शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 19:14 IST

नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

ठळक मुद्देकाँग्रेसकडून दिली जातेय चिथावणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे. काँग्रेसकडून चिथावणी देत आंदोलन घडवून आणले जात आहे. या विधेयकात कुणावरही अन्याय होणार नाही, केवळ बाहेरच्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद केल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा त्यांनी केला. मोदी सरकारने घेतलेले निर्णय देशहिताचेच आहे. जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा कमी केला. तेथील ३७० कलम काढून जम्मू काश्मिर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. तेथील तणाव कमी झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जाचा दिला जावा, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे ना. आठवले यांनी सांगितले.दलित व आदिवासींनी कुठलाही संभ्रम मनात ठेऊ नये, कुणाचेही आरक्षण काढले जाणार नाही, सबका साथ-सबका विकास याच धोरणावर केंद्रातील सरकार काम करीत आहे. आर्थिक मंदीही जागतिक स्तरावरच आहे. या मंदीच्या काळात बाहेर पडण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार बनायला हवे होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार बनले, ते ५० दिवस टिकते की नाही, अशी चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे राहूल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत अतिरेकी भूमिका मांडली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते. त्यांनी देशासाठी कारावास भोगला. आता याच मुद्यावर काँग्रेस व शिवसेनेत जुंपली आहे. काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढावा आणि भाजप-सेनेचे सरकार महाराष्ट्रात स्थापन व्हावे, अशी अपेक्षा रिपब्लिक पार्टीला असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.रिपब्लिकन पक्ष हाच बाबासाहेबांचा पक्ष आहे. आता हा पक्ष देशपातळीवर वाढत असल्याचेही ना. आठवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, आर.एस. वानखडे, गोविंद मेश्राम, प्रदीप दंदे, चंद्रकांत पाटील, बाळू घरडे, प्रभाकर जीवने, नवनीत महाजन, गौतम चव्हाण, सुधाकर तायडे, धर्मराज गायकवाड, सुखदेवराव जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले