शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

पाणी टंचाईबाबत नगर परिषदेने झटकले हात

By admin | Updated: April 5, 2016 04:52 IST

येथील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरात जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजी धोरणामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई

यवतमाळ : येथील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरात जीवन प्राधिकरणाच्या निष्काळजी धोरणामुळे सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. प्राधिकरणाचे नळ येणेच बंद झाले आहे. त्यामुळे याबाबत आता नगर परिषद तरी काही करेल, या हेतुने या परिसरातील महिलांनी नगर परिषदेत जाऊन प्रशासनाकडे पाण्याची मागणी केली, परंतु नगर परिषद प्रशासनाने या महिलांचे निवेदन स्वीकारण्यासही नकार देऊन ग्रामपंचायतकडे निवेदन देण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वीच यवतमाळ नगर परिषदेत शहरानजीकच्या ग्रामपंचायतींचे विलिनिकरण करण्यात आले. यामध्ये उमरसरा ग्रामपंचायतचाही समावेश आहे. सरपंच व सचिवांचे सर्व अधिकार संपुष्टात येऊन सबंधित ग्रामपंचायतींवर नगर परिषदेकडून प्रशासक नेमण्यात आला. यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल सुरू आहे. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून उमसरा परिसरातील जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा जवळपास बंद आहे. याभागात हातपंप, विहिर किंवा बोअर यापैकी कोणताही सोर्स नाही. याबाबत प्राधिरकणाकडे तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु तेथून ठोस अशा कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नसल्यामुळे नागरिक उमरसरा ग्रामपंचायतमध्ये धडकले. कारण उमरसरा ग्रामपंचायतकडून यशोधरा नगराला लागून असलेल्या निखिल नगराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु याबाबत आता आपण काहीही करू शकत नाही, कारण उमरसरा ग्रामपंचायतचे विलिनिकरण नगर परिषदेत झाले आहे. त्यामुळे तुम्ही नगर परिषदेकडे जा, असे सांगण्यात आले. तेंव्हा यशोधरा नगरातील काही महिला नगर परिषदेत गेल्या, तिथे त्यांना सध्या आमच्या हातात काहीही नाही, तुम्ही ग्रामपंचायतमध्येच जा, निवेदनही त्यांनाच द्या, असे सांगून पुन्हा त्यांची बोळवण करण्यात आली. निवेदनही स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्यासारख्या महत्वाच्या समस्येसाठी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राधिकरण, नगर परिषद आणि ग्रामपंचायत या सर्वांकडून केवळ टोलवाटोलवी सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. (प्रतिनिधी) समन्वयाचा अभाव४उमरसऱ्यातील यशोधरा नगराप्रमाणेच शहरातील भोसा, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा आदी परिसरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागालाही जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होतो. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. नगर परिषद, प्राधिकरण, बरखास्त ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सचिव, कर्मचारी, प्रशासक यांच्यामध्ये कोणताही समन्वय नसल्याने शहरातील अनेक भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.