शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 19:14 IST

नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

ठळक मुद्देकाँग्रेसकडून दिली जातेय चिथावणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे. काँग्रेसकडून चिथावणी देत आंदोलन घडवून आणले जात आहे. या विधेयकात कुणावरही अन्याय होणार नाही, केवळ बाहेरच्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद केल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा त्यांनी केला. मोदी सरकारने घेतलेले निर्णय देशहिताचेच आहे. जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा कमी केला. तेथील ३७० कलम काढून जम्मू काश्मिर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. तेथील तणाव कमी झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जाचा दिला जावा, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे ना. आठवले यांनी सांगितले.दलित व आदिवासींनी कुठलाही संभ्रम मनात ठेऊ नये, कुणाचेही आरक्षण काढले जाणार नाही, सबका साथ-सबका विकास याच धोरणावर केंद्रातील सरकार काम करीत आहे. आर्थिक मंदीही जागतिक स्तरावरच आहे. या मंदीच्या काळात बाहेर पडण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार बनायला हवे होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार बनले, ते ५० दिवस टिकते की नाही, अशी चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे राहूल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत अतिरेकी भूमिका मांडली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते. त्यांनी देशासाठी कारावास भोगला. आता याच मुद्यावर काँग्रेस व शिवसेनेत जुंपली आहे. काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढावा आणि भाजप-सेनेचे सरकार महाराष्ट्रात स्थापन व्हावे, अशी अपेक्षा रिपब्लिक पार्टीला असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.रिपब्लिकन पक्ष हाच बाबासाहेबांचा पक्ष आहे. आता हा पक्ष देशपातळीवर वाढत असल्याचेही ना. आठवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, आर.एस. वानखडे, गोविंद मेश्राम, प्रदीप दंदे, चंद्रकांत पाटील, बाळू घरडे, प्रभाकर जीवने, नवनीत महाजन, गौतम चव्हाण, सुधाकर तायडे, धर्मराज गायकवाड, सुखदेवराव जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले