शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी

By admin | Updated: May 21, 2017 00:33 IST

दिग्रस शहराची तहान भागविणाऱ्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला आहे.

१३ कोटींची तरतूद : चार कोटींचा निधी प्राप्त, तज्ज्ञांकडून कामाची अपेक्षा प्रकाश सातघरे । लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : दिग्रस शहराची तहान भागविणाऱ्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला आहे. त्यासाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी चार कोटी १२ लाखांचा निधी दिग्रस नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे. दिग्रस शहरासाठी नांदगव्हाण येथील धरण वरदान ठरले आहे. याच धरणातील पाण्यावर दिग्रसकरांची तहान भागविली जाते. मात्र ९ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीमुळे हे धरण फुटले होते. त्यामुळे परिसरासह दिग्रस शहरात हाहाकार उडाला होता. या धरण फुटीमुळे अनेकांची संसार उघड्यावर आले होते. अनेक नागरिकांची घरे वाहून गेली होती. घरातील साहित्यही पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले होते. या धरण फुटीमुळे २००५ पासून दिग्रसकरांना धरणाच्या पाण्यापासून मुकावे लागले होते. त्यामुळे शहरात पाणीटंचाईने डोकेवर काढले होते. या धरणातील गाळ उपसा न झाल्याने व नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला, अशी नागरिकांची भावना झाली होती. आता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या धरण पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांसमोर या धरण पुनर्बांधणीचा प्रस्ताव ठेवला. त्याला लगेच मंजुरी बहाल करण्यात आली. शासनाने त्यासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी चार कोटी १२ लाख ९३ हजारांचा निधी दिग्रस नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे. आता नागरिकांना या धरण पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात होण्याचे वेध लागले आहे. हे काम जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञांमार्फतच करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. येथील नगरपरिषदेमार्फत सुरू असलेले पूरग्रस्तांच्या घरकुलांचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे अनेकांना अद्याप उघड्यावरच संसार थाटावा लागला आहे. हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आता त्याच नगरपरिषदेमार्फत धरण पुनर्बांधणीचे काम होणार असल्याने नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. नगरपरिषदे ऐवजी या पुनर्बांधणीचे काम जलसंपदा विभागाच्या अनुभवी अभियंत्यांमार्फत करावे, अशी रास्त मागणी होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दिग्रस शहराला भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्या दृष्टीने जलसंपदाच्या तज्ज्ञांकडून काम होणे गरजेचे आहे. नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी शासकीय स्तरातून निधी मंजूर झाला. त्यानंतर पुनर्बांधणी मंजुरीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला. त्यावरुन गेल्या २१ मार्च रोजी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. तत्पूर्वी २० मार्चला तांत्रिक मंजुरीसाठी सदर प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. सोबतच प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडेही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हे दोनही प्रस्ताव तातडीने मंजूर होण्याची गरज आहे.