकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. राकाँच्या सदैव गरजणाऱ्या ‘तोफा’ यवतमाळात एकवटल्या होत्या. यवतमाळातून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार अशा विविध घटकांच्या समस्यांची बारूद घेऊन या तोफा नागपूरकडे रवाना झाल्या.माजी कृषीमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यातच यवतमाळात येऊन सरकारविरुद्ध आवाज उठविला होता. हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल करण्यासाठी शेतकºयांची दिंडी काढणार असल्याची घोषणाही तेव्हाच पवार यांनी केली होती. त्यानुसार, शुक्रवारी येथील समता मैदानातून हजारो शेतकºयांची पदयात्रा घोषणा देत निघाली. समता मैदानासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांची लक्षणीय संख्या दिसली. पक्षाच्या टोप्या घालून हाती मागण्यांचे फलक घेतलेले शेतकरी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देत होते.पदयात्रा निघण्यापूर्वी समता मैदानावर राज्याच्या, विदर्भाच्या आणि विशेषत: यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागर करण्यात आला. ताजे आणि गंभीर असलेले शेतकरी विषबाधा, कपाशीवरील बोंडअळीच्या मुद्द्यांवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढविण्यात आला. फवारणीतून शेतकºयांना विषबाधा झाल्यावर मुख्यमंत्र्यांना यवतमाळात लपत-छपत का यावे लागले, असा बोचरा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तर ‘मी लाभार्थी’ अशा जाहिराती देऊन मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.जिल्ह्यातील विषबाधा, आत्महत्याग्रस्त शेतकºयांना श्रद्धांजलीराज्याच्या शेतीला नवी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जिल्ह्यातून जाणीवपूर्वक आंदोलन सुरू करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. हल्लाबोल पदयात्रेला सुरूवात करण्यापूर्वी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना तसेच फवारणीदरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यासाठी संपूर्ण समता मैदानातील हजारो शेतकरी, कार्यकर्ते अत्यंत शांततेत उभे राहिले.नेत्यांच्या नारेबाजीला उत्स्फूर्त प्रतिसादयवतमाळातून पदयात्रा सुरू करण्यापूर्वी जाहीर सभेत नेत्यांनी हल्लाबोल आंदोलनातील नारे शेतकऱ्यांकडून वदवून घेतले. बोल रे बोल हल्ला बोल, महंगाईपर हल्लाबोल, बेरोजगारीपर हल्लाबोल, सरकार नाही भानावर राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर असे नारे यावेळी दणाणत होते. सभा संपून पदयात्रेला प्रारंभ होताना मात्र आमदार प्रकाश गजभिये यांनी अत्यंत तिखट घोषणा दिली. सरकार नाही भानावर लावा त्यांच्या कानावर, या घोषणेनेला मात्र प्रचंड प्रतिसाद मिळत होता.