शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मोदींच्या ‘चाय पे चर्चा’तील दाभडी गाव उपेक्षितचं !

By admin | Updated: May 27, 2016 02:07 IST

‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी दाभडीचाही कायापालट करण्याची ग्वाही दिली होती.

दोन वर्षे लोटली : समस्या जैसे थे, आश्वासनांची पूर्तता नाही आर्णी : ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी दाभडीचाही कायापालट करण्याची ग्वाही दिली होती. परंतु या कार्यक्रमावरून दोन वर्षे लोटली, मात्र दाभडी गावाचा विकास झाला नाही. हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपली दोन वर्षे पूर्ण केल्यानंतरही उपेक्षितच असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी (जि. यवतमाळ) या गावाला भेट दिली होती. या गावात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करून त्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांशी मोदी यांनी संवाद साधला होता. तुमचे जीवनमान बदलून टाकू, अशी हमी त्यांना दिली होती. मात्र आजही शेतकऱ्यांची स्थिती जैसे थे आहे. ज्या दाभडी गावात हा कार्यक्रम झाला, त्या गावकऱ्यांनाही मी तुमच्या पाठीशी आहे, तुमचा सर्वांगीण विकास करू, असे सांगितले गेले होते. या कार्यक्रमावरून आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार येऊन दोन वर्षे गुरुवारी पूर्ण झाली. परंतु दाभडी गावाचा कोणताच विकास झाला नाही. या गावातील समस्या आजही जैसे थे आहे. (शहर प्रतिनिधी) मंत्री-आमदारांचीही घोषणा हवेत विरली१३ मार्च २०१५ रोजी चंद्रपूर-आर्णीचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पत्रपरिषद घेऊन महाराष्ट्र शासन दाभडी गाव दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास फोन करून ही माहिती दिल्याचे ना. अहीर यांनी पत्रकारांना सांगितले होते. दाभडीच्या विकासासाठी अनेक घोषणाही केल्या गेल्या होत्या. एवढेच नव्हे तर यवतमाळचे भाजपा आमदार मदन येरावार यांनीसुद्धा थेट दाभडीचे तत्कालीन सरपंच संतोष टाके यांच्याशी संपर्क करून दाभडी विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. ग्रामपंचायतीने आपल्या समस्यांची गाथा रातोरात येरावार यांच्याकडे पोहोचविली. ही गाथा मुख्यमंत्र्यांपर्यंत स्वत: पोहचवून दाभडी विकासाचे आश्वासन येरावार यांनी सरपंच व गावकऱ्यांना दिले होते. मात्र आज दोन वर्षे लोटल्यानंतरही दाभडीत विकासाचे तीन-तेरा वाजले आहे. ना. अहीर, आमदार येरावार यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे मोदी सरकार, आपले खासदार-मंत्री, आमदार यांच्या घोषणा फसव्या असल्याची भावना दाभडीवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.