शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गतवर्षी

By admin | Updated: July 19, 2015 02:37 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या २०१४ मध्ये झाल्या आहेत. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे.

‘एनसीआरबी’ : ग्रामीण भागात प्रमाण वाढलेयवतमाळ : महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या २०१४ मध्ये झाल्या आहेत. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. भारत सरकार गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) २०१४ च्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या पाच राज्यात २०१४ मध्ये शेतकरी आत्महत्या झालीच नसल्याचा दावा या ब्युरोने केला आहे. कृषी नैराश्य, मानसिक तणाव यामुळे १२ हजार ३६० शेतकरी आणि शेतीवर निर्वाह करणारे भूमीहीन आणि शेतमजुरांच्या आत्महत्येचा आकडा २०१३ च्या तुलनेत पाच टक्केने वाढला आहे. २०१३ मध्ये हा आकडा ११ हजार ७७२ एवढा होता. २०१४ मध्ये महाराष्ट्रात चार हजार चार, तेलंगाणा एक हजार ३४७, मध्यप्रदेश एक हजार १९८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात २०१४ मध्ये चार हजार चार, २०१३ मध्ये तीन हजार १४६ आणि २०१२ मध्ये तीन हजार ७४८ जणांनी कृषी नैराश्य व मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा अहवाल ‘एनसीआरबी’ने प्रकाशित केला आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकी ही प्रमुख कारणे सांगण्यात आली आहे. २०१५ च्या पहिल्या सहामाहीच्या सरकारी आकडेवारीवरून कृषी संकट अधिकच वाढले असून ग्रामीण भागात आत्महत्यांचा आकडा २०१४ च्या तुलनेत ५० टक्के जास्त आहे. याला २०१४ चा दुष्काळ आणि सततची नापिकीसह कापूस व सोयाबीनला मिळणारा अत्यंत कमी भाव असल्याचे अहवालात म्हटले आहे. यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक, कोरडवाहू आहे. कर्जमुक्ती आणि अन्न व डाळीचे पीक घेण्यासाठी तसेच जोडधंद्यासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. ‘एनसीआरबी’ने राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या पाच राज्यात २०१४ मध्ये शेतकरी आत्महत्या झाली नसल्याचा दावा हास्यास्पद असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)