शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी

By admin | Updated: May 21, 2017 00:33 IST

दिग्रस शहराची तहान भागविणाऱ्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला आहे.

१३ कोटींची तरतूद : चार कोटींचा निधी प्राप्त, तज्ज्ञांकडून कामाची अपेक्षा प्रकाश सातघरे । लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : दिग्रस शहराची तहान भागविणाऱ्या नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला आहे. त्यासाठी १३ कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी चार कोटी १२ लाखांचा निधी दिग्रस नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे. दिग्रस शहरासाठी नांदगव्हाण येथील धरण वरदान ठरले आहे. याच धरणातील पाण्यावर दिग्रसकरांची तहान भागविली जाते. मात्र ९ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीमुळे हे धरण फुटले होते. त्यामुळे परिसरासह दिग्रस शहरात हाहाकार उडाला होता. या धरण फुटीमुळे अनेकांची संसार उघड्यावर आले होते. अनेक नागरिकांची घरे वाहून गेली होती. घरातील साहित्यही पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले होते. या धरण फुटीमुळे २००५ पासून दिग्रसकरांना धरणाच्या पाण्यापासून मुकावे लागले होते. त्यामुळे शहरात पाणीटंचाईने डोकेवर काढले होते. या धरणातील गाळ उपसा न झाल्याने व नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला, अशी नागरिकांची भावना झाली होती. आता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या धरण पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांसमोर या धरण पुनर्बांधणीचा प्रस्ताव ठेवला. त्याला लगेच मंजुरी बहाल करण्यात आली. शासनाने त्यासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी चार कोटी १२ लाख ९३ हजारांचा निधी दिग्रस नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे. आता नागरिकांना या धरण पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात होण्याचे वेध लागले आहे. हे काम जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञांमार्फतच करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. येथील नगरपरिषदेमार्फत सुरू असलेले पूरग्रस्तांच्या घरकुलांचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे अनेकांना अद्याप उघड्यावरच संसार थाटावा लागला आहे. हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आता त्याच नगरपरिषदेमार्फत धरण पुनर्बांधणीचे काम होणार असल्याने नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. नगरपरिषदे ऐवजी या पुनर्बांधणीचे काम जलसंपदा विभागाच्या अनुभवी अभियंत्यांमार्फत करावे, अशी रास्त मागणी होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दिग्रस शहराला भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्या दृष्टीने जलसंपदाच्या तज्ज्ञांकडून काम होणे गरजेचे आहे. नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी शासकीय स्तरातून निधी मंजूर झाला. त्यानंतर पुनर्बांधणी मंजुरीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला. त्यावरुन गेल्या २१ मार्च रोजी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. तत्पूर्वी २० मार्चला तांत्रिक मंजुरीसाठी सदर प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. सोबतच प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडेही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हे दोनही प्रस्ताव तातडीने मंजूर होण्याची गरज आहे.