शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

पावसाने सोयाबीनचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देकापसालाही फटका : जिल्ह्यात भाजीपाला, फुलपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने कास्तकारांना चांगलाच हादरा दिला असून रविवारी बरसलेल्या पावसाने शेतपिकांच्या नुकसानीत आणखी भर घातली. दरवर्षी ८ ऑक्टोबरपर्यंत माघारी फिरणारा पाऊस यंदा लांबला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाचा मुक्काम वाढला आहे. यामुळे सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसण्याचे संकेत दिले आहेत.यावर्षी प्रारंभापासून पावसाचा जोर कायम आहे. पीक काढणीला आले तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. मुग आणि उडीद पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता सोयाबीन काढणीला आले आहे. या सुमारास बरसत असलेल्या पावसाने कास्तकारांचे मोठे नुकसान होत आहे.सोयाबीनला उतारा कमी झाला आहे. त्यातही हातात पडणारे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. यामुळे पांढरी बुरशी पडून सोयाबीन कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोयाबीनच्या गंज्यामधून वाफा निघत आहेत. काळवंडलेले सोयाबीन हातात पडल्याने शेतकरी हादरले आहे. कापूस वेचणीसाठी गावामध्ये मजूरच मिळत नाही. यातून कापसाचेही नुकसान होत आहे. पावसाने बोंड सडून कास्तकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.भाजीपाला आणि फुलपिकांना पावसाने मोठा फटका बसला आहे. यावर्षी विजयादशमीला झेंडूची फुले विक्रीसाठी येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर भाजीपाला उत्पादनाला पावसाने मोठ्या प्रमाणात मार बसला आहे. शेतकरी चिंतेत पडले आहेत.पावसाचा वाढलेला मुक्काम धोकादायकआंध्र आणि तेलंगानात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे वाऱ्याची गती कमी झाली आहे. बाष्प घेऊन येणारे ढग मोठ्या प्रमाणात विदर्भात आगेकूच करीत आहेत. या बाष्पयुक्त ढगांची संख्या वाढत असल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पावसाचा वाढलेला मुक्काम पिकांसाठी हानीकारक आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस माघारी फिरतो. यावर्षी ८ ऑक्टोबरपर्यंत तो राहील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात कमी दाबाच्या पट्ट्याने यंदा परतीच्या पावसाचा मुक्कामआणखी लांबला आहे. पावसामुळे रबीचाही हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Rainपाऊस