शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

36 हजार मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

जिल्हा निवडणूक विभाग मतदारयादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम युद्ध पातळीवर राबवित आहे. त्या कामासाठी २५५० बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक आणि अंगणवाडी ताई यांचा समावेश आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून फोटो नसणारी व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित नसेल, तर स्थानिकांच्या आधारे पंचनामा करून ही नावे वगळली जात आहेत. 

ठळक मुद्देअडीच हजार बीएलओंची शोधमोहीम : १७६४ नावे डुप्लिकेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्हा निवडणूक विभाग मतदारयादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम युद्ध पातळीवर राबवित आहे. त्या कामासाठी २५५० बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक आणि अंगणवाडी ताई यांचा समावेश आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून फोटो नसणारी व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित नसेल, तर स्थानिकांच्या आधारे पंचनामा करून ही नावे वगळली जात आहेत. जिल्ह्यामध्ये सात विधानसभा क्षेत्रात ३६ हजार ५७४ नावे वगळली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३३ हजार ४८२ नावे यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील आहे.अनेकवेळा सूचना दिल्यानंतरही मतदारांनी आपले फोटो सादर केले नाहीत. यामुळे ही व्यक्ती अस्तित्वात नसावी, असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. ही व्यक्ती मयत झाली असावी, अथवा त्याठिकाणी राहात नसेल, यामुळेच त्यांची छायाचित्रे उपलब्ध झाली नाही, असा निष्कर्ष निघाला आहे.

छायाचित्र जमा करण्यासाठी ८ जुलैची डेडलाईनमतदार यादीमध्ये छायाचित्र जमा करण्यासाठी २५ जूनची डेडलाईन देण्यात आली होती. ही डेडलाईन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली. यानंतरही छायाचित्र न आल्याने आता ८ जुलैपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर मतदार यादीतून छायाचित्र नसलेले मतदार काढले जाणार आहे.

येथे जमा करा छायाचित्र प्रत्येक गावामध्ये बीएलओ मार्फत घरोघरी सर्वेक्षण होत आहे.बीएलओंकडे छायाचित्र नसल्यास मतदार यादीसाठी छायाचित्र देता येतील.बीएलओ येऊन गेले असतील तर तहसील कार्यालयामध्ये निवडणूक विभागात छायाचित्र जमा करता येते. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहे.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग