शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सरकारी कार्यालयांत आचारसंहिता नावालाच; काम कमी, अन् कर्मचाऱ्यांच्या कानाला मोबाईल जास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाईलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत. 

ठळक मुद्देअवांतर कामात सर्वाधिक वेळ खर्ची : दप्तर दिरंगाई कायद्याच्या अंमलबजावणीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासकीय कार्यालयात वेळेवर पोहोचल्यानंतरही कर्मचारी नसल्याने अनेकांची कामे होत नाहीत. अनेक कर्मचारी मोबाईलवर पाहायला मिळतात, तर सर्वसामान्य नागरिक आपले काम कधी होईल, याच्या प्रतीक्षेत असतात. ‘लोकमत’ने याचे वास्तव जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागात फेरफटका मारला असता हे भयावह वास्तव पाहायला मिळाले. अशाच प्रकारची स्थिती कमीअधिक प्रमाणात इतर ठिकाणी असते.

काय आहे आचारसंहिता

कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाईलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत. 

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी नागरिकांची सतत वर्दळ असते. यावेळी काम करण्यासाठी आलेल्या नागरिकांना फार वाईट अनुभव येतो. काही कर्मचारी सोडले तर अनेक कर्मचारी फोनमध्ये व्यस्त असतात. तर अनेकांचा लंच टाईम झालेला असतो. सर कुठे गेले विचारले तर ते बाहेर गेले अथवा दाैऱ्यावर असतात.

शिक्षण विभाग

शिक्षकांची सर्वाधिक प्रकरणे घेऊन गावपातळीवरचे शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयात येतात. याठिकाणीही असाच अनुभव इतर शिक्षकांना पाहायला मिळतो. अनेकवेळा कर्मचारी मोबाईलवर व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. त्या तुलनेत कामाची फाईल मात्र निकाली निघत नाही.

सरकारी कार्यालय नको रे बाबा !

शासकीय कर्मचारी वेळेवर सापडत नाहीत. अनेकवेळा कामांमध्ये चालढकल होते. सर्वसामान्यांची कामे लवकर झाली तर त्याचा फायदा होणार आहे. त्यादृष्टीने नियंत्रण ठेवायला हवे.- विनोद दोंदल, नागरिक

कर्मचाऱ्यांचे थम्ब बंद झाल्यापासून कर्मचारी कार्यालयात वेळेवर पाहायला मिळत नाही. त्यांच्यासाठी वेट अँड वाॅच करावे लागते. कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर निर्बंध हवे.- महेश पवार, नागरिक

कार्यालय प्रमुख म्हणतात....

या संदर्भातील आदेश नुकतेच प्राप्त झाले आहे. प्रत्येक विभागात सर्वव्यापक सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. काही विभागात कॅमेरे आहे. मात्र, ते सर्वव्यापक नाही. अशा ठिकाणी कॅमेरे बसणार आहे. त्याचे नियंत्रण विभाग प्रमुखांकडे आणि आमच्याकडेही राहणार आहे.- श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी

कामाच्या वेळात मोबाईल नको म्हणून परिपत्रक आले आहे. कर्मचारी काम सोडून इतर कामात वेळ वाया घालवत असतील तर त्यावर कारवाई नक्कीच होणार आहे. कामाच्या व्यतिरिक्त वेळेत मोबाईलचा वापर करता येतो. मात्र, कार्यालयात अधिक वेळ मोबाईल पाहणे हा कामचुकारपणा आहे.- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :GovernmentसरकारMobileमोबाइल