शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कायले छापता शेतीची थट्टा...

By admin | Updated: November 6, 2014 02:18 IST

शेती अन् शेतकरी हा थट्टेचा विषय झाला आहे. नापिकीची भळभळणारी जखम पाहून आता कुणालाही शेतकऱ्यांची दया येत नाही.

सुरेंद्र राऊत यवतमाळ शेती अन् शेतकरी हा थट्टेचा विषय झाला आहे. नापिकीची भळभळणारी जखम पाहून आता कुणालाही शेतकऱ्यांची दया येत नाही. निसर्ग आणि शासनकर्ते निगरगट्ट झाल्याने तुम्ही शेतीची अवस्था कशाही स्वरूपात छापली तरी याचा कोणताच फरक पडणार नाही, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या भावनांना ‘लोकमत’ जवळ वाट मोकळी करून दिली. गावात गेल्यानंतर शेतीच्या स्थितीबाबत बोलण्यास फारसे कुणीच इच्छुक नव्हते. हा आतबट्ट्याचा व्यवसाय जिंदगीलाच पुजला आहे. त्यामुळे यावर काय बोलायच असे म्हणून बहुतांश जण आपल्या मनातील शल्य झाकण्याचा प्रयत्न करत होता. शेतकऱ्याला कुणी मदत करेल, अशी आशाच उरलेली नाही. नव्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी लागवड खर्चाच्या ५० टक्के अधिकचा नफा मिळेल असा दर देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर या शासनाने हमी भावात ५० रुपयाची वाढ करून थट्टा केली. त्यापूर्वी राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने शेतीला मुबलक वीज दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. २०१२ मध्ये भारनियमन मुक्त केले जाईल, अशी घोषणा केली होती. आज शेतातील वीज काही तासही राहत नाही. विहिरीवर मोटारपंप आणि पाणी असूनही पीक करपताना पाहण्याची वेळ आली आहे. भारनियमनमुक्तीची घोषणाही शेतकऱ्यांची थट्टा करणारीच ठरली. यावर्षी दुबार-तिबार पेरणीनंतरही सोयाबीनची नापिकी झाली. बाजारात मात्र सोयाबीनचा दर काही केल्या वाढताना दिसत नाही. अशीच कापसाचीही स्थिती आहे. शेतकऱ्याच्या नावाने मते मागणारे, संघटना चालविणारे याबाबत केवळ चर्चा घडवून आणतात. प्रत्यक्षात आजपर्यंत कुठलाच फायदा शेतकऱ्याला झाला नाही. जिल्ह्यातील कापूस उत्पादक सातत्याने आत्महत्या करतो आता शेतकरी आत्महत्येचीही सवय येथील व्यवस्थेला झाली आहे. त्यामुळे नापिकी आणि शेतीच्या स्थितीबाबत माध्यमांनी कितीही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तरी चिरेबंद कान असलेल्या व्यवस्थेला तो ऐकूच येणार नाही. उलट शेतकऱ्यांची थट्टा समाज आणि व्यवस्थेकडून केली जाईल. अडचणीच्या काळात शेतकरी आपल्या वैयक्तिक संबंधातूनच कर्जाऊ रकमा घेऊन हा व्यवसाय चालवितो. शेतीच नापिकी मांडल्यानंतर सावकारही कर्ज देताना व्याजाचा दर वाढवितो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीवर कुणीच काहीही छापू नये, बोलू नये अशा शब्दात संताप व्यक्त केला.