शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या यशाचे सर्वाधिक कौतुक माझ्या शिक्षकांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

मी तसा ‘अ‍ॅव्हरेज’ गुण मिळविणारा विद्यार्थी होतो. पण शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे मीही शिष्यवृत्ती मिळवित गेलो. त्यातून प्रोत्साहन मिळत गेले. मे आज जो काही आहे, ते केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच. आमच्या चंदीगडच्या शिक्षकांसोबत मी आजही सतत संपर्कात राहतो.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे सीईओ म्हणाले, विद्यार्थीदशेत मी शिक्षकांचा मारही खाल्ला अन् त्यांच्यामुळेच शिष्यवृत्तीही मिळविली

यवतमाळ : माझ्याच काय पण कुणाच्याही यशाचे खरे शिल्पकार हे शिक्षकच असतात. मी लहान असताना खोडकर होतो. मी शिक्षकांचा मारही खाल्ला आणि शिष्यवृत्तीही मिळविली. पण त्यावेळी शिक्षकांनी दरडावले नसते, तर आज येथपर्यंतचा यशाचा पल्ला गाठता आला नसता. मी ज्यावेळी आयएएस झालो, त्यावेळी सर्वाधिक कौतुक माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांना वाटले. परीक्षेची तयारी करताना जेव्हा जेव्हा मी माझे ध्येय विसरलो, तेव्हा शिक्षकांनीच मला त्या ध्येयाची आठवण करून दिली, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या शिक्षकांची महती सांगितली.गावी जातो तेव्हा शिक्षकांना आवर्जून भेटतोचमी तसा ‘अ‍ॅव्हरेज’ गुण मिळविणारा विद्यार्थी होतो. पण शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे मीही शिष्यवृत्ती मिळवित गेलो. त्यातून प्रोत्साहन मिळत गेले. मे आज जो काही आहे, ते केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच. आमच्या चंदीगडच्या शिक्षकांसोबत मी आजही सतत संपर्कात राहतो. जेव्हा जेव्हा मी गावाकडे चंदीगडला जातो, तेव्हा तेव्हा सर्व जुन्या शिक्षकांना आवर्जुन भेटतो. त्यांचे शब्द आजही तेवढेच महत्त्वाची आणि प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांचा फोनवरचा संपर्कदेखील माझ्यासाठी फार मोठी ताकद असते. अशा माझ्या सर्व शिक्षकांना वंदन! आपल्या जिल्ह्यातीलही सर्व शिक्षकांना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!सर्वांगीण विकास अन् करिअरवर फोकस...चंदीगडच्या शाळेत शिकताना मी आईवडिलांपेक्षाही अधिक काळ शिक्षकांच्या संपर्कात राहात होतो. शालेय शिक्षकांनी सतत नैतिक मूल्यांचे संस्कार केले. मात्र जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षणाला सुरूवात केली, त्यावेळच्या शिक्षकांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर तर भर दिला होताच. पण त्यांचे पूर्ण अध्यापन हे ‘करिअर फोकस’ होते.मला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे, हे माझे ध्येय माझ्यापेक्षाही माझ्या गुरूंनी अधिक लक्षात ठेवले. स्पर्धा परीक्षेतून जेव्हा माझे ‘सिलेक्शन’ झाले, त्यावेळी मी सर्वात आधी माझ्या शिक्षकांना भेटलो. त्यांचे आशीर्वाद सतत माझ्यासोबत असतात. आपल्या जिल्ह्यातही अनेक चांगले शिक्षक आहेत, पण केवळ काही चांगल्या शिक्षकांच्या बळावर काम भागणार नाही. तर प्रत्येक शिक्षकाने आपले कर्तव्य काटेकोरपणे बजावणे आवश्यक आहे. त्यांना काही सांगण्याएवढा मी मोठा नाही. पण शिक्षकांकडून समाजाची फार मोठी अपेक्षा असते, ती पूर्ण झाली पाहिजे.शिक्षकांनीच लावला वाचनाचा छंद...शिक्षकांमुळे आणि शाळेमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत गेली. शिक्षकांमुळेच मला वाचनाचा छंद लागला. त्या छंदामुळेच मला यूपीएससीसारख्या परीक्षेत यश मिळविण्याची ताकद मिळाली. महात्मा गांधी यांचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक मला खूप आवडते. त्यातून जीवनातील संकटांवर कशी मात करावी, हे कळते. तसेच ‘अमरचित्रकथा’ची संपूर्ण सिरीजही माझ्या अत्यंत आवडीची आहे.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन