शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

खेड्यात वाघाच्या दहशतीचे गूढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:56 IST

जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

ठळक मुद्देवनविभाग संभ्रमात : सोशल मीडियावर व्हिडीओंचा भडीमार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. अनेक ठिकाणी तडसालाच वाघ समजून शेतशिवार ओस पडत आहेत. अवनी नरभक्षक वाघिणीच्या खात्म्यानंतर वाघ इतरत्र दिसल्याच्या अफवांना मोठ्या प्रमाणात खतपाणी मिळत आहे.निसर्गाने जिल्ह्याला समृद्ध अशी वनसंपदा दिली आहे. ७० ते ८० च्या दशकात अगदी कोणत्याही खोरीत वाघ राहत असल्याचे ज्येष्ठांकडून ऐकायला मिळत होते. आता पुन्हा त्याच चर्चा प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. कोणत्याही शेतशिवारात जंगलता फिरताना वाघ दिसल्याची चर्चा कमी अधिक प्रमाणात रंगत आहे. वाघांची संख्या वाढल्याने त्यांनी अधिवास क्षेत्रात वाढ केल्याचे काही वन्यजीवप्रेमी सांगतात. प्रत्यक्ष वाघामुळे सध्या तरी ग्रामीण जीवन ढवळून निघाले आहे. एखाद्याने वाघ दिसला असे सांगितले की, किमान दोन दिवस त्या परिसरात कोणी फिरकत नाही. यामुळे शेतीची कामे, रोजमजुरी बुडत आहे. घनदाट जंगलात राहणारा वाघ अचानक गावालगतच्या झुडपी जंगलात दिसल्याचा दावा केला जातो.यवतमाळ तालुक्यातील भांबराजा, पिंप्री (लासिना), बोरजई, नारकुंड, उमर्डा नर्सरी परिसरात वाघ असल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र वनविभागाच्या हाती कोणताच पुरावा लागलेला नाही. तरीही दक्षता म्हणून वाघाचे अधिवास असल्याचे फलक येथे वनविभागाने लावले आहे. अशीच स्थिती आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जंगल परिसराची आहे.झरी, पांढरकवडा, राळेगाव, घाटंजी, कळंब तालुक्यातील नांझा परिसरात वाघाचा संचार असण्याला वनविभागाने दुजोरा दिला आहे. तेथे काही वन्यजीव प्रेमी ‘रुट लेव्हल’वर काम करत आहे. असेच प्रयत्न वाघ दिसल्याच्या वावड्या उठलेल्या भागात होण्याची आवश्यकता आहे. यासाठी वनविभागाच्या यंत्रणेलाही प्रशिक्षित करण्याची गरज आहे. वनरक्षक, वनचौकीदार यांचा ग्रामस्थांशी थेट संपर्क होतो. अफवा का असे ना, त्याची शहानिशा करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातूनच वाघाच्या दहशतीचे गुढ उकलता येईल.वन विभागाला हवेत पुरावे, गावकरी हतबलवाघ आहे हे मान्य करण्यासाठी वनविभागाला पुरावे हवे आहेत. पायाचे ठसे (पगमार्क), त्याचे केस व इतर काही खानाखुणा हव्यात. मात्र या गोळा कशा करायच्या याबाबत ग्रामस्थांना कोणतीच माहिती नाही. काही ठिकाणी तर वाघाने शिकार केल्यानंतर ती ओढून परत आणली जाते किंवा जमिनीत पुरली जाते. वाघ असेल तर या कृत्यामुळे तो अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tigerवाघ