शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

तुम्ही जेवढे गाईला द्याल, त्यापेक्षा अधिक गाय तुम्हाला देईल

By admin | Updated: February 2, 2017 00:20 IST

इथे जमलेले सर्व लोक खूप भाग्यवान आहेत. जेथे काही वार्षांपूर्वी रामकथा झाली, त्याच ठिकाणी आता हे सुंदर असे सप्त गौमाता परिक्रमालय

सुश्री अलकाश्रीजी : यवतमाळात सप्त गौमाता परिक्रमालयाचे थाटात लोकार्पण यवतमाळ : इथे जमलेले सर्व लोक खूप भाग्यवान आहेत. जेथे काही वार्षांपूर्वी रामकथा झाली, त्याच ठिकाणी आता हे सुंदर असे सप्त गौमाता परिक्रमालय मंदिर निर्माण झाले आहे. तुम्ही गाईला जेवढे द्याल, त्यापेक्षा कितीतरी अधिक गाय तुम्हाला देईल, असे आशीर्वचन संत सुश्री अलकाश्रीजी देवी यांनी दिले. येथील अटल परिवार आणि गोरक्षण संस्थानच्या संयुक्त विद्यमाने सप्त गौमाता परिक्रमालय मंदिराचे लोकार्पण बुधवारी संत सुश्री अलकाश्रीजी देवी यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी उपस्थित सश्रद्ध नागरिकांच्या मंदियाळीला त्यांनी मार्गदर्शन केले. अलकाश्रीजींनी सर्वप्रथम सप्त गोमातांची परिक्रमा केली. व्यासपीठावर संत अलकाश्रीजी, रामलखनदास महाराज, गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष नंदलाल बागडी, प्रतिभादेवी अटल आदी मान्यवर विराजमान होते. सुश्री अलकाश्रीजी म्हणाल्या, जो गाईची नित्य सेवा करतो, त्याने आपली मनोकामना गाईच्या कानात सांगावी. ती मनोकामना नक्कीच पूर्ण होते, असे संत सांगतात. तुमच्या घरी लग्नकार्य असो, वाढदिवस असो अशा कुठल्याही शुभप्रसंगी गोरक्षण संस्थानमध्ये येऊन जरूर गाईची सेवा करा. गोमातेच्या सेवेतून भवसागर तरूण जाणे शक्य आहे, असे संत सुश्री अलकाश्रीजींनी सांगितले. या ठिकाणी पुन्हा एकदा रामथा व्हावी, अशी इच्छाही त्यांनी शेवटी बोलून दाखविली. अलकाश्रीजींनी ‘श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी.. हे नाथ नारायण वासूदेव’ अशा ओळींनी आपल्या आशीर्वनाला प्रारंभ केला, तेव्हा उपस्थित सर्व तल्लीन झाले होते. रामलखनदास महाराज म्हणाले, या ठिकाणी अलकाश्रीजींच्या रामकथेने चेतना निर्माण झाली आहे. सप्त गौमाता परिक्रमालय साकारणाऱ्या अटल परिवाराचे आभार मानणे गरजेचे आहे. स्व. सुरजमलजी अटल हे जसे त्यांच्या परिवारात आदरणीय आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी संपूर्ण गावाचेच मन जिंकले होते. मी नुकताच दक्षीण भारतातील तीन-चार मंदिरांचे दर्शन घ्यायला निघालो होतो. मात्र या कार्यक्रमाविषयी कळले आणि परत आलो. त्या मंदिरांच्या दर्शनापेक्षा आपल्या गावातील सप्त गौमातांची परिक्रमा महत्त्वाची आहे. यावेळी अटल परिवारातील अ‍ॅड. रतनलाल अटल, उज्ज्वला अटल यांनीही मनोगत व्यक्त केले. स्व. सुरजमलजी अटल यांच्या सामाजिक कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्कर्षा अटल हिने गणेशवंदना सादर केली. प्रास्ताविक गोरक्षण संस्थानचे सचिव किसन सिंघानिया यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री आणि रोशनी अटल यांनी केले. तर आभार डॉ. राजेश अटल यांनी मानले. शेवटी संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)