शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काम होण्यापूर्वीच उखडला राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देदिग्रस-दारव्हा-कारंजा : जागोजागी पडले खड्डे, कामाच्या दर्जावर शंका, पावसाने उघड केली कामाची गुणवत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : बहुप्रतीक्षित दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. कामाच्या विलंबामुळे नाराजी आहे. आता काम झालेल्या ठिकाणचा काही भाग उखडण्यास सुरूवात झाली. यामुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे. नोव्हेंबर २०१५ ला पूर्वीच्या २८२ क्रमांकाच्या यवतमाळ-कारंजा राज्य मार्गाला दिग्रस-दारव्हा-कारंजा नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. नंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने ७० किलोमीटर काँक्रीटीकरणासाठी ७०० कोटी रुपये मंजूर केले.मार्च २०१८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर मार्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्यावेळी संपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची चर्चा असताना मात्र बांधकाम कंत्राटदार कंपनीने खोदकाम करुन केवळ डांबरीकरण सुरू केले. यावरुन शिवसेनेने रस्त्यावर नांगर फिरवून आंदोलनही केले होते. संपूर्ण महामार्गाचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी केली होती. मात्र त्याउपरही जवळपास निम्म्या मार्गावर डांबरीकरण तर निम्म्या मार्गावर काँक्रीटीकरण केले जात आहे.दरयान, डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर आत्तापासूनच खड्डे पडायला सुरूवात झाली आहे. तसेच काँक्रीटीकरणाच्या दर्जावरही शंका उपस्थित केली जात आहे. स्थानिक पातळीवर या मार्गाच्या कामाचे अंदाजपत्रक, आराखडा उपलब्ध होऊ शकला नाही. कोणत्याही मार्गाचा आराखडा त्या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता तयार केला जातो. त्यात राष्ट्रीय महामार्गाचे स्टेटस जास्त असल्याने मजबुतीवर जास्त लक्ष दिले जाते. मात्र या राष्ट्रीय महामार्गाची कामाच्या चालू स्थितीतच दुरवस्था होत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा महामार्ग मजबूत व टिकावू होण्यासाठी अंदाजपत्रकानुसार काम होणे आवश्यक आहे.गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी कुणाचीकोट्यवधी रुपये खर्चून हा महामार्ग बांधला जात आहे. मात्र कामाच्या दर्जाबद्दल सतत तक्रारी होत आहे. असुविधेमुळे तीन वर्षांपासून वाहनधारक त्रस्त आहे. मात्र याविरुद्ध कुणीही आवाज उठवायला तयार नाही. लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक सर्वच गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारीसुद्धा कामाचा आढावा घेताना दिसत नाही. त्यामुळे गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग