शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गतवर्षी

By admin | Updated: July 19, 2015 02:37 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या २०१४ मध्ये झाल्या आहेत. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे.

‘एनसीआरबी’ : ग्रामीण भागात प्रमाण वाढलेयवतमाळ : महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या २०१४ मध्ये झाल्या आहेत. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. भारत सरकार गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) २०१४ च्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या पाच राज्यात २०१४ मध्ये शेतकरी आत्महत्या झालीच नसल्याचा दावा या ब्युरोने केला आहे. कृषी नैराश्य, मानसिक तणाव यामुळे १२ हजार ३६० शेतकरी आणि शेतीवर निर्वाह करणारे भूमीहीन आणि शेतमजुरांच्या आत्महत्येचा आकडा २०१३ च्या तुलनेत पाच टक्केने वाढला आहे. २०१३ मध्ये हा आकडा ११ हजार ७७२ एवढा होता. २०१४ मध्ये महाराष्ट्रात चार हजार चार, तेलंगाणा एक हजार ३४७, मध्यप्रदेश एक हजार १९८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात २०१४ मध्ये चार हजार चार, २०१३ मध्ये तीन हजार १४६ आणि २०१२ मध्ये तीन हजार ७४८ जणांनी कृषी नैराश्य व मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा अहवाल ‘एनसीआरबी’ने प्रकाशित केला आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकी ही प्रमुख कारणे सांगण्यात आली आहे. २०१५ च्या पहिल्या सहामाहीच्या सरकारी आकडेवारीवरून कृषी संकट अधिकच वाढले असून ग्रामीण भागात आत्महत्यांचा आकडा २०१४ च्या तुलनेत ५० टक्के जास्त आहे. याला २०१४ चा दुष्काळ आणि सततची नापिकीसह कापूस व सोयाबीनला मिळणारा अत्यंत कमी भाव असल्याचे अहवालात म्हटले आहे. यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक, कोरडवाहू आहे. कर्जमुक्ती आणि अन्न व डाळीचे पीक घेण्यासाठी तसेच जोडधंद्यासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. ‘एनसीआरबी’ने राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या पाच राज्यात २०१४ मध्ये शेतकरी आत्महत्या झाली नसल्याचा दावा हास्यास्पद असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)