शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

नेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

By admin | Updated: December 30, 2016 00:15 IST

तालुक्यात सक्षम नेतृत्त्वाच्या अभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचली आहे.

अनेकजण सोडचिठ्ठीच्या तयारीत : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर परिणाम किशोर वंजारी   नेर तालुक्यात सक्षम नेतृत्त्वाच्या अभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. अनेक महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने एकेकाळी काँग्रेसवर वरचढ ठरणारी राष्ट्रवादी सध्याच्या परिस्थितीत कमकुवत झाली आहे. अनेक पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारीसुद्धा पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षातून जाणाऱ्यांचा वेग अशाच प्रकारे कायम राहिल्यास याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर निश्चित होणार आहे. याचा फायदा विरोधी पक्षांना मिळणार आहे. एकेकाळी काँग्रेसवर वरचढ ठरणारी राष्ट्रवादी सध्या या परिस्थितीत का पोहोचली आहे, याबाबत आत्मपरिक्षण करण्याची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीची स्थापना केली. धुरंदर वलय असलेल्या पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीची स्थिती भक्कम केली. याचवेळी शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राजकारण करणारे बाबू पाटील जैत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन नेर तालुक्यात राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ रोवली. सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करून राष्ट्रवादीचे वलय निर्माण केले. गावागावात सक्रिय कार्यकर्ते निर्माण केले. तालुक्यात राष्ट्रवादीचा पहिला नेता म्हणून बाबू पाटील यांचेच नाव आजही घेण्यात येते. दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून उत्तमदादा पाटील गटाचे वसंतराव घुईखेडकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नेतृत्त्व कुणाचे यावर खल सुरू झाला. बाबू पाटील जैत यांना न सांगताच अनेक निर्णय होवू लागले. जैत यांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ज्यांनी राष्ट्रवादीला तालुक्यात भक्कम स्थिती निर्माण करून दिली, त्यांनाच डावलण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू राहिली. ा्रचंड गट-तट, हेवे-दावे तालुक्यात सुरू झाले. मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची अजूनही जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये हवी तशी पकड नाही. बाबू पाटलांचा मोठा गट शिवसेनेच्या वाटेवर गेल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली व दर्जेदार अशा कार्यकर्त्यांची फौजही कमी झाली. उलट विधानसभा निवडणुकीत ही पोकळी लक्षात आली. मूठभर कार्यकर्त्यांच्या जोरावर सिंहगर्जना करणारे राष्ट्रवादीचे नेते भुईसपाट झाले. नेर तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गट-तट आहेत. एकोपा संपला आहे. सहकार क्षेत्रातील पकडही आता ढीली झाली आहे. एकेकाळी काँग्रेससोबत सहकार गाजविणारे राष्ट्रवादी आता कुण्या दालनात बसेल हे सांगता येत नाही. पक्षश्रेष्ठींनी राकाँची ही अवस्था लवकरच दूर न केल्यास राष्ट्रवादीची स्थिती अतिशय दयनीय होणार आहे. शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. उल्लेखनीय म्हणजे एकही बॅनर शहरात कुठेही लागले नव्हते. त्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीविषयी किती प्रेम आहे, याबाबतची चर्चा जिल्हाभर रंगत आहे.