शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

पशुचिकित्सालय बांधकामाला तीन वर्षानंतर मुहूर्त

By admin | Updated: July 25, 2015 02:45 IST

जिल्ह्यात पशुचिकित्सालयाच्या इमारती बांधकामासाठी नियोजन समितीने एक कोटीचा निधी मंजूर केला होता.

२०१२ पासूनचा निधी : जिल्हा परिषद सेस फंडातून विविध योजनायवतमाळ : जिल्ह्यात पशुचिकित्सालयाच्या इमारती बांधकामासाठी नियोजन समितीने एक कोटीचा निधी मंजूर केला होता. मात्र २०१२ पासून इमारत बांधकामच करण्यात आले नाही. शेवटी बांधकामाकरिता २०१५ मध्ये मुहूर्त मिळाला असून आठ इमारती बांधण्यात येत आहेत. याशिवाय नियोजन समितीतून वैयक्तिक लाभाच्याही अनेक योजना राबविण्यात येत आहे. वेळेवर निधी खर्च न झाल्यामुळे यावर्षी नवीन इमारतींसाठी निधीच मिळणार नाही. पूर्वी प्रस्तावित असलेल्याच इमारती पूर्ण कराव्या लागणार आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशूसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. प्रत्यक्षात मात्र पशूचिकित्सालयाचेच काम प्रलंबित ठेवण्यात आले होते. अनेक ठिकाणी पशू दवाखान्यासाठी इमारत नसल्याने पशुपालकांना दूरच्या पशुचिकित्सालयात जावे लागते. ही अडचण सोडविण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने आठ दवाखान्यांच्या इमारती प्रस्तावित केल्या होत्या. २०१२-१३, २०१३-१४ आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षात नियोजन करण्यात आले होते. आता या इमारतींचे बांधकाम केले जात आहे. या आठ इमारतींव्यतिरिक्त नवीन इमारत बांधकामााला मंजुरी देण्यात येणार नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा नियोजन समितीने वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे. दारिद्र्य रेषेखालील आदिवासींसाठी दुधाळ जनावरे, शेळीगट वाटप करण्यात येणार आहे. वैरण विकासावर १८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील तीन हजार लाभार्थी निवडण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थ्यांना देणार आहे. आदिवासीबहुल क्षेत्रात दोन लाख २५ हजार तर बिगर आदिवासी क्षेत्रातील आदिवासींसाठी दीड लाखाची तरतूद केली आहे. दुधाळ जनावरांना खाद्य पुरवठा करण्यात येणार आहे. एकात्मिक कुक्कुट विकास गट योजनेतून सहा लाखांचे गट वितरित केले जाणार आहे. साडेचार लाखांची तरतूद केली आहे. कामधेनू दत्तक ग्राम अंतर्गत ३० गावांत ४५ लाख ७५ हजारांच्या उपाय योजना करण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात साडेचार लाखांचे फ्रीज खरेदी करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा परिषद सेस फंडातून जनावरांच्या उपचारासाठी गाव तेथे खोडे देण्यात येणार आहे. त्यासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना १६ लाखांच्या बोकडांची योजना राबविण्यात येणार आहे. या योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीस्तरावरून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ३० जुलैपर्यंत हे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत असल्याचे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप सोनकुसळे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)