शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

काम होण्यापूर्वीच उखडला राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देदिग्रस-दारव्हा-कारंजा : जागोजागी पडले खड्डे, कामाच्या दर्जावर शंका, पावसाने उघड केली कामाची गुणवत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : बहुप्रतीक्षित दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. कामाच्या विलंबामुळे नाराजी आहे. आता काम झालेल्या ठिकाणचा काही भाग उखडण्यास सुरूवात झाली. यामुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.या मार्गावर दिग्रस ते दारव्हापर्यंत काँक्रीटीकरण आणि दारव्हा ते कारंजापर्यंत डांबरीकरण केले जात आहे. नव्याने केलेल्या डांबरीकरणाला काही दिवसांतच खड्डे पडायला सुरूवात झाली. काँक्रीटीकरणसुद्धा अंदाजपत्रकानुसार झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे. नोव्हेंबर २०१५ ला पूर्वीच्या २८२ क्रमांकाच्या यवतमाळ-कारंजा राज्य मार्गाला दिग्रस-दारव्हा-कारंजा नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. नंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने ७० किलोमीटर काँक्रीटीकरणासाठी ७०० कोटी रुपये मंजूर केले.मार्च २०१८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर मार्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली. त्यावेळी संपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची चर्चा असताना मात्र बांधकाम कंत्राटदार कंपनीने खोदकाम करुन केवळ डांबरीकरण सुरू केले. यावरुन शिवसेनेने रस्त्यावर नांगर फिरवून आंदोलनही केले होते. संपूर्ण महामार्गाचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी केली होती. मात्र त्याउपरही जवळपास निम्म्या मार्गावर डांबरीकरण तर निम्म्या मार्गावर काँक्रीटीकरण केले जात आहे.दरयान, डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर आत्तापासूनच खड्डे पडायला सुरूवात झाली आहे. तसेच काँक्रीटीकरणाच्या दर्जावरही शंका उपस्थित केली जात आहे. स्थानिक पातळीवर या मार्गाच्या कामाचे अंदाजपत्रक, आराखडा उपलब्ध होऊ शकला नाही. कोणत्याही मार्गाचा आराखडा त्या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता तयार केला जातो. त्यात राष्ट्रीय महामार्गाचे स्टेटस जास्त असल्याने मजबुतीवर जास्त लक्ष दिले जाते. मात्र या राष्ट्रीय महामार्गाची कामाच्या चालू स्थितीतच दुरवस्था होत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा महामार्ग मजबूत व टिकावू होण्यासाठी अंदाजपत्रकानुसार काम होणे आवश्यक आहे.गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी कुणाचीकोट्यवधी रुपये खर्चून हा महामार्ग बांधला जात आहे. मात्र कामाच्या दर्जाबद्दल सतत तक्रारी होत आहे. असुविधेमुळे तीन वर्षांपासून वाहनधारक त्रस्त आहे. मात्र याविरुद्ध कुणीही आवाज उठवायला तयार नाही. लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक सर्वच गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारीसुद्धा कामाचा आढावा घेताना दिसत नाही. त्यामुळे गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग