शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

पावसाने सोयाबीनचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देकापसालाही फटका : जिल्ह्यात भाजीपाला, फुलपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने कास्तकारांना चांगलाच हादरा दिला असून रविवारी बरसलेल्या पावसाने शेतपिकांच्या नुकसानीत आणखी भर घातली. दरवर्षी ८ ऑक्टोबरपर्यंत माघारी फिरणारा पाऊस यंदा लांबला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा मुक्काम वाढला आहे. यामुळे सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसण्याचे संकेत दिले आहेत.यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे नुकसान होत आहे.सोयाबीनला उतारा कमी झाला आहे. त्यातही हातात पडणारे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. यामुळे पांढरी बुरशी पडून सोयाबीन कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोयाबीनच्या गंज्यामधून वाफा निघत आहेत. काळवंडलेले सोयाबीन हातात पडल्याने शेतकरी हादरले आहे. कापूस वेचणीसाठी गावामध्ये मजूरच मिळत नाही. यातून कापसाचेही नुकसान होत आहे. पावसाने बोंड सडून कास्तकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.भाजीपाला आणि फुलपिकांना पावसाने मोठा फटका बसला आहे. यावर्षी विजयादशमीला झेंडूची फुले विक्रीसाठी येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भाजीपाला उत्पादनाला पावसाने मोठ्या प्रमाणात मार बसला आहे. शेतकरी चिंतेत पडले आहेत.पावसाचा वाढलेला मुक्काम धोकादायकआंध्र आणि तेलंगानात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे वाऱ्याची गती कमी झाली आहे. बाष्प घेऊन येणारे ढग मोठ्या प्रमाणात विदर्भात आगेकूच करीत आहेत. या बाष्पयुक्त ढगांची संख्या वाढत असल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाचा वाढलेला मुक्काम पिकांसाठी हानीकारक आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस माघारी फिरतो. यावर्षी ८ ऑक्टोबरपर्यंत तो राहील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात कमी दाबाच्या पट्ट्याने यंदा परतीच्या पावसाचा मुक्कामआणखी लांबला आहे. पावसामुळे रबीचाही हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Rainपाऊस