शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राष्ट्रीय महामार्ग १२ तास ठप्प

By admin | Updated: January 17, 2016 02:27 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उलटलेल्या ट्रकमुळे तब्बल १२ तास वाहतूक ठप्प झाली होती.

ट्रक उलटला : प्रवाशांचे हाल, पोलिसांची निष्क्रीयता धनोडा / हिवरा संगम : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उलटलेल्या ट्रकमुळे तब्बल १२ तास वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ, नांदेड आणि माहूर या तीनही मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त ट्रक काढण्यास झालेल्या दिरंगाईचा फटका टीईटीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेकडो प्रवाशांना बसला.महागाव तालुक्यातील धनोडा ते हिवरासंगम गावादरम्यान नांदेडहून सुपारी घेऊन निघालेला ट्रक शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास उलटला. या अपघाताने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबचलांब रांगा तीनही मार्गावर लागल्या होत्या. विशेष म्हणजे अपघातस्थळी केवळ एक होमगार्ड परिस्थिती हाताळत होता. महागाव पोलीस आणि महामार्गा पोलीस सकाळपर्यंत अपघातस्थळी पोहोचलेच नव्हते. त्यामुळे अपघातग्रस्त ट्रक बाजुला करण्यास प्रचंड विलंब लागला. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत हा ट्रक त्याच ठिकाणी होता. त्यामुळे त्याचा त्रास शेकडो प्रवाशांना बसला. शनिवारी शिक्षक पात्रता परीक्षा होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी जाणार होते. परंतु अपघातामुळे त्यांना परीक्षेस पोहोचण्यास विलंब झाला. महामार्गावर अपघात झाल्यास तात्काळ महामार्ग पोलिसांना धाव घ्यावी लागते. परंतु या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस पोहोचले. तसेच महागाव पोलीसही येथे आले नव्हते. शेकडो वाहनधारक कमालीचा रोष व्यक्त करीत होते. अखेर दुपारी १ वाजताच्यानंतर हा रस्ता मोकळा झाला. आणि वाहतूक सुरळीत झाली. मात्र पोलिसांच्या निष्क्रीयतेचा फटका प्रवाशांना बसला. (लोकमत चमू)