शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

पुनर्वसनात समस्यांचा डोंगर

By admin | Updated: August 27, 2015 00:13 IST

बेंबळा प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेली बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहेत.

विकासापासून दूर : बेंबळा प्रकल्पग्रस्तांना हव्या स्वतंत्र ग्रामपंचायतीघारफळ : बेंबळा प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेली बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहेत. या गावांचा कारभार पंचायत समिती अधिकारी सांभाळत असल्याने सुविधांची बोंबाबोंब आहे. समस्यांचा डोंगर या गावांमध्ये उभा झाला आहे. आता नागरिकांना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जाची प्रतीक्षा आहे. बेंबळा प्रकल्पामुळे तालुक्यातील अनेक गावांचे पुनर्वसन झाले. कोल्ही क्र.१, कोल्ही क्र.२, दिघी-१, दिघी-२, कोठा, फत्तेपूर, थाळेगाव, भटमार्ग आणि मिटणापूर या गावांचा यामध्ये समावेश आहे. ज्या गावांनी शेतजमिनी, घरे-दारे प्रकल्पासाठी दिली तेच विकासापासून दूर आहेत. कोल्ही क्र.२ या पुनर्वसित गावात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार संबंधितांना निवेदने दिली. त्याला केराची टोपली मिळाली. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदने देऊनही एकही समस्या निकाली निघालेली नाही. विकास कामे ठप्प आहेत. कोल्ही क्र.२ येथेही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. महिन्यातून केवळ सहा दिवस योजनेचे पाणी उपलब्ध होते. इतर दिवशी अधिग्रहित केलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सरूळ येथे खर्डा धरणाच्या बुडीत क्षेत्रात बांधण्यात आली. तेथूनच गावात पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आली. ती निकृष्ट असल्याने जागोजागी फुटली. यातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावातील स्मशानभूमीत असलेला हातपंप अनेक वर्षांपासून बंद आहे.वीज पुरवठा नेहमी खंडित असतो. गावात बसविण्यात आलेल्या रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यातील विद्युत उपकरणे जळाली. नवीन लावण्याचे सौजन्य कुणीही दाखविले नाही. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहे. एकही सिमेंट रस्ता नाही, पूल खचलेले आहेत. पांदण रस्ताही नसल्याने नागरिकांना शेतात जाण्याचा प्रश्न आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने सदर गावांचा विकास खोळंबला आहे. पोलीस पाटील, स्वतंत्र अंगणवाडी नाही. स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी आवश्यक असलेली लोकसंख्या अनेक पुनर्वसित गावांची आहे. मात्र प्रशासनातील दिरंगाईमुळे ही गावे वंचित आहेत. परिणामी विकास खुंटला आहे. (वार्ताहर)सुविधांपूर्वीच करावे लागले स्थानांतरणकुठल्याही प्रकल्पासाठी पुनर्वसन करायचे असल्यास त्याठिकाणी संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शाळा, वीज, पाणी, रस्ते, नाल्या यासह इतर सुविधा मिळाल्याशिवाय स्थानांतरण केले जात नाही. मात्र बेंबळा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाऱ्या गावांतील नागरिकांना या सुविधा मिळण्यापूर्वीच हलविण्यात आले. आता या गावातील लोकांना साध्या खडीकरणाच्या रस्त्यासाठीही संबंधित कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पाणी नसल्याने पावसाळ्यातही काही गावातील लोकांची पायपीट सुरू आहे. नळ योजनेचे तर दूर हातपंप किंवा विहिरीच्या पाण्यासाठीही भटकावे लागते. त्यामुळे नागरिकांना स्वतंत्र ग्रामपंचायतीची प्रतीक्षा आहे.