शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईबाबत नगर परिषदेने झटकले हात

By admin | Updated: April 5, 2016 04:52 IST

येथील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरात जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजी धोरणामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई

यवतमाळ : येथील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरात जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजी धोरणामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. प्राधिकरणाचे नळ येणेच बंद झाले आहे. त्यामुळे याबाबत आता नगर परिषद तरी काही करेल, या हेतुने या परिसरातील महिलांनी नगर परिषदेत जाऊन प्रशासनाकडे पाण्याची मागणी केली, परंतु नगर परिषद प्रशासनाने या महिलांचे निवेदन स्वीकारण्यासही नकार देऊन ग्रामपंचायतकडे निवेदन देण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वीच यवतमाळ नगर परिषदेत शहरानजीकच्या ग्रामपंचायतींचे विलिनिकरण करण्यात आले. यामध्ये उमरसरा ग्रामपंचायतचाही समावेश आहे. सरपंच व सचिवांचे सर्व अधिकार संपुष्टात येऊन सबंधित ग्रामपंचायतींवर नगर परिषदेकडून प्रशासक नेमण्यात आला. यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल सुरू आहे. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून उमसरा परिसरातील जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा जवळपास बंद आहे. याभागात हातपंप, विहिर किंवा बोअर यापैकी कोणताही सोर्स नाही. याबाबत प्राधिरकणाकडे तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु तेथून ठोस अशा कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नसल्यामुळे नागरिक उमरसरा ग्रामपंचायतमध्ये धडकले. कारण उमरसरा ग्रामपंचायतकडून यशोधरा नगराला लागून असलेल्या निखिल नगराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु याबाबत आता आपण काहीही करू शकत नाही, कारण उमरसरा ग्रामपंचायतचे विलिनिकरण नगर परिषदेत झाले आहे. त्यामुळे तुम्ही नगर परिषदेकडे जा, असे सांगण्यात आले. तेंव्हा यशोधरा नगरातील काही महिला नगर परिषदेत गेल्या, तिथे त्यांना सध्या आमच्या हातात काहीही नाही, तुम्ही ग्रामपंचायतमध्येच जा, निवेदनही त्यांनाच द्या, असे सांगून पुन्हा त्यांची बोळवण करण्यात आली. निवेदनही स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्यासारख्या महत्वाच्या समस्येसाठी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राधिकरण, नगर परिषद आणि ग्रामपंचायत या सर्वांकडून केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. (प्रतिनिधी) समन्वयाचा अभाव४उमरसऱ्यातील यशोधरा नगराप्रमाणेच शहरातील भोसा, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा आदी परिसरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागालाही जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होतो. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. नगर परिषद, प्राधिकरण, बरखास्त ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सचिव, कर्मचारी, प्रशासक यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्याने शहरातील अनेक भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.