शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राष्ट्रीय महामार्ग कागदावरच

By admin | Updated: September 17, 2015 03:04 IST

केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणा केली.

केवळ घोषणा : विकासाला ब्रेक, अद्याप कामाला सुरूवातही नाहीवणी : केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणा केली. मात्र हा महामार्ग अद्याप कागदावरच आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर त्या दिशेने या मार्गावर कोणतेही काम सुरू झाले नसल्याने जिल्ह्याच्या विकासाला लागलेला ‘ब्रेक‘ अद्याप कायमच आहे.केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाअंतर्गत देशात रस्त्यांचे जाळे विणले जाते. राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात येते. सोबतच देशातील राष्ट्रीय महामार्गाची देखभाल आणि दुरूस्तीही केली जाते. यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात गेला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात पोहोचतो. वडकी नजिकच्या कारेगाव येथील वर्धा नदीवरील पुलापासून ते तेलंगणाची सीमा असलेल्या केळापूर तालुक्यातील पिंपळखुटीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यात येतो. जवळपास केवळ ५५ किलोमीरटचा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो. यवतमाळ जिल्हा आधीच रेल्वेपासून वंचित आहे. त्यातही आता ब्रिटीशकालीन ‘शकुंतला‘ही ठप्प पडली आहे. केवळ वणीतून नागपूर-मुंबई ही एकमेव नंदीग्राम एक्सप्रेस उपलब्ध आहे. वणीवरून धावणाऱ्या इतर दोन रेल्वेंचा जिल्ह्यात कुठेही थांबा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना रस्ते मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र जिल्ह्यातून नव्याने घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग गेल्यास सुखकर प्रवासासोबतच विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. केळापूर तालुक्यातील करंजीपासून वणी, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मूल, गडचिरोली, धानोरामार्गे नवीन राष्ट्रीय महामार्ग छत्तीसगड राज्याला जोडण्याचे प्रस्तावीत आहे. या महामार्गाला ९३0 असा क्रमांक देण्यात आला. हा महामार्ग केवळ २८0 किलोमीटरचा राहणार आहे. त्यापैकी ४0 किलोमीटरचा मार्ग जिल्ह्यातून जाणार आहे. करंजीवरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात गेला आहे. तेथूनच या नवीन महामार्गाची सुरूवात होणार आहे. करंजीपासून वणीपर्यंतच्या राज्य मार्गाचे गेल्या पाच वर्षांपासून चौपदरीकरण सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. घुग्गुस-चंद्रपूर मार्गाचेही चौपदरीकरण सुरू आहे. करंजी-मारेगाव ते वणी हा मार्ग आता नवीन राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट होणार आहे. समोर वरोरापर्यंत हा नवीन राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. मात्र वणीपासून ते पाटाळा पुलापर्यंत सध्या हा रस्ता अत्यंत दयनीय स्थितीत आहे. हाच रस्ता राष्ट्रीय महामार्गात समविष्ट होणार आहे, असे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. करंजी ते पाटाळापर्यंतचा ४0 किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ चे काम रखडलेयवतमाळ जिल्ह्यातून तूर्तास वाराणसी ते कन्याकुमारी हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गाची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. वडकी ते हिंगणघाट दरम्यान तर मोठमोठे खड्डे पडले आहे. गेल्या पाच वर्षांपासून या महामार्गाच्या दुरस्तीचे काम सुरू आहे. मात्र ते प्रचंड रेंगाळले आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे. वडकी, पोहणानजिक असलेले खड्डे छोट्या चारचाकी वहनांसाठीही डोकेदुखी ठरले आहे. त्यामुळे अवजड वाहने वगळता इतर वाहने या मार्गाने नेण्याचे चालक टाळत आहे. नवीन राष्ट्रीय महामार्ग अद्याप कागदावर आहे अन् जुना महामार्ग आचके देत आहे, अशी ही स्थिती आहे. महामार्गाची दुर्दशा झाल्याने जिल्ह्याच्या विकासालाही ‘ब्रेक‘ लागला आहे.