शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

५० पेक्षा अधिक उमेदवार अविरोध

By admin | Updated: April 10, 2015 00:17 IST

तालुक्यातील ४० ग्रामपंचायती व २३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ८६३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीत ४९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.

वणी : तालुक्यातील ४० ग्रामपंचायती व २३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी ८६३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीत ४९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता ८१३ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहे. उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान तालुक्यात ५० पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.निवडणूक पार पाडण्यासाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नऊ अधिकाऱ्यांनी बुधवारी नामांकन अर्जांची छाननी केली. छाननीनंतर विविध गावांतील १५ जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्यामुळे या १५ जागा आता रिक्त राहणार आहे. पोटनिवडणुकीच्या सर्वच जागा रिक्त राहणार आहे. पोटनिवडणुकीसाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर जवळपास ५० उमेदवार अविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा होणेच बाकी आहे. यामध्ये सावर्ला २, कवडशी ३, निलजई ३, बेलोरा २, तरोड २, पिंपळगाव २, निवली ३, बेसा ३, चिंचोली ५, शेवाळा १, सावंगी ५, परसोडा २, महाकालपूर ३, नवरगाव ३, पिंपरी १, पेटुर २, विरकुंड ३ अशा प्रकारच्या जागा अविरोध होणार आहे. दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील अविरोध जागांची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. परंतु तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींच्या १२३ प्रभागातील ३१६ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यापैकी ५० पेक्षा अधिक जागा अविरोध होणार आहे. १५ जागा रिक्त राहणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व त्यांचे प्रशिक्षण अद्याप झालेले नाही. निवडणूक यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. काही कर्मचाऱ्यांना ऐनवेळी निवडणूक कामासाठी नियुक्ती देण्यात आली. मात्र त्यांच्या पत्रात त्यांना यापूर्वीच आपणाला माहिती देण्यात आल्याचा उल्लेख आहे. (लोकमत चमू)