शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

पैनगंगेच्या पुरामुळे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद, वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 15:47 IST

अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलाला बसला. या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या ३६ तासांपासून ठप्प आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या ३६ तासांपासून ठप्प आहे. पैनगंगा नदीला पूर आला आहे आणि या पुराचं पाणी उमरखेड तालुक्यातील मार्लेगावजवळच्या पुलापर्यंत आलंय. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूस वाहने थांबविण्यात आली आहे.

काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलाला बसला. पुराची ही परिस्थती लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. परिणामी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

सततच्या पावसामुळे ईसापूर धरण १०० टक्के भरल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. कयाधु नदीचे पाणीदेखील पैनगंगेला मिळाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी नदी नाल्यावर जाऊ नये, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :floodपूरTrafficवाहतूक कोंडी