शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

पाण्यासाठी नगरसेवक जिल्हा कचेरीच्या टॉवरवर

By admin | Updated: June 3, 2016 02:30 IST

शहरातील पाणी प्रश्नावरून काँग्रेसचे नगरसेवक अमन निर्बाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून गुरुवारी वीरूगिरी केली.

दोन तास ठिय्या : वीरूगिरी आंदोलनाने प्रशासनाची तारांबळयवतमाळ : शहरातील पाणी प्रश्नावरून काँग्रेसचे नगरसेवक अमन निर्बाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून गुरुवारी वीरूगिरी केली. या अचानक झालेल्या आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अधिकारी आणि पोलिसांनी धाव घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर नगरसेवकाला खाली उतरविण्यात यश आले. अमन निर्बाण हे कळंब चौक परिसराचे नगरपरिषदेत प्रतिनिधीत्व करतात. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून त्यातही कमी दाबाचा असतो. यामुळे अलकबीरनगर, यवतमाळ ग्रामीण, कळंब चौक, दलित वस्ती आदी भागात नागरिक त्रस्त झाले आहे. नगरपरिषदेचा टँकरही वेळेवर पोहोचत नाही. त्यासोबतच भारनियमनाचा कहरही या भागाला सहन करावा लागतो. याबाबत या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून निर्बाण यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिले. परंतु एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. शेवटी गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर जाऊन चढले. हा प्रकार माहीत होताच टॉवरजवळ गर्दी झाली. अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली. जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर, उपअभियंता शेषराव दारव्हेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुर्वे टॉवरजवळ आले. त्यांनी निर्बाण यांना खाली उतरण्याची विनंती केली. परंतु ते आपल्या आंदोलनावर ठाम होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर हा टॉवर असून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कक्षाबाहेर येऊन निर्बाण यांना खाली येण्यासाठी विनंती केली. परंतु निर्बाण कुणाचेही ऐकत नव्हते. यवतमाळ शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक झळके, पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर आपल्या ताफ्यासह दाखल झाले. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यांनी निर्बाण यांना खाली या आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे सांगितले. त्यावरून तब्बल दोन तासानंतर अमन निर्बाण खाली आले. त्याच वेळी महाआरोग्य शिबिराच्या बैठकीसाठी आलेले आमदार मदन येरावार यांंनी निर्बाण यांची विचारपूस केली. टॉवरवरून उतरल्यानंतर निर्बाण यांना थेट रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर जीवन प्राधिकरण व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बाळासाहेब मांगुळकर, नगरसेवक अमोल देशमुख, जयसिंग चव्हाण आदींनी चर्चा केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महाआरोग्य शिबिरासंदर्भात गुरुवारी बैठक आयोजित होती. या बैठकीला पालकमंत्र्यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. परंतु कुणीही या आंदोलकांपर्यंत येण्याची तसदी घेतली नाही. (कार्यालय प्रतिनिधी) टॉवरवरून उतरताच नगरसेवक निर्बाण यांना आली भोवळ पाण्याच्या प्रश्नावरून तब्बल दोन तास नगरसेवक निर्बाण भर उन्हात टॉवरवर चढून होते. दोन तासानंतर ते टॉवरवरून खाली उतरले. तेव्हा त्यांना अचानक भोवळ आली आणि खाली कोसळले. त्यामुळे तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण आटल्यानंतर आठ दिवसातून एकदा पाणी दिले जात आहे. चापडोह प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळत आहे. परंतु या पाण्यात यवतमाळकरांची तहान भागत नाही. शहराच्या अनेक भागात पाणीटंचाईचे दृश्य दिसते. टँकरने पाणी पुरवठा सुरू असला तरी सर्वांनाच पाणी मिळेल, याची खात्री नसते. त्यामुळे आर्थिक झळ सोसून नागरिक पाणी विकत घेत आहे. शहरातील जलस्रोतही आटल्याने नागरिक हैराण झाले आहे.