शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

वीज महावितरण कंपनी १४ हजार कोटींच्या कर्जात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:04 IST

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनी आधीच १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्यात आता शासनाकडून काही सवलतींची घोषणा केली जात असल्याने महावितरणपुढील आर्थिक संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देथकबाकी ५९ हजार कोटी सवलतीच्या घोषणांनी आणखी डबघाईस येण्याची चिन्हे

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीजमहावितरण कंपनी आधीच १४ हजार कोटी रुपयांच्या कर्जात आहे. त्यात आता शासनाकडून काही सवलतींची घोषणा केली जात असल्याने महावितरणपुढील आर्थिक संकट आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.सुलभ हप्ते, दोन टक्के सूट व आता पुन्हा वीज बिल माफीची तयारी यामुळे महावितरणच्या यंत्रणेतून विरोधी सूर ऐकायला मिळतो आहे. महावितरण आधीच डबघाईस आली असताना त्यात आता शासकीय सवलतीमुळे भर पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विजेचा दर ७ रुपये २५ पैसे प्रति युनिटविजेचा दर सध्या ७ रुपये २५ पैसे प्रति युनिट असा आहे. वाढीव दर, लॉकडाऊनचा काळ, त्यात उन्हाळा, सर्व लोक घरातच, त्यामुळे विद्युत उपकरणांचा २४ तास वापर आदी देयक वाढण्यामागील प्रमुख कारणे सांगितली जातात.

महसुलात आठ हजार कोटींची कपातमहावितरणने वीज बिलातून वार्षिक ८६ हजार ६५८ कोटी १६ लाख रुपयांच्या महसुलाची आवश्यकता नोंदविली होती. परंतु आयोगाने त्यात आठ हजार ७८३ कोटी ५३ लाख रुपयांची कपात करून महसुली उद्दिष्ट ७७ हजार ८७४ कोटी ६३ लाख रुपयांवर निश्चित केले. सध्या कंपनीवर १४ हजार ५६४ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज आहे.

आयोगाची महसुलात ११.२७ टक्के कपातविद्युत बिलाची थकबाकी ५९ हजार ४३१ कोटी १८ लाख एवढी प्रचंड आहे. राज्यातील दोन कोटी ७९ लाख ३४ हजार १३१ वीज ग्राहकांना अविरत वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी महावितरणला ८६ हजार कोटींचा महसूल अपेक्षित आहे. प्रत्यक्षात त्यात आयोगाने ११.२७ टक्के कपात केली आहे.

वीज बिल माफीसाठी आंदोलने सुरूचलॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना एकत्र देयके दिली गेली. त्यामुळे देयकांचा आकडा प्रचंड फुगला. त्यातूनच नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरुद्ध ओरड सुरू झाली. देयके योग्य नाहीत, रीडिंग घेतले नाहीत, असे सांगत ग्राहकांनी वीज बिल कमी करून देण्याची मागणी केली. रस्त्यावर उतरून आंदोलने सुरूआहेत. देयके रीडिंगनुसार व योग्यच आहेत, असे महावितरणचे प्रशासन वारंवार सांगत आहे. महावितरणने वीज बिलाचे सुलभ हप्ते पाडून देण्याची, एकत्र बिल भरल्यास दोन टक्के माफीची सोय केली. मात्र त्यानंतरही वीज बिलाबाबतची ओरड थांबलेली नाही. आता शासनाचा किमान १०० युनिटपर्यंत वीज बिल माफीचा विचार सुरू आहे.

ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सवलती या शासनाच्या धोरणाचा भाग आहे, त्याबाबत मी अधिक काही बोलू शकत नाही.- अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी (मुंबई)

लॉकडाऊन काळात वीज देयके भरली न गेल्याने महावितरणला आधीच २० हजार कोटींचा फटका बसला आहे. शासनाने सवलती दिल्यास हा फटका आणखी वाढेल. त्यामुळे शासनाने सवलतीची रक्कम महावितरणला द्यावी. वाढीव वीज बिलाबाबत आयोगाने जनसुनावणी घ्यावी.- कृष्णा भोयर, सरचिटणीस, एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, मुंबई.

संचालकांचा ‘नो-रिस्पॉन्स’महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, मुंबई यांच्याशी वारंवार संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण