शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

मि.परफेक्शनिस्ट आमीर साक्षात बंदीभागात

By admin | Updated: April 27, 2017 00:25 IST

उमरखेड तालुक्यातील बंदीभाग तसा उपेक्षितच. विविध समस्या आणि पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. परंतु या भागातील गावकऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक

दुष्काळाशी दोन हात : एकंबा-कृष्णपूरमध्ये ग्रामस्थांशी साधला आपुलकीने संवाद राजेश पुरी  ढाणकी उमरखेड तालुक्यातील बंदीभाग तसा उपेक्षितच. विविध समस्या आणि पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. परंतु या भागातील गावकऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला साक्षात बंदी भागात यावे लागले. बुधवारी तो हेलिकॉप्टरने दाखल झाला. गावकऱ्यांशी संवाद साधला. नेहमी पडद्यावर दिसणारा हा हिरो बंदी भागातील नागरिकांनी अगदी जवळून न्याहाळला. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने चित्रपट अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव बंदी भागातील एकंबा आणि कृष्णपूरला येणार असल्याची वार्ता दोन दिवसांपासून कर्णोपकर्णी पसरली होती. अनेकांचा त्यावर विश्वासही बसत नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीने दौराही गुप्त ठेवण्यात आला होता. मात्र बुधवारी सकाळी बंदी भागाच्या विस्तीर्ण जंगलावर निळ्या रंगाचे हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले आणि लोकांना आमिर खान आल्याची खात्री पटली. त्याला डोळ्यात साठविण्यासाठी सुरू झाली प्रत्येकाची धडपड. आमिरला घेवून येणारे हेलिकॉप्टर सकाळी ८.१५ वाजता जेवलीच्या राजाराम बापू पाटील विद्यालयाच्या मैदानावर उतरले. निवडणूक काळातही नेत्यांचे हेलिकॉप्टरही न येणाऱ्या या भागात पहिल्यांदाच एका अभिनेत्याचे हेलिकॉप्टर उतरले. विनम्रपणे हात जोडत आमीर खान हेलिकॉप्टरच्या बाहेर आला. त्याचे यथोचित स्वागत करण्यात आले. त्यानंतर थेट टाटा स्पेसीओ जीपमधून आमिर आणि किरण एकंबा गावाकडे निघाले. एकंबात पोहोचताच सौजन्या संतोष पांडे यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी आमिरला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. जो तो आमिरला जवळून बघता यावे म्हणून धडपडताना दिसत होते. यात प्रशासनाचे अधिकारी आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांचाही समावेश होता. एकंबा येथे पोहोचल्यानंतर आमिर थेट गावालगतच्या जंगलात पोहोचला. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या माती नाला बांधाचे पाहणी केली. त्या ठिकाणी गावकऱ्यांसोबत संवाद साधला. एकंबाजवळील जंगलात काही ग्रामस्थांसोबत आमिरने शूटिंगही केले. तेथून दुपारी १ वाजताच्या सुमारास आमिरचे ढाणकीजवळच्या कृष्णापूर येथे आगमन झाले. वॉटर कप स्पर्धेबद्दल त्याने गावकऱ्यांशी संवाद साधला. सुरक्षा व्यवस्था कडेकोट असतानाही जलसंधारणाची तळमळ ही सुरक्षाही रोखू शकली नाही. त्याने आस्थेने साधलेला संवादाने गावकरी हरखून गेले. किरण रावची दिलगिरी आमीर खान यांची पत्नी किरण राव यांनी कृष्णापूर येथील महिलांशी संवाद साधून तुम्ही फार चांगलं काम करीत आहात. मला याचा आनंद होतो, असे म्हणत आम्हाला येण्यास थोडा उशीर झाला. त्याबद्दल माफी मागते, असे विनम्रपणे म्हणत दिलगिरी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसांची सहृदयता अनुभवली.