शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

प्लास्टिक निर्मूलनाची मोहीम जिल्हाभर गतिमान करा

By admin | Updated: July 25, 2015 02:42 IST

पॉलिथीन, प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषित होते. प्लास्टिक जाळल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर घातक असा कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होता.

सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हा पर्यावरण समितीची बैठकयवतमाळ : पॉलिथीन, प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषित होते. प्लास्टिक जाळल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर घातक असा कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होता. पॉलिथीन, प्लॅस्टीक सहजासहजी नष्ट होत नाही. यामुळे जनावरे तसेच मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ प्रशासन आणि सामाजिक संघटनांच्यावतीने गतिमान करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यावरण समितीची बैठक गार्डन हॉल येथे बुधवारी घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दीपककुमार सिंगला यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, नपचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी तथा संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्लास्टिक निर्मूलनासाठी मुख्याधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करण्यासोबतच जनकल्याणाची भावना समोर ठेऊन काम करावे. प्लॅस्टिक नष्ट होत नसल्याने अनेक प्रकारे ती घातक आहे. गटारांमध्ये साचल्याने नाल्या तुंबतात, त्यातील घाण पाणी रस्त्यावर येते. प्लास्टिक जाळल्यास घातक असा कार्बन मोनॉक्साईड वायू फार मोठ्या प्रमाणावर वातावरणात पसरले. हा वायू मानवी आरोग्यास घातक आहे. त्यामुळे याबाबतीत कायद्याच्या कडक अंमलबजावणीसोबतच सामाजिक संघटनांना सोबत घेऊन जनजागृती मोहीम राबविण्याची सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. प्लास्टिकचे परिणाम लक्षात आणून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना याबाबत शपथ देण्यासोबतच निबंध, स्लोगन स्पर्धा आयोजित केली जावी. येत्या ५ आगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांसोबतच शासकीय कार्यालये, कुटुंबांमध्ये हात धुवा मोहिमेच्या निमित्ताने प्लास्टिक निर्मूलनाची जनजागृती केली जावी. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊन स्वातंत्र्यदिनी त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी बक्षिसे दिली जावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नगरपरिषदांनी प्लास्टिक बंदीचा ठराव घेण्यासोबत ठिकठिकाणी वितरकांकडून जप्ती मोहीम राबविण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. येत्या १५ आॅगस्ट रोजी संपूर्ण जिल्हाभर ग्रामपंचायतींमध्ये असे ठराव घेतले जाणार आहे. पॉलिथीन, प्लास्टिक विक्रेत्यांनी विक्री करू नये म्हणून सूचना द्या. त्यानंतरही विक्री होत असल्यास कडक कार्यवाही करण्याची सूचना मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)नगर परिषदांनी प्लॅस्टिक बंदीचा ठराव घ्यावाप्लास्टिक निर्मूलन ही काळाची गरज आहे. मानवी आरोग्य आणि निसर्गासाठी अतिशय घातक असलेल्या या प्लास्टिक बंदीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा याचे दूरगामी परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांनी प्लास्टिक बंदीचा ठराव घेण्यासोबतच ठिकठिकाणी वितरकांकडून जप्ती मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पर्यावरण समितीच्य बैठकीत दिले. विक्रेत्यांनी प्लास्टिक विकू नये, ग्राहकांनीसुद्धा दुकानदारांना ते मागू नये, दिल्यास परत करावे.