शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गतवर्षी

By admin | Updated: July 19, 2015 02:37 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या २०१४ मध्ये झाल्या आहेत. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे.

‘एनसीआरबी’ : ग्रामीण भागात प्रमाण वाढलेयवतमाळ : महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या २०१४ मध्ये झाल्या आहेत. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. भारत सरकार गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) २०१४ च्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या पाच राज्यात २०१४ मध्ये शेतकरी आत्महत्या झालीच नसल्याचा दावा या ब्युरोने केला आहे. कृषी नैराश्य, मानसिक तणाव यामुळे १२ हजार ३६० शेतकरी आणि शेतीवर निर्वाह करणारे भूमीहीन आणि शेतमजुरांच्या आत्महत्येचा आकडा २०१३ च्या तुलनेत पाच टक्केने वाढला आहे. २०१३ मध्ये हा आकडा ११ हजार ७७२ एवढा होता. २०१४ मध्ये महाराष्ट्रात चार हजार चार, तेलंगाणा एक हजार ३४७, मध्यप्रदेश एक हजार १९८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रात २०१४ मध्ये चार हजार चार, २०१३ मध्ये तीन हजार १४६ आणि २०१२ मध्ये तीन हजार ७४८ जणांनी कृषी नैराश्य व मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा अहवाल ‘एनसीआरबी’ने प्रकाशित केला आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकी ही प्रमुख कारणे सांगण्यात आली आहे. २०१५ च्या पहिल्या सहामाहीच्या सरकारी आकडेवारीवरून कृषी संकट अधिकच वाढले असून ग्रामीण भागात आत्महत्यांचा आकडा २०१४ च्या तुलनेत ५० टक्के जास्त आहे. याला २०१४ चा दुष्काळ आणि सततची नापिकीसह कापूस व सोयाबीनला मिळणारा अत्यंत कमी भाव असल्याचे अहवालात म्हटले आहे. यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक, कोरडवाहू आहे. कर्जमुक्ती आणि अन्न व डाळीचे पीक घेण्यासाठी तसेच जोडधंद्यासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. ‘एनसीआरबी’ने राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार या पाच राज्यात २०१४ मध्ये शेतकरी आत्महत्या झाली नसल्याचा दावा हास्यास्पद असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)